शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus: तिसरी लाट टाळता येत नाही; ६ ते ८ आठवड्यांत धडकण्याची शक्यता; एम्सच्या प्रमुख डॉक्टरांनी केलं सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 12:18 IST

corona virus : मार्चअखेर सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या टप्प्यानंतर देशाच्या बर्‍याच भागात अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तज्ज्ञांनी गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत इशारा दिला होता.

नवी दिल्ली : कोरोना व्हायसरची तिसरी लाट येत्या सहा ते आठ आठवड्यांत भारतात येण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती एम्सचे (AIIMS ) प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. कोरोनाची तिसरी लाट टाळता येत नाही, असेही त्यांनी सूचित केले आहे. मार्चअखेर सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या टप्प्यानंतर देशाच्या बर्‍याच भागात अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तज्ज्ञांनी गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत इशारा दिला होता. (aiims director randeep guleria said third wave of corona may come in next 6 to 8 weeks report)

डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी 'एनडीटीव्ही'शी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, 'आता आम्ही अनलॉक करणे सुरू केले आहे, परंतू पुन्हा कोविडशी संबंधित व्यवहारांचा अभाव दिसत आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लाट दरम्यान जे घडले, त्यावरून आपण काही शिकलो आहोत असे दिसत नाही. लोक पुन्हा एकत्र येऊ लागले आहेत... लोक एकत्र येत आहेत. परंतु पुढील 6 ते 8 आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते ... किंवा कदाचित याला थोडासा वेळ लागू शकेल.' याचबरोबर, ते म्हणाले, 'आम्ही कोविडशी संबंधित नियम कसे हाताळत आहोत आणि गर्दी टाळत आहोत यावर अवलंबून आहे.'

महाराष्ट्रात जास्त धोका!नुकत्याच झालेल्या एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, महाराष्ट्रात अंदाज बांधलेल्या वेळेआधीच कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गठित तज्ज्ञ समितीने ही माहिती दिली. तज्ज्ञ म्हणाले होते की,  राज्यातील अनेक भागात कोरोना नियम शिथिल गेल्यानंतर गर्दी दिसून आली आहे. अशा परिस्थितीत कोरोना प्रकरणांची संख्या  पटकन वाढू शकते. तसेच, रिपोर्टनुसार, तज्ज्ञांनी असा इशारा दिला होता की, तिसऱ्या लाटेत राज्यात आठ लाख कोरोनाची अॅक्टिव्ह प्रकरणे येऊ शकतात.

 

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टमध्ये रायटर्सच्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, ऑक्टोबरपर्यंत देशात तिसरी लाट येऊ शकते. या सर्वेक्षणात जगभरातील 40 तज्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक, साथीचे रोगशास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांकडून माहिती घेण्यात आली. त्यानुसार, तिसऱ्या लाटेपर्यंत अधिकाधिक लोकांना लसीकरण करून लाट नियंत्रित केली जाऊ शकते. तसेच, दुसर्‍या लाटेच्या तुलनेत संभाव्य तिसर्‍या लाटेत ही प्रकरणे कमी आहेत, असेही म्हटले आहे.

मुलांवर परिणाम होणार नाही! अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासानुसार, मुलांमध्ये हाय सीरो-पॉझिटिव्हिटी असल्याचे दिसून आले आहे. यामुळे असे म्हटले जात आहे की तिसऱ्या लाटेचा फारसा परिणाम मुलांवर होणार नाही. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या