शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

चिंताजनक! बेरोजगारांना हार्ट अटॅकचा धोका; दशकात १५ टक्के लोक होणार ग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 10:21 IST

संशोधकांनी तरुणांमधील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा (सीव्हीडी) नेमका धोका यात निश्चित केला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नोकरी करणाऱ्यांच्या तुलनेत बेरोजगारांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो. बेरोजगार पुढील १० वर्षांत हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडू शकतात. यात स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा धोका जास्त असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि दिल्ली एम्सच्या संयुक्त वैद्यकीय अभ्यासातून समोर आले आहे. 

हे संशोधन इंडियन जर्नल ऑफ  मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. संशोधकांनी तरुणांमधील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा (सीव्हीडी) नेमका धोका यात निश्चित केला आहे. 

४.५% बेरोजगारांमध्ये धोका गंभीरअभ्यासात या आजारांचे पुढील १० वर्षांत अतिशय कमी, मध्यम आणि उच्च जोखमीचे प्रमाण अनुक्रमे ८४.९, १४.४, ०.७ टक्के असल्याचे आढळून आले. यामध्ये ३४८ बेरोजगारांचा समावेश होता. त्यातील ४.५ टक्के लोकांना पुढील १० वर्षांत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असल्याचे आढळून आले, तर सुमारे १२ टक्के काम करणाऱ्या लोकांना मध्यम धोका असल्याचे आढळून आले.

नेमका कुणा-कुणाला आहे हा धोका?बेंगळूरू स्थित आयसीएमआरचे डॉ. प्रशांत माथूर यांनी सांगितले की, उच्च जोखीम असलेल्या लोकांची लवकर ओळख होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अभ्यासात ४,४८० लोकांना सहभागी करून घेण्यात आले. त्यात ५०% ४० ते ४९ वयोगटातील आहेत. ज्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित राहते, त्यातील जवळपास २५% लोकांना हृदय, रक्तवाहिन्यांचा आजार होण्याचा धोका असतो. १८% लठ्ठ लोकांनाही हा धोका असतो.

शहरी लोकांवर संकट?अभ्यासात, संशोधकांनी शहरी विरुद्ध ग्रामीण लोकसंख्येच्या आधारावर पुढील १० वर्षांमध्ये हृदयविकाराच्या जोखमीचे ही मूल्यांकन केले आहे.

यानुसार, गंभीर धोका शहरी लोकसंख्येमध्ये सर्वाधिक आहे. सुमारे १७.५ टक्के शहरी लोकसंख्येला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा मध्यम ते गंभीर धोका असल्याचे आढळून आले, तर ग्रामीण लोकसंख्येच्या १३.८ टक्के लोकांना या आजारांचा धोका आहे. 

खेड्यातील ८६.२ टक्के लोक हृदयाशी संबंधित आजारांच्या जोखमीपासून मुक्त आहेत.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका