शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची करतात वसुली", बिहारच्या कृषीमंत्र्यांचे मोठे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 20:16 IST

sudhakar singh : कैमूर येथील भगवानपूर येथे आयोजित शेतकरी चर्चासत्राला सुधाकर सिंह यांनी संबोधित केले. 

कैमूर : बिहारमधील कैमूर येथील भगवानपूर येथे आयोजित शेतकरी चर्चासत्राला संबोधित करताना कृषीमंत्री सुधाकर सिंह म्हणाले की, माझ्या विभागातील अधिकारी भ्रष्ट आहेत. 25 ते 50 हजार रुपयांची वसुली करतात. मात्र लवकरच सर्व अधिकारी ठीक होतील, असे बिहारचे कृषीमंत्री सुधाकर सिंह म्हणाले. कैमूर येथील भगवानपूर येथे आयोजित शेतकरी चर्चासत्राला त्यांनी संबोधित केले. 

यावेळी एका घटनेचा संदर्भ देत सुधाकर सिंह म्हणाले की, "मोजमाप अधिकारी रात्री दहा वाजता पेट्रोल पंपावर 10 लिटर तेल घेऊन गेले. पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केली असता, रजिस्टरवर लिहा, असे सांगितले. तक्रार प्राप्त होताच दखल घेत. त्या अधिकाऱ्याला आजपासून निलंबित करण्यात आले आहे. पण जेव्हा तो दिसेल तेव्हा तुम्ही त्याला बुटाने माराल. त्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या जागी एक प्रामाणिक अधिकारी येणार आहे."

आता अनुदानाचे पैसे बाजार समिती आणि मंडई बनवण्यासाठी खर्च होणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. तसेच, कैमूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त ब्लॉक अधौरा येथे चार मंडई बांधण्यात येणार आहेत. बियाणे महामंडळाकडून शेतकऱ्यांना बनावट बियाणे देण्यात आले आहे. बियाणे वेळेपूर्वी पेरले गेले आणि पिकाचा दर्जा खूपच खराब आहे. आठवडाभरात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे सुधाकर सिंह म्हणाले.

गेल्या 17 वर्षांपासून ही व्यवस्था जीर्ण झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या डझनभर योजना घेऊन येत आहे. शेतीशी संबंधित लोकांना रोजगार मिळेल. आता महिनाभरापासून हे काम सुरू आहे, मात्र या एका महिन्यात बिहारमधील 3000 खतांच्या दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहेत. या दुकानांमधून फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले होते,असे सुधाकर सिंह यांनी सांगितले.

वस्तुस्थिती अशी आहे की, माझ्या कार्यकाळात कोणत्याही खताच्या दुकानावर लाईन नव्हती. मी एक अॅप आणणार आहे, त्या अॅपवरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आणि ब्लॉकमधील खतांच्या दुकानात किती खत उपलब्ध आहे हे कळेल. शेतकऱ्यांशी निगडित मूलभूत समस्या तीन वर्षांत सोडवल्या जातील, असेही सुधाकर सिंह यांनी म्हणाले.

टॅग्स :Biharबिहारagricultureशेती