शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

१७ सेवाबाह्य विमाने पुन्हा ताफ्यात घेण्याची ‘एअर इंडिया’ची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 04:07 IST

सेवाबाह्य असलेल्या सर्व १७ विमानांना ऑक्टोबरपर्यंत सेवेत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आठ विमाने तर आॅगस्टपर्यंतच सेवेत येतील.

नवी दिल्ली : जमिनीवर आणलेली(ग्राउंडेड) सर्व १७ विमाने आॅक्टोबर अखेरपर्यंत पुन्हा सेवेत घेण्याची तयारी एअर इंडियाने चालविली आहे. एअर इंडियाचे प्रमुख अश्वनी लोहानी यांनी ही माहिती दिली. दुरुस्ती आणि देखभालीसाठी निधी नसल्यामुळे ही विमाने सेवेतून काढून टाकण्यात आली होती. ही विमाने चार महिन्यांपासून एक वर्षाच्या काळापर्यंत सेवेबाहेर आहेत.

एअर इंडियाचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, सेवाबाह्य असलेल्या सर्व १७ विमानांना आॅक्टोबरपर्यंत सेवेत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आठ विमाने तर आॅगस्टपर्यंतच सेवेत येतील. या आठ विमानांपैकी चार विमाने ए२0 जातीची आहेत. एक विमान बी७४७ जातीचे, एक बी ७७७ आणि दोन बी ७८७ जातीची आहेत. उरलेली सर्व नऊ विमाने ए३२0 जातीची असून देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्यास त्यांनाही आॅक्टोबरपर्यंत सेवेत घेण्याचा प्रयत्न आहे.

लोहानी यांनी सांगितले की, आम्ही महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यासाठीच सेवेबाहेर असलेल्या विमानांना पुन्हा सेवेत आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. ही विमाने नव्या मार्गांवर चालविली जातील. ही विमाने लवकरात लवकर उड्डाण भरतील, असा आम्हाला विश्वास आहे.

दरम्यान, एअर इंडियाकडून काही नव्या आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमान सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा नागरी उड्डयनमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काही आठवड्यांपूर्वी केली होती. मुंबई-नैरोबी आणि दिल्ली-चेन्नई-बाली या मार्गांवर अनुक्रमे २७ सप्टेंबर आणि २७ आॅक्टोबरपासून विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. पुरी यांनी ३ जुलै रोजी राज्यसभेत सांगितले की, एअर इंडियाची विक्री करण्यास सरकार बांधील आहे. त्याआधी एअर इंडियाला परिचालन दृष्ट्या व्यवहार केले जाईल.