शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

एअर इंडिया मोठा निर्णय घेणार; काही कर्मचाऱ्यांना ५ वर्षे बिनपगारी सुट्टीवर पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 18:21 IST

आर्थिक संकटात सापडलेल्या एअर इंडियाकडून मोठ्या निर्णयाची तयारी सुरू

नवी दिल्ली: आर्थिक संकटात सापडलेली एअर इंडिया (Air India) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. एअर इंडियाकडून काही कर्मचाऱ्यांनी बिनपगारी सुट्टीवर (Leave Without Pay) पाठवण्यात येईल. यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, आरोग्य यांचा विचार केला जाईल. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना पाच वर्षे बिनपगारी सुट्टी देण्यात येईल.गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया आर्थिक संकटात आहे. त्यात आता कोरोनामुळे झालेल्या नुकसानाची भर पडली आहे. कोरोनाचा मोठा फटका विमान कंपन्यांना बसला आहे. आधीच आर्थिक अडचणींचा सामना कराव्या लागणाऱ्या एअर इंडियाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळेच एअर इंडिया आपल्या काही कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजेवर पाठवणार आहे.आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी एअर इंडियाचे प्रयत्न सुरू आहेत. कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजेवर पाठवणं याच प्रयत्नांचा भाग आहे. किमान ६ महिने ते २ वर्षांपर्यंत कर्मचाऱ्यांना रजेवर पाठवण्याची तयारी कंपनीकडून सुरू आहे. हा कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. कर्मचाऱ्याचं आरोग्य, त्याची कार्यक्षमता आणि त्याची गरज यावरून व्यवस्थापन याबद्दलचा विचार करेल.यादी तयार करण्याचं काम सुरूएअर इंडियाच्या मुख्यालयातल्या विभागीय प्रमुखांनी आणि प्रादेशिक कार्यालयातल्या प्रादेशिक संचालकांनी कर्मचाऱ्यांचं मूल्यांकन सुरू केलं आहे. आरोग्य, कार्यक्षमता आणि गरज या तीन निकषांचा विचार करून अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाईल. त्यानंतर यादीला संचालकांकडून मंजुरी मिळेल.कोणकोणते निकष लावले जाणार?एअर इंडियाच्या व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांच्या मूल्यमापनाचे निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांची उपयुक्तता, कार्यक्षमता, कामाचा दर्जा, आरोग्य यांचा विचार केला जाणार आहे. याशिवाय त्यांनी आतापर्यंत किती सुट्ट्या घेतल्या आहेत, त्यांचं प्रमाण किती, ही बाबदेखील मूल्यांकनादरम्यान विचारात घेतली जाईल. त्यानंतर बिनपगारी सुट्टीवर पाठवण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाईल. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया