शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'कारसेवकांवर लाठीचार्ज, संविधानाचे पालन'; राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 20:03 IST

जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे', असंही अखिलेश यादव म्हणाले. 

अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची देशभरात जोरदार तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार आरोप केले आहेत. 

 ३२ वर्षांपूर्वी अयोध्येत कारसेवकांवर झालेला लाठीचार्ज संविधानाला अनुसरून होता. जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे. अखिलेश यादव म्हणाले, अयोध्येत पहिल्यापासून हवाईपट्टी होती. समाजवादी सरकारच्या काळात विकास झाला आहे. ३२ वर्षांपूर्वी अयोध्येत कारसेवकांवर झालेला लाठीचार्ज संविधानाला अनुसरून होता. जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे', असंही अखिलेश यादव म्हणाले. 

अखिलेश यादव म्हणाले, अयोध्येत वातावरण तयार केले जात आहे. विकास कोणीही रोखू शकत नाही. अयोध्येत आधीच हवाई पट्टी होती. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना योग्य मोबदला मिळाला का? समाजवादी सरकारच्या काळात खूप विकास झाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर बांधले जात आहे. मंदिर बांधले तर कोणाला आनंद होणार नाही?, असा सवालही यादव यांनी केला.

"तुम्ही अयोध्येत विमानतळ बांधले, पण तुम्ही संपादित केलेल्या जमिनीच्या ६ पट मोबदला मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती, ती मिळाली का? रेल्वे स्थानके नेहमीच बांधली जात आहेत. ही चांगली गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिर बांधले जात असल्याचे तुम्ही म्हणालात, ही आनंदाची गोष्ट आहे. पण, एक तरुण आपला बायोडाटा घेऊन फिरत होता, त्याला रोजगार हवा होता. 

'रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मला कोणाकडूनही निमंत्रण मिळालेले नाही. मी याबाबत बोलल्यानंतर मला अयोध्येहून स्पीड पोस्टने निमंत्रण मिळाले. राम मंदिराच्या उद्घाटन निमंत्रणावरुनही राजकारण केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

३२ वर्षांपूर्वी अयोध्येत कारसेवकांवर झालेला लाठीचार्ज संविधानाला अनुसरून होता. जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे. इंडिया आघाडी, पीडीए ही आमची रणनीती असल्याचे अखिलेश यादव म्हणाले. लोकसभा निवडणुकीत फक्त पीडीएच एनडीएचा पराभव करेल, असंही यादव म्हणाले.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवRam Mandirराम मंदिर