शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

आॅलिव्ह रिडले कासवांनीच नष्ट केली आपली अंडी

By admin | Updated: March 7, 2017 04:10 IST

सहा लाख एवढ्या विक्रमी संख्येतील आॅलिव्ह रिडले कासवांनी गहीरमाथा समुद्र किनाऱ्यावरील वाळुत यावर्षी अंडी घातली.

गहीरमाथा (ओडिशा) : सहा लाख एवढ्या विक्रमी संख्येतील आॅलिव्ह रिडले कासवांनी गहीरमाथा समुद्र किनाऱ्यावरील वाळुत यावर्षी अंडी घातली. परंतु जागेच्या प्रचंड टंचाईमुळे कित्येक दशलक्ष अंडी कासवांनीच नष्ट केल्यामुळे वन्यजीवप्रेमी खूपच निराश झाले आहेत. २२ फेब्रुवारी रोजी हा सामुहिक अंडी घालण्याचा महिना सुरू झाला. त्याला अर्रीबादा (कासवांच्या जातींनी मोठ्या प्रमाणात अंडी घालण्यास स्पॅनिश भाषेत अर्रीबादा म्हणतात). या किनाऱ्यावर मनुष्यवस्ती नाही. दोन मार्चच्या रात्रीपर्यंत या ठिकाणी ६ लाख ४ हजार ६४१ आॅलिव्ह रिडले कासवांनी अंडी घातली होती, असे वन्यजीव अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. या जातीच्या कासवांनी सात कोटींपेक्षा जास्त अंडी घातली. तथापि, तीन कोटींपेक्षा जास्त अंड्यांची हानी झाली, असा अंदाज असल्याचे हा अधिकारी म्हणाला. एक किलोमीटर लांबीच्या या किनाऱ्यावर कासवांना अंडी घालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे परंतु ते अंडी घालण्यासाठी विशिष्ट जागेचीच निवड करतात. त्याचा परिणाम किनाऱ्यावर जागेची टंचाई निर्माण झाली, असे गहीरमाथा वन विभागाचे अधिकारी सुब्रत पात्रा म्हणाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कासवांनी अंडी घातल्यामुळे वन्यजीव आनंदले होते. ही अंडी नेहमी नष्ट करणारे तरस किंवा कोल्ह्यांचे कृत्य नाही नाही तर स्वत: कासवांनीच ती मोठ्या प्रमाणावर नष्ट केली आहेत. अंडी घालण्यासाठी योग्य जागेची निवड करताना आधीच घातलेली दश लक्षावधी अंडी कासवांनी नष्ट केली आहेत व ही नासधूस थांबवता येणार नसल्याचे पात्रा म्हणाले.