शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कृषी माल साठवणूक कायद्याच्या कक्षेत यावी, कायद्यात सुधारणा हवी; किसान संघाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 06:55 IST

सर्वांना थोडाबहूत लाभ मिळत असला तरी काही जणांना जादा लाभ मिळू नये, यासाठी मोठ्या उद्योग समूहांची साठवणूक कायद्याच्या कक्षेत आणावी, अशी आग्रही मागणी  किसान संघाचे राष्ट्रीय महामंत्री ब्रदीनारायण चौधरी यांनी केली.

-  टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या कचाट्यातून कुणीही सूटता कामा नये. मोठे व्यापारी, उद्योग उभारणाऱ्यांना त्यांच्या इन्स्टाॅल्ड कपॅसिटी पर्यंत सरकारने साठवणूक करण्यास मूभा दिली आहे. परंतु त्यांना साठवणुकीस जीवनावश्यक वस्तू कायदा लागू होणार नाही. मोठे उद्योग त्याबाहेर आहेत. सर्वांना थोडाबहूत लाभ मिळत असला तरी काही जणांना जादा लाभ मिळू नये, यासाठी मोठ्या उद्योग समूहांची साठवणूक कायद्याच्या कक्षेत आणावी, अशी आग्रही मागणी  किसान संघाचे राष्ट्रीय महामंत्री ब्रदीनारायण चौधरी यांनी केली.भारतीय किसान संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न संघटना आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर चौधरी यांनी लोकमतशी संवाद साधला. कृषी कायद्यात सुधारणा करण्याची चर्चा आधीपासूनच सुरू आहे. त्यात सारे शेतकरीच होते. आता मात्र शेतकरी आंदोलनाचा उद्देश बदलला असल्याची टीकाही त्यांनी केली. शेतकऱ्याकडून माल खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांना केवळ पॅन कार्ड गरजेचे आहे. केंद्र सरकारने कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करून व्यापाऱ्यांना खरेदीसाठी नोंदणीची सक्ती करावी. शिवाय बँक सिक्युरिटीदेखील प्रत्येक व्यापाराला देणे बंधनकारक असावे, असेही ते म्हणाले.वीस हजार गावांतून सरकारला लाखो ईमेलआंदोलनात सहभागी न होण्यावर चौधरी म्हणाले, भारतीय किसान संघाने कधीही कायदा रद्द करण्याची, तो मागे घेण्याची मागणी केली नाही. आम्ही प्रारंभापासूनच कायद्यात सुधारणा करण्याची मागणी करीत आहोत. २० हजार गावांमधून लाखो पत्र, ई मेल सरकारला पाठवण्यात आले आहेत. काही मुद्दे मसुद्यात होते. आमचा भर चर्चेवर आहे. हमीभावासंदर्भात ते म्हणाले, त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी. कायदेशीर मार्गानेच एमएसपीची अंमलबजावणी व्हावी. केवळ सरकारची खरेदी पुरेशी नाही.सरकार संपूर्ण माल खरेदी करू शकत नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याबाहेर देखील हमीभावापेक्षा जास्त दराने खरेदी व्हायला हवी.