शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

जोशीमठ बाधितांना दीड लाखांची मदत; स्थानिकांचे मन वळविण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 07:43 IST

बाधित नागरिक पाडापाडी सुरू होण्यापूर्वी बद्रीनाथच्या धर्तीवर नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.

डेहराडून : उत्तराखंडमधील जोशीमठ येथील दोन आलिशान हॉटेल्स पाडण्यास विरोध करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांचे आणि स्थानिकांचे मन वळवण्यासाठी बुधवारी प्रशासनाकडून नव्याने प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या सचिव मीनाक्षी सुंदरम आणि आंदोलक यांच्यात चर्चेची एक नवीन फेरी पार पडली. 

बाधित नागरिक पाडापाडी सुरू होण्यापूर्वी बद्रीनाथच्या धर्तीवर नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. ‘मलारी इन’ आणि ‘माउंट व्ह्यू’ ही हॉटेल्स धोकादायकपणे एकमेकांकडे झुकत आहेत, ज्यामुळे इमारतींच्या आजूबाजूच्या मानवी वसाहतींना धोका निर्माण झाला आहे. उत्तराखंड सरकारने सोमवारी या दोन इमारतींपासून सुरुवात करून अस्थिर संरचना पाडण्याचे निर्देश दिले होते.

सरकारी भरपाईवर नाखूश

जमीन खचण्यामुळे घरांचे नुकसान झालेल्यांना राज्य सरकारने दीड लाख रुपयांची भरपाई दिली असून, ती लोकांनी फेटाळली आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री पुष्कर धामी हे स्थानिक लोकांना सुरक्षेचा विश्वास दर्शविण्यासाठी व प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी रात्रभर जोशीमठमध्ये तळ ठोकून होते.

घटना का घडली?

सुमारे १२ वर्षांपूर्वीच्या एक जलविद्युत प्रकल्पासाठी जमिनीत बोगदा तयार करताना एक मोठी टनल बोरिंग मशीन जोशीमठजवळ अचानक फसली. जमिनीत साचलेले पाणी यावेळी वाहू लागले. अनेक महिने उलटले तरी पाणी थांबले नाही. पाणी वाहून गेल्यामुळे पर्वत पोकळ झाला. आता जोशीमठ खचण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, असे पद्म पुरस्काराने सन्मानित पर्यावरणतज्ज्ञ डॉ. अनिल पी. जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड