शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
4
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
5
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
6
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
7
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
8
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
9
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
10
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
11
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
12
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
13
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
14
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
15
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
16
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
17
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
18
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
19
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

एअर इंडिया मोठा निर्णय घेणार; काही कर्मचाऱ्यांना ५ वर्षे बिनपगारी सुट्टीवर पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 18:21 IST

आर्थिक संकटात सापडलेल्या एअर इंडियाकडून मोठ्या निर्णयाची तयारी सुरू

नवी दिल्ली: आर्थिक संकटात सापडलेली एअर इंडिया (Air India) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. एअर इंडियाकडून काही कर्मचाऱ्यांनी बिनपगारी सुट्टीवर (Leave Without Pay) पाठवण्यात येईल. यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, आरोग्य यांचा विचार केला जाईल. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना पाच वर्षे बिनपगारी सुट्टी देण्यात येईल.गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया आर्थिक संकटात आहे. त्यात आता कोरोनामुळे झालेल्या नुकसानाची भर पडली आहे. कोरोनाचा मोठा फटका विमान कंपन्यांना बसला आहे. आधीच आर्थिक अडचणींचा सामना कराव्या लागणाऱ्या एअर इंडियाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळेच एअर इंडिया आपल्या काही कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजेवर पाठवणार आहे.आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी एअर इंडियाचे प्रयत्न सुरू आहेत. कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजेवर पाठवणं याच प्रयत्नांचा भाग आहे. किमान ६ महिने ते २ वर्षांपर्यंत कर्मचाऱ्यांना रजेवर पाठवण्याची तयारी कंपनीकडून सुरू आहे. हा कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. कर्मचाऱ्याचं आरोग्य, त्याची कार्यक्षमता आणि त्याची गरज यावरून व्यवस्थापन याबद्दलचा विचार करेल.यादी तयार करण्याचं काम सुरूएअर इंडियाच्या मुख्यालयातल्या विभागीय प्रमुखांनी आणि प्रादेशिक कार्यालयातल्या प्रादेशिक संचालकांनी कर्मचाऱ्यांचं मूल्यांकन सुरू केलं आहे. आरोग्य, कार्यक्षमता आणि गरज या तीन निकषांचा विचार करून अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाईल. त्यानंतर यादीला संचालकांकडून मंजुरी मिळेल.कोणकोणते निकष लावले जाणार?एअर इंडियाच्या व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांच्या मूल्यमापनाचे निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांची उपयुक्तता, कार्यक्षमता, कामाचा दर्जा, आरोग्य यांचा विचार केला जाणार आहे. याशिवाय त्यांनी आतापर्यंत किती सुट्ट्या घेतल्या आहेत, त्यांचं प्रमाण किती, ही बाबदेखील मूल्यांकनादरम्यान विचारात घेतली जाईल. त्यानंतर बिनपगारी सुट्टीवर पाठवण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाईल. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया