शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

सिमकार्डाच्या ‘आधार’ जोडणीस एअरटेलला बंदी, अंतरिम आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:40 IST

मोबाइल फोन ग्राहकांच्या सिमकार्डाची ‘आधार’शी जोडणी करण्यासाठी ई-केवायसी प्रणालीचा वापर करण्यास ‘युनिक आयडेन्टिटी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’ (यूआयडीएआय) भारती एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँकेस तात्पुरती बंदी केली आहे.

नवी दिल्ली : मोबाइल फोन ग्राहकांच्या सिमकार्डाची ‘आधार’शी जोडणी करण्यासाठी ई-केवायसी प्रणालीचा वापर करण्यास ‘युनिक आयडेन्टिटी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’ (यूआयडीएआय) भारती एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँकेस तात्पुरती बंदी केली आहे.‘यूआयडीएआय’ हे नागरिकांना ‘आधार’ कार्ड जारी करणारे प्राधिकरण आहे. एअरटेलच्या मोबाइल फोनधारकाने त्याचे सिमकार्ड ‘आधार’शी जोडून घेतले की त्याच डेटाचा वापर करून एअरटेल बँकेत त्याचे खाते नको असताना उघडले जाते आणि त्या ग्राहकास मिळणारे स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदानही परस्पर त्या खात्यात वळते होते, अशा असंख्य तक्रारी आल्यानंतर प्राधिकरणाने हा अंतरिम मनाई आदेश जारी केला आहे. सिमकार्डांची ‘आधार’शी जोडणी सक्तीची केल्यापासून त्या प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याबद्दल कोणाही मोबाइल फोन कंपनीविरुद्ध असा आदेश काढला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.आत्तापर्यंत सिमकार्डाची ‘आधार’शी जोडणी केलेल्या एअरटेलच्या सुमारे २३ लाख ग्राहकांची खाती एअरटेल बँकेत उघडली गेली असून त्यात गॅसच्या अनुदानाचे सुमारे ४७ कोटी रुपये परस्पर जमा झाले आहेत, अशी ढोबळ आकडेवारी उपलब्ध आहे. माहीतगार सूत्रांनुसार या अंतरिम आदेशाने प्राधिकरणाने भारती एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँक यांचे ई-केवायसी परवाने तूर्तास निलंबित केले आहेत. परिणामी हा आदेश लागू असेपर्यंत एअरटेल त्यांच्या ग्राहकांच्या सिमकार्डाच्या ‘ई व्हेरिफिकेशन’साठी ‘आधार’ कार्डाचा आणि त्याच्याशी संबंधित यंत्रणेचा वापर करू शकणार नाही. तसेच सिम व्हेरिफिकेशनसाठी प्राप्त झालेल्या ‘आधार’च्या माहितीचा उपयोग करून एअरटेल पेमेंट बँक त्या ग्राहकाचे त्याच्या संमतीविना खातेही उघडू शकणार नाही. प्राधिकरणाने असा आदेश दिला आहे यास भारती एअरटेलच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला व यातून लवकरात लवकर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे आश्वासन दिले. दरम्यानच्या काळात ग्राहकांच्या होणाºया गैरसोयीबद्दल प्रवक्त्याने दिलगिरीही व्यक्त केली.पहिली तक्रार जोग यांचीमुंबईत गिरगाव येथे राहणारे गोपाळ महादेव जोग यांना एअरटेलचा हा अनुभव १५ जून रोजी आल्यावर त्यांनी यासंदर्भात सर्वप्रथम तक्रार केली. त्यांनी पंतप्रधान कार्यालय व रिझर्व्ह बँकेकडेही गाºहाणे मांडले. एअरटेल बँक आमच्या अकत्यारीत येत नाही, असे सांगून रिझर्व्ह बँकेने हात वर केले.- जोग यांचे खाते बंद करण्यात आले आहे, असे एअरटेल पेमेंट बँकेने कळविल्याने पंतप्रधान कार्यालयाने त्यांची तक्रार निकाली काढली. प्रत्यक्षात एअरटेल बँकेने पंतप्रधान कार्यालयाची दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाले.- कारण त्यांचे बँक खाते अद्यापही बंद झालेले नाही व हयात नसलेल्या वडिलांच्या नावाची खात्यात ‘नॉमिनी’ म्हणून नोंद केल्याचे किंवा ‘तुमचे प्रोफाईल अपडेट करण्यात आले आहे’ असे एसएमएस त्यांना एअरटेल पेमेंट बँकेकडून अजूनही येत आहेत.

टॅग्स :Airtelएअरटेल