शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

एअर इंडिया मोठा निर्णय घेणार; काही कर्मचाऱ्यांना ५ वर्षे बिनपगारी सुट्टीवर पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 18:21 IST

आर्थिक संकटात सापडलेल्या एअर इंडियाकडून मोठ्या निर्णयाची तयारी सुरू

नवी दिल्ली: आर्थिक संकटात सापडलेली एअर इंडिया (Air India) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. एअर इंडियाकडून काही कर्मचाऱ्यांनी बिनपगारी सुट्टीवर (Leave Without Pay) पाठवण्यात येईल. यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, आरोग्य यांचा विचार केला जाईल. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना पाच वर्षे बिनपगारी सुट्टी देण्यात येईल.गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया आर्थिक संकटात आहे. त्यात आता कोरोनामुळे झालेल्या नुकसानाची भर पडली आहे. कोरोनाचा मोठा फटका विमान कंपन्यांना बसला आहे. आधीच आर्थिक अडचणींचा सामना कराव्या लागणाऱ्या एअर इंडियाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळेच एअर इंडिया आपल्या काही कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजेवर पाठवणार आहे.आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी एअर इंडियाचे प्रयत्न सुरू आहेत. कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजेवर पाठवणं याच प्रयत्नांचा भाग आहे. किमान ६ महिने ते २ वर्षांपर्यंत कर्मचाऱ्यांना रजेवर पाठवण्याची तयारी कंपनीकडून सुरू आहे. हा कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. कर्मचाऱ्याचं आरोग्य, त्याची कार्यक्षमता आणि त्याची गरज यावरून व्यवस्थापन याबद्दलचा विचार करेल.यादी तयार करण्याचं काम सुरूएअर इंडियाच्या मुख्यालयातल्या विभागीय प्रमुखांनी आणि प्रादेशिक कार्यालयातल्या प्रादेशिक संचालकांनी कर्मचाऱ्यांचं मूल्यांकन सुरू केलं आहे. आरोग्य, कार्यक्षमता आणि गरज या तीन निकषांचा विचार करून अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाईल. त्यानंतर यादीला संचालकांकडून मंजुरी मिळेल.कोणकोणते निकष लावले जाणार?एअर इंडियाच्या व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांच्या मूल्यमापनाचे निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांची उपयुक्तता, कार्यक्षमता, कामाचा दर्जा, आरोग्य यांचा विचार केला जाणार आहे. याशिवाय त्यांनी आतापर्यंत किती सुट्ट्या घेतल्या आहेत, त्यांचं प्रमाण किती, ही बाबदेखील मूल्यांकनादरम्यान विचारात घेतली जाईल. त्यानंतर बिनपगारी सुट्टीवर पाठवण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाईल. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया