शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

"प्रभू श्रीरामच आमचे पैगंबर...", भाजपा नेत्या रुबी खान यांचं विधान; म्हणाल्या...सनातन धर्मच सर्वश्रेष्ठ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 14:18 IST

नवरात्रीमध्ये गणेशाची मूर्ती घरी ठेवून उपवास केल्यामुळे चर्चेत आलेल्या उत्तर प्रदेशातील अलिगडमधील भाजप नेत्या रुबी आसिफ खान यांनी पुन्हा एकदा अजब विधान केलं आहे.

नवरात्रीमध्ये गणेशाची मूर्ती घरी ठेवून उपवास केल्यामुळे चर्चेत आलेल्या उत्तर प्रदेशातील अलिगडमधील भाजप नेत्या रुबी आसिफ खान यांनी पुन्हा एकदा अजब विधान केलं आहे. "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रबुद्ध संमेलनामुळे हिंदू-मुस्लीम ऐक्य अधिक बळकट झालं आहे. अनेक मुस्लीम नागरिक या संमेलनाला गेले होते. आता मुस्लीम समाजातील लोकांनाही कळू लागलं आहे की भगवान श्रीराम हेच पैगंबर होते", असं रुबी खान म्हणाल्या. तसंच सनातन धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म असून योगी आदित्यनाथ यांच्या आगमनावेळी प्रबुद्ध संमेलनात मुस्लिम समाजातील लोकांनी जय श्री रामचे नारे दिले, असंही त्या म्हणाल्या.

"देशात कोणताच भेदभाव नाही आणि सर्वच जण एक आहेत असं इथल्या काहींना आता कळालं आहे. हा हिंदुस्तान आहे आणि इथं सर्वांना मिळूनमिसळून राहायला हवं. देशाचं नाव असंच पुढे जात राहिलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींसाठी कट्टरपथींच्या निशाण्यावर मी नेहमीच राहिली आहे. पण मी त्यांना कधीच घाबरणार नाही", असं रुबी खान म्हणाल्या. 

भगवान आणि अल्लाहला मी मानते आणि यापुढेही असाच नमाज व पूजा अर्चा करत राहीन असंही त्या म्हणाल्या. याआधीही माझ्याविरोधात फतवे जारी केले गेले आहेत आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली गेली आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना काही होऊ शकतं. याची लेखी तक्रारही मी दिली आहे असं असतानाही कुटुंबीयांना आजवर कोणतीही सुरक्षा दिली गेलेली नाही, असं रुबी खान म्हणाल्या.

टॅग्स :Politicsराजकारण