शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची करतात वसुली", बिहारच्या कृषीमंत्र्यांचे मोठे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 20:16 IST

sudhakar singh : कैमूर येथील भगवानपूर येथे आयोजित शेतकरी चर्चासत्राला सुधाकर सिंह यांनी संबोधित केले. 

कैमूर : बिहारमधील कैमूर येथील भगवानपूर येथे आयोजित शेतकरी चर्चासत्राला संबोधित करताना कृषीमंत्री सुधाकर सिंह म्हणाले की, माझ्या विभागातील अधिकारी भ्रष्ट आहेत. 25 ते 50 हजार रुपयांची वसुली करतात. मात्र लवकरच सर्व अधिकारी ठीक होतील, असे बिहारचे कृषीमंत्री सुधाकर सिंह म्हणाले. कैमूर येथील भगवानपूर येथे आयोजित शेतकरी चर्चासत्राला त्यांनी संबोधित केले. 

यावेळी एका घटनेचा संदर्भ देत सुधाकर सिंह म्हणाले की, "मोजमाप अधिकारी रात्री दहा वाजता पेट्रोल पंपावर 10 लिटर तेल घेऊन गेले. पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केली असता, रजिस्टरवर लिहा, असे सांगितले. तक्रार प्राप्त होताच दखल घेत. त्या अधिकाऱ्याला आजपासून निलंबित करण्यात आले आहे. पण जेव्हा तो दिसेल तेव्हा तुम्ही त्याला बुटाने माराल. त्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या जागी एक प्रामाणिक अधिकारी येणार आहे."

आता अनुदानाचे पैसे बाजार समिती आणि मंडई बनवण्यासाठी खर्च होणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. तसेच, कैमूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त ब्लॉक अधौरा येथे चार मंडई बांधण्यात येणार आहेत. बियाणे महामंडळाकडून शेतकऱ्यांना बनावट बियाणे देण्यात आले आहे. बियाणे वेळेपूर्वी पेरले गेले आणि पिकाचा दर्जा खूपच खराब आहे. आठवडाभरात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे सुधाकर सिंह म्हणाले.

गेल्या 17 वर्षांपासून ही व्यवस्था जीर्ण झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या डझनभर योजना घेऊन येत आहे. शेतीशी संबंधित लोकांना रोजगार मिळेल. आता महिनाभरापासून हे काम सुरू आहे, मात्र या एका महिन्यात बिहारमधील 3000 खतांच्या दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहेत. या दुकानांमधून फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले होते,असे सुधाकर सिंह यांनी सांगितले.

वस्तुस्थिती अशी आहे की, माझ्या कार्यकाळात कोणत्याही खताच्या दुकानावर लाईन नव्हती. मी एक अॅप आणणार आहे, त्या अॅपवरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आणि ब्लॉकमधील खतांच्या दुकानात किती खत उपलब्ध आहे हे कळेल. शेतकऱ्यांशी निगडित मूलभूत समस्या तीन वर्षांत सोडवल्या जातील, असेही सुधाकर सिंह यांनी म्हणाले.

टॅग्स :Biharबिहारagricultureशेती