शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

पाकिस्तानची पाणबुडी 5 दिवसांत मुंबईला पोहचली असती तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 10:14 IST

भारताचा आक्रमक पवित्रा पाहून तसेच सागरी सीमेवर नौदलाची गस्त वाढल्याने पाकिस्ताला असं वाटतं होतं की, पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी नौदलाचा वापर केला जाऊ शकतो

नवी दिल्ली- पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने बालकोट भागात एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांच्या तळांना टार्गेट केलं होतं पण त्याच दरम्यान समुद्राच्या मार्गाने पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठी भारतीय नौदल सज्ज होतं. भारतीय नौदलाला अभ्यास सोडून पाकिस्तानच्या सागरी सीमेवर तैनात करण्यात आलं होतं. ज्यामध्ये परमाणू आणि पारंपारिक पाणबुड्याचा समावेश करण्यात आला होता. 

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताचा आक्रमक पवित्रा पाहून तसेच सागरी सीमेवर नौदलाची गस्त वाढल्याने पाकिस्ताला असं वाटतं होतं की, पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी नौदलाचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे भारत पाकिस्तान सेनेच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेऊन होते. बालकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानची शक्तिशाली पाणबुडी पीएनएस साद ही अचानक गायब झाली. पीएनएस साद गायब झाल्याने भारतीय नौदल तातडीनं सज्ज झालं होतं. 

कारण अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार पीएनएस साद कराची जवळून गायब झालं होतं. ती पाणबुडी तीन दिवसांत गुजरातच्या तटावर आणि पाच दिवसांत मुंबईच्या पश्चिम तटावरील मुख्यालयाजवळ पोहचू शकत होतं. त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते गंभीर होतं. भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी युद्ध नौका आणि विमाने तैनात करुन शोधमोहीम हाती घेतली होती. 

गुजरात, महाराष्ट्रासह अनेक राज्याच्या सागरी तटांवर भारतीय नौदल आणि पी-8 विमाने टेहाळणी करत होते. नौदलाकडून स्पष्टपणे जवानांना आदेश देण्यात आला होता की, जर पीएनएस साद पाणबुडी भारतीय सागरी सीमेत प्रवेश केला तर त्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जावी. 21 दिवसांच्या या शोधमोहिमेनंतर गायब झालेली पीएनएस पाणबुडी पाकिस्तानच्या पश्चिमी तटावर आढळून आली. 

बालकोट एअर स्ट्राईकनंतर पाक आणि भारतात तणावाची परिस्थिती वाढत गेली. त्यामुळे भारतीय नौदलाने आयएनएस विक्रमादित्यसह 60 युद्ध नौका अरबी समुद्राच्या उत्तरेकडे तैनात केली होती. भारत कोणत्याही प्रकारची कारवाई करु शकतं या भीतीने पाकिस्तानने पीएनएस साद ही पाणबुडी पश्चिमेच्या तटावर लपविली होती. बालकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी नौदलाच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय नौदलाचं लक्ष्य होतं. 

 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलPakistanपाकिस्तानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला