शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची करतात वसुली", बिहारच्या कृषीमंत्र्यांचे मोठे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 20:16 IST

sudhakar singh : कैमूर येथील भगवानपूर येथे आयोजित शेतकरी चर्चासत्राला सुधाकर सिंह यांनी संबोधित केले. 

कैमूर : बिहारमधील कैमूर येथील भगवानपूर येथे आयोजित शेतकरी चर्चासत्राला संबोधित करताना कृषीमंत्री सुधाकर सिंह म्हणाले की, माझ्या विभागातील अधिकारी भ्रष्ट आहेत. 25 ते 50 हजार रुपयांची वसुली करतात. मात्र लवकरच सर्व अधिकारी ठीक होतील, असे बिहारचे कृषीमंत्री सुधाकर सिंह म्हणाले. कैमूर येथील भगवानपूर येथे आयोजित शेतकरी चर्चासत्राला त्यांनी संबोधित केले. 

यावेळी एका घटनेचा संदर्भ देत सुधाकर सिंह म्हणाले की, "मोजमाप अधिकारी रात्री दहा वाजता पेट्रोल पंपावर 10 लिटर तेल घेऊन गेले. पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केली असता, रजिस्टरवर लिहा, असे सांगितले. तक्रार प्राप्त होताच दखल घेत. त्या अधिकाऱ्याला आजपासून निलंबित करण्यात आले आहे. पण जेव्हा तो दिसेल तेव्हा तुम्ही त्याला बुटाने माराल. त्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या जागी एक प्रामाणिक अधिकारी येणार आहे."

आता अनुदानाचे पैसे बाजार समिती आणि मंडई बनवण्यासाठी खर्च होणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. तसेच, कैमूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त ब्लॉक अधौरा येथे चार मंडई बांधण्यात येणार आहेत. बियाणे महामंडळाकडून शेतकऱ्यांना बनावट बियाणे देण्यात आले आहे. बियाणे वेळेपूर्वी पेरले गेले आणि पिकाचा दर्जा खूपच खराब आहे. आठवडाभरात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे सुधाकर सिंह म्हणाले.

गेल्या 17 वर्षांपासून ही व्यवस्था जीर्ण झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या डझनभर योजना घेऊन येत आहे. शेतीशी संबंधित लोकांना रोजगार मिळेल. आता महिनाभरापासून हे काम सुरू आहे, मात्र या एका महिन्यात बिहारमधील 3000 खतांच्या दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहेत. या दुकानांमधून फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले होते,असे सुधाकर सिंह यांनी सांगितले.

वस्तुस्थिती अशी आहे की, माझ्या कार्यकाळात कोणत्याही खताच्या दुकानावर लाईन नव्हती. मी एक अॅप आणणार आहे, त्या अॅपवरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आणि ब्लॉकमधील खतांच्या दुकानात किती खत उपलब्ध आहे हे कळेल. शेतकऱ्यांशी निगडित मूलभूत समस्या तीन वर्षांत सोडवल्या जातील, असेही सुधाकर सिंह यांनी म्हणाले.

टॅग्स :Biharबिहारagricultureशेती