शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पाकिस्तानची पाणबुडी 5 दिवसांत मुंबईला पोहचली असती तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 10:14 IST

भारताचा आक्रमक पवित्रा पाहून तसेच सागरी सीमेवर नौदलाची गस्त वाढल्याने पाकिस्ताला असं वाटतं होतं की, पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी नौदलाचा वापर केला जाऊ शकतो

नवी दिल्ली- पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने बालकोट भागात एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांच्या तळांना टार्गेट केलं होतं पण त्याच दरम्यान समुद्राच्या मार्गाने पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठी भारतीय नौदल सज्ज होतं. भारतीय नौदलाला अभ्यास सोडून पाकिस्तानच्या सागरी सीमेवर तैनात करण्यात आलं होतं. ज्यामध्ये परमाणू आणि पारंपारिक पाणबुड्याचा समावेश करण्यात आला होता. 

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताचा आक्रमक पवित्रा पाहून तसेच सागरी सीमेवर नौदलाची गस्त वाढल्याने पाकिस्ताला असं वाटतं होतं की, पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी नौदलाचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे भारत पाकिस्तान सेनेच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेऊन होते. बालकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानची शक्तिशाली पाणबुडी पीएनएस साद ही अचानक गायब झाली. पीएनएस साद गायब झाल्याने भारतीय नौदल तातडीनं सज्ज झालं होतं. 

कारण अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार पीएनएस साद कराची जवळून गायब झालं होतं. ती पाणबुडी तीन दिवसांत गुजरातच्या तटावर आणि पाच दिवसांत मुंबईच्या पश्चिम तटावरील मुख्यालयाजवळ पोहचू शकत होतं. त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते गंभीर होतं. भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी युद्ध नौका आणि विमाने तैनात करुन शोधमोहीम हाती घेतली होती. 

गुजरात, महाराष्ट्रासह अनेक राज्याच्या सागरी तटांवर भारतीय नौदल आणि पी-8 विमाने टेहाळणी करत होते. नौदलाकडून स्पष्टपणे जवानांना आदेश देण्यात आला होता की, जर पीएनएस साद पाणबुडी भारतीय सागरी सीमेत प्रवेश केला तर त्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जावी. 21 दिवसांच्या या शोधमोहिमेनंतर गायब झालेली पीएनएस पाणबुडी पाकिस्तानच्या पश्चिमी तटावर आढळून आली. 

बालकोट एअर स्ट्राईकनंतर पाक आणि भारतात तणावाची परिस्थिती वाढत गेली. त्यामुळे भारतीय नौदलाने आयएनएस विक्रमादित्यसह 60 युद्ध नौका अरबी समुद्राच्या उत्तरेकडे तैनात केली होती. भारत कोणत्याही प्रकारची कारवाई करु शकतं या भीतीने पाकिस्तानने पीएनएस साद ही पाणबुडी पश्चिमेच्या तटावर लपविली होती. बालकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी नौदलाच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय नौदलाचं लक्ष्य होतं. 

 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलPakistanपाकिस्तानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला