शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

कृषि, सिंचन,उद्योगांना प्राधान्य मिळावे अर्थसंकल्पाकडून अपेक्षा: लोकप्रतिनिधी, उद्योजकांच्या भावना

By admin | Updated: March 18, 2016 00:15 IST

जळगाव : ग्रामीण, शहरी विकासाचा समतोल साधला जावा, कृषी सिंचनाला प्राधान्य दावे अशा अपेक्षा राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.

जळगाव : ग्रामीण, शहरी विकासाचा समतोल साधला जावा, कृषी सिंचनाला प्राधान्य दावे अशा अपेक्षा राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.
शेती,शेतकर्‍यास प्राधान्य
शेती आणि शेतकर्‍याला प्राधान्य देण्याचा शासनाचा निर्णय असून त्याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसेल. जळगाव जिल्‘ासही न्याय मिळावा असे प्रयत्न असून त्यासाठी सिंचनाच्या प्रश्नांना आम्ही प्राधान्य दिले आहे.
- डॉ. गुरुमुख जगवाणी, आमदार
-------
सर्वांगीण विकास
सबका साथ, सबका विकास हे शासनाचे धोरण आहे. तसे चित्र या अर्थसंकल्पात असावे आणि असेल. शहराच्या विकासासाठीचे प्रश्न आपण दिले आहेत. त्यात २५ कोटींचा निधी महिना अखेर मिळेल.
- सुरेश भोळे, आमदार
------
सिंचन विकास होईल
शेतीला चांगले दिवस यावे असे वाटत असेल तर सिंचनाच्या कामांना गती मिळणे अपेक्षित आहे. शासनाचे तसे धोरण असून त्यासाठी तरतूद केली जावी अशी आपली मागणी होती. अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यालाही चांगली मदत शासन करत आहे व तशी तरतूदही होईल.
- स्मिता वाघ, आमदार
-------
लहान शहरांचा विचार व्हावा
पाच लाखाच्या आत लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी विशेष तरतूद होणे गरजेचे आहे. स्मार्टसिटी सारख्या योजनेत २५ टक्के वर्गणी भरणे अशा महापालिकांना शक्य नसल्याने राज्य शासनाने त्यासाठी कर्जाची तरतूद करावी. शहराचा विकास झाल्यास तेथे रोजगारही वाढेल. त्यादृष्टीने अर्थसंकल्पात नियोजन व्हावे.
- नितीन ल‹ा, महापौर.
-------
करांचा बोजा नको
महाराष्ट्रात आता कोणताही नवीन कर लागू केला जाऊ नये. त्याचा सर्वांनाच त्रास वाढतो. करांच्या ओझ्याने विविध उद्योग अन्य राज्यात जात आहेत. शेतीचे संपादन होते मात्र शेतकर्‍यानंा वेळेत पैसा मिळत नाही. त्यासाठीही तरतूद व्हावी. राज्यात मोठ्या प्रमाणात पशुधन नष्ट होत आहे. त्यासाठंीही धोरण निि›त करावे.
- अजय ललवाणी, सुवर्ण व्यावसायिक.
---------
गृहउद्योग धोरणाचा विचार व्हावा
केंद्राने रिअल इस्टेट विधेयक मंजूर केले. त्यात गृहनिर्माणात अनेक अडचणीत येत आहे. या संदर्भात काही वेगळा विचार राज्याने करणे आवश्यक आहे. व्यवसाय अडचणीत यावे असे धोरण नसावे. सर्वांचा विचार व्हावा अशी अपेक्षा आहे.
- मिलिंद राठी, बांधकाम क्षेत्र
---------