शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

"प्रभू श्रीरामच आमचे पैगंबर...", भाजपा नेत्या रुबी खान यांचं विधान; म्हणाल्या...सनातन धर्मच सर्वश्रेष्ठ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 14:18 IST

नवरात्रीमध्ये गणेशाची मूर्ती घरी ठेवून उपवास केल्यामुळे चर्चेत आलेल्या उत्तर प्रदेशातील अलिगडमधील भाजप नेत्या रुबी आसिफ खान यांनी पुन्हा एकदा अजब विधान केलं आहे.

नवरात्रीमध्ये गणेशाची मूर्ती घरी ठेवून उपवास केल्यामुळे चर्चेत आलेल्या उत्तर प्रदेशातील अलिगडमधील भाजप नेत्या रुबी आसिफ खान यांनी पुन्हा एकदा अजब विधान केलं आहे. "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रबुद्ध संमेलनामुळे हिंदू-मुस्लीम ऐक्य अधिक बळकट झालं आहे. अनेक मुस्लीम नागरिक या संमेलनाला गेले होते. आता मुस्लीम समाजातील लोकांनाही कळू लागलं आहे की भगवान श्रीराम हेच पैगंबर होते", असं रुबी खान म्हणाल्या. तसंच सनातन धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म असून योगी आदित्यनाथ यांच्या आगमनावेळी प्रबुद्ध संमेलनात मुस्लिम समाजातील लोकांनी जय श्री रामचे नारे दिले, असंही त्या म्हणाल्या.

"देशात कोणताच भेदभाव नाही आणि सर्वच जण एक आहेत असं इथल्या काहींना आता कळालं आहे. हा हिंदुस्तान आहे आणि इथं सर्वांना मिळूनमिसळून राहायला हवं. देशाचं नाव असंच पुढे जात राहिलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींसाठी कट्टरपथींच्या निशाण्यावर मी नेहमीच राहिली आहे. पण मी त्यांना कधीच घाबरणार नाही", असं रुबी खान म्हणाल्या. 

भगवान आणि अल्लाहला मी मानते आणि यापुढेही असाच नमाज व पूजा अर्चा करत राहीन असंही त्या म्हणाल्या. याआधीही माझ्याविरोधात फतवे जारी केले गेले आहेत आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली गेली आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना काही होऊ शकतं. याची लेखी तक्रारही मी दिली आहे असं असतानाही कुटुंबीयांना आजवर कोणतीही सुरक्षा दिली गेलेली नाही, असं रुबी खान म्हणाल्या.

टॅग्स :Politicsराजकारण