शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

अखनूर हल्ल्याची हाफीझ सईदने घेतली जबाबदारी

By admin | Updated: January 13, 2017 17:13 IST

पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये बोलताना त्याने अखनूर हल्ला सर्जिकल स्ट्राईक असल्याचे सांगितले.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 13 - भारतावर अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणणारा लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीझ सईदने जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 30 भारतीय सैनिकांना मारले असा खोटा दावाही त्याने केला. 
 
सोमवारी अखनूरमधील जीआरईएफच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन कामगार ठार झाले.  पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये बोलताना त्याने अखनूर हल्ला सर्जिकल स्ट्राईक असल्याचे सांगितले. चौघा दहशतवाद्यांनी अखनूरमधील भारतीय सैन्याचे दहा तळ उद्धवस्त केले आणि हे चारही दहशतवादी सुखरुप परतले असे सांगून त्याने जमलेल्या लोकांची दिशाभूल केली. 
 
सईदचे हे भाषण ऊर्दूमध्ये आहे. सईदने या टेपमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लक्ष्य केले. पंतप्रधान मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचा दावा केल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ शांत राहिले म्हणून मी त्यांना उत्तर दिले असे सईदने सांगितले.