शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

"प्रभू श्रीरामच आमचे पैगंबर...", भाजपा नेत्या रुबी खान यांचं विधान; म्हणाल्या...सनातन धर्मच सर्वश्रेष्ठ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 14:18 IST

नवरात्रीमध्ये गणेशाची मूर्ती घरी ठेवून उपवास केल्यामुळे चर्चेत आलेल्या उत्तर प्रदेशातील अलिगडमधील भाजप नेत्या रुबी आसिफ खान यांनी पुन्हा एकदा अजब विधान केलं आहे.

नवरात्रीमध्ये गणेशाची मूर्ती घरी ठेवून उपवास केल्यामुळे चर्चेत आलेल्या उत्तर प्रदेशातील अलिगडमधील भाजप नेत्या रुबी आसिफ खान यांनी पुन्हा एकदा अजब विधान केलं आहे. "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रबुद्ध संमेलनामुळे हिंदू-मुस्लीम ऐक्य अधिक बळकट झालं आहे. अनेक मुस्लीम नागरिक या संमेलनाला गेले होते. आता मुस्लीम समाजातील लोकांनाही कळू लागलं आहे की भगवान श्रीराम हेच पैगंबर होते", असं रुबी खान म्हणाल्या. तसंच सनातन धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म असून योगी आदित्यनाथ यांच्या आगमनावेळी प्रबुद्ध संमेलनात मुस्लिम समाजातील लोकांनी जय श्री रामचे नारे दिले, असंही त्या म्हणाल्या.

"देशात कोणताच भेदभाव नाही आणि सर्वच जण एक आहेत असं इथल्या काहींना आता कळालं आहे. हा हिंदुस्तान आहे आणि इथं सर्वांना मिळूनमिसळून राहायला हवं. देशाचं नाव असंच पुढे जात राहिलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींसाठी कट्टरपथींच्या निशाण्यावर मी नेहमीच राहिली आहे. पण मी त्यांना कधीच घाबरणार नाही", असं रुबी खान म्हणाल्या. 

भगवान आणि अल्लाहला मी मानते आणि यापुढेही असाच नमाज व पूजा अर्चा करत राहीन असंही त्या म्हणाल्या. याआधीही माझ्याविरोधात फतवे जारी केले गेले आहेत आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली गेली आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना काही होऊ शकतं. याची लेखी तक्रारही मी दिली आहे असं असतानाही कुटुंबीयांना आजवर कोणतीही सुरक्षा दिली गेलेली नाही, असं रुबी खान म्हणाल्या.

टॅग्स :Politicsराजकारण