शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

कृषी कायदे एका रात्रीत आले नाहीत, २५ वर्षांपासून चर्चा: पंतप्रधान मोदी

By मोरेश्वर येरम | Updated: December 18, 2020 15:51 IST

"जे लोक जाहीरनाम्यात कृषी कायद्यांची वकिली करत होते. त्यांनी आजवर हे कायदे लागू केले नाहीत", असं मोदी म्हणाले.

ठळक मुद्देकृषी कायद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोलविरोधकांना जे काम जमलं नाही ते आम्ही करतोय, मोदींचा निशाणाकृषी कायद्यांमुळे शेतकऱ्याचं भलंच होणार, मोदींना विश्वास

नवी दिल्लीमध्य प्रदेशातील शेतकरी संमेलनात शेतकऱ्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नव्या कृषी कायद्यांवरुन विरोध करत असलेल्या विरोधीपक्षांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या आश्वासनांची आठवण विरोधकांना करुन दिली. 

"जे काम खरंतर २५ वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं. ते आम्हाला आज पूर्ण करावं लागत आहे. कृषी कायदे काही एका रात्रीत तयार झालेले नाहीत. यावर गेल्या दोन दशकांपासून केंद्र, राज्य सरकार आणि संघटना चर्चा करत आहेत. आम्ही फक्त गेल्या अनेक वर्षांपासून स्थगित असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं काम करत आहोत", असं मोदी म्हणाले. 

विरोधीपक्षावर जोरदार हल्ला"जे लोक जाहीरनाम्यात कृषी कायद्यांची वकिली करत होते. त्यांनी आजवर हे कायदे लागू केले नाहीत", असं मोदी म्हणाले. विरोधी पक्षाच्या याआधीचे जाहीरनामे आणि कृषी क्षेत्र सांभाळण्यांनी लिहिलेली पत्र वाचली तर लक्षात येईल आज कृषी कायद्यांमध्ये असलेल्या तरतूदी लागू करण्याची शिफारस केलेली पाहायला मिळेल. पण आज मोदी हे सगळं लागू करत असल्यानं विरोधकांना पोटदुखी होतेय, असा निशाणा पंतप्रधानांनी साधला. 

"कृषी कायद्यांचं श्रेय मला देऊ नका. तुमच्या जाहीरनाम्याला याचं श्रेय देतो. मी शेतकऱ्यांचं भलं करु इच्छित आहे. त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांना गोंधळात टाकण्याचं काम बंद करा. हे कायदे लागू होऊन ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. पण आता अचानक विरोधक शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून गोळी मारत आहेत", असंही मोदी म्हणाले.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmer strikeशेतकरी संप