शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

बंडखोरांच्या ताकदीने सर्व पक्ष चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 2:06 AM

निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटून ठाण मांडणारे बंडखोर उमेदवार आणि नेत्यांच्या नाराजीने काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही प्रमुख पक्ष चिंतीत आहेत. भाजपाने बंडखोरांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला असून, पक्षाला बराच फायदाही झाला. तथापि...

- महेश खरे सूरत : निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटून ठाण मांडणारे बंडखोर उमेदवार आणि नेत्यांच्या नाराजीने काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही प्रमुख पक्ष चिंतीत आहेत. भाजपाने बंडखोरांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला असून, पक्षाला बराच फायदाही झाला. तथापि, काँग्रेस अजुनही त्रस्त आहे. बंडखोरांचे मन वळविण्यासाठी काँग्रेसने उशीरा का होईना, वरिष्ठ नेत्यांचा गटच स्थापन केला आहे. हेच नेते प्रचार करण्यासोबत असंतुष्टांची मनधरणीही करीत आहेत.चार बड्या नेत्यांवर जबाबदारीबंडखोर उमेदवारांचे मन वळवून त्यांना मैदानातून माघार घेण्यासाठी राजी करण्याची जबाबदारी काँग्रेसने चार वरिष्ठ नेत्यांवर टाकली. दक्षिण गुजरातसाठी सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद, अहमदाबादसाठी तरुण गोगोई (आसामचे मुख्यमंत्री), सौराष्टÑासाठी गुलाम नबी आझाद तसेच कच्छ आणि उत्तर गुजरातसाठी मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नेत्यांचा समावेश असलेले गट स्थापन करण्यात आले आहेत.महुआमधील स्थितीने चिंतामाजी केंद्रीय मंत्री आणि महुआ मतदार संघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तुषार चौधरी यांच्याविरुद्ध सुरेश चौधरी यांनी मैदानात उडी घेतली आहे. तुषार हे बाहेरचे म्हणून त्यांच्याविरुद्ध असंतोष व्यक्त होत आहे. अशात सुरेश चौधरी हे आखाड्यात मांड ठोकून असल्याचे काँग्रेसची चिंता वाढली आहे.पटेल यांची डोकेदुखीकरंज विधानसभा मतदार संघातून भीमजी पटेल हे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. सूरत महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राहिलेले भीमजी पटेल या भागात लोकप्रिय आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतल्याने भाजपची मते घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017