शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पहलू खान खून खटल्यात सर्व आरोपी निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 05:22 IST

कत्तलीसाठी गायी घेऊन जात असल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत पहलू खान या हरियाणातील दूध व्यावसायिकाच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूसंदर्भात दाखल केल्या गेलेल्या खून खटल्यातील...

अलवर : कत्तलीसाठी गायी घेऊन जात असल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत पहलू खान या हरियाणातील दूध व्यावसायिकाच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूसंदर्भात दाखल केल्या गेलेल्या खून खटल्यातील सर्व सहा आरोपींची सत्र न्यायालयाने बुधवारी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.पहलू खान व त्याची दोन मुले राजस्थानात खरेदी केलेल्या गायी हरियाणातील त्यांच्या गावी ट्रकमधून नेत असता १ एप्रिल २०१७ रोजी जयपूर-दिल्ली महामार्गावरील बेहरोर गावाजवळ जमावाने ट्रक अडवून पेहलू खानला जबर मारहाण केली होती. दोन दिवसांनी त्याचा इस्पितळात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशाच्या अनेक भागांत स्वयंघोषित गोरक्षकांच्या बेछूट हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘कायदा हातात घेऊ नका’, असे गोरक्षकांना बजावावे लागले होते.विपीन यादव, रवींद्र यादव, कालू राम यादव, दयानंद यादव, योगेश खाटी आणि भीम राठी या सहाही आरोपींना संशयाचा फायदा देऊन न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. आरोपींचे वकील अ‍ॅड. हुकूमचंद शर्मा यांनी या निकालास ‘ऐतिहासिक’ असे संबोधून ‘एफआयआर’मध्ये नामोल्लेख नसूनही या सर्वांना नाहक गोवले, असे सांगितले. पहलू खानचे कुटुंबीय निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करतील, असे त्यांचे वकील अ‍ॅड. कासीम खान म्हणाले. (वृत्तसंस्था)विधेयक मंजुरीनंतर१0 दिवसांत निकालविशेष म्हणजे जमावाच्या झुंडशाहीने कोणाचा मृत्यू झाल्यास आरोपींना किमान जन्मठेप आणि पाच लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करणारे कायदा दुरुस्ती विधेयक राजस्थान विधानसभेने मंजूर केल्याला १० दिवसही झालेले नसताना हा निकाल लागला आहे. दुसरीकडे याच घटनेच्या संदर्भात पोलिसांनी पहलू खान व त्याच्या दोन मुलांविरुद्ध गायींच्या तस्करीच्या आरोपावरून स्वतंत्र गुन्हा नोंदवून आरोपपत्रही दाखल केले आहे. अलीकडे त्या प्रकरणाच्या फेरतपासासाठी न्यायालयात अर्ज केला गेला.

टॅग्स :Courtन्यायालय