शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

निर्णय मान्य करा नाहीतर बाहेर पडा, नितीश कुमारांचा शरद यादवांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 16:41 IST

एकमत झाल्यानंतरच भाजपाशी हातमिळवणी करण्याचा पक्षाने निर्णय घेतला असून, शरद यादव यांना निर्णय पटत नसेल तर ते आपला निर्णय घ्यायला मोकळे आहेत असं सूचक वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलं आहे

नवी दिल्ली, दि. 11 - एकमत झाल्यानंतरच भाजपाशी हातमिळवणी करण्याचा पक्षाने निर्णय घेतला असून, शरद यादव यांना निर्णय पटत नसेल तर ते आपला निर्णय घ्यायला मोकळे आहेत असं सूचक वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलं आहे. आपल्या सहका-याला शांत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याचंही नितीश कुमार बोलले आहेत. नितीश कुमार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत जाऊन भेट घेतली. भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. भाजपाशी हातमिळवणी केल्यानंतर पहिल्यांदाच नितीश कुमार यांनी शरद यादव यांच्यासंबंधी वक्तव्य केलं आहे. 

दरम्यान जेडीयूचे वरिष्ठ नेता शरद यादव यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना नितीश कुमार यांच्यावर सडेतोड टीका केली होती. शरद यादव यांनी राज्याचा दौरा सुरु केला असून आपण लोकांशी संवाद साधणार असल्याचं सांगितलं होतं. बिहारमध्ये राजकीय भूकंप आल्यानंतरही मौनव्रत धारण करुन बसलेले शरद यादव यांनी पहिल्यांदाच उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. शरद यादव यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की, 'पाच वर्षांसाठी महाआघाडी करण्यात आली होती. 11 कोटी लोकांच्या विश्वासाला तडा गेला आहे'.

शरद यादव गेल्या अनेक दिवसांपासून नितीश कुमार यांच्यावर नाराज असल्याचं वृत्त येत होतं. आरजेडीसोबत आपली मैत्री संपवत भाजपाच्या खांद्यावर हात ठेवून पुढे वाटचाल सुरु केल्याने शरद यादव नितीश कुमारांवर नाराज आहेत. दरम्यान शरद यादव जेडीयूमधून वेगळे होऊन आपला पक्ष उभा करतील अशा बातम्याही येत होत्या. जाणकारांनी दर्शवलेल्या अंदाजानुसार, शरद यादव दौरा संपल्यानंतर एखादी मोठी घोषणा करु शकतात. 

'ज्या जनतेसोबत आम्ही युती केली होती, त्यांच्यासोबत आम्ही करार केला होता,तो ईमानदारीने वागण्याचा होता. तो करार तुटला आहे, ज्यामुळे आम्हाला त्रास झाला आहे', असं शरद यादव बोलले होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, 'निवडणुकीत एक जाहीरनामा जेडीयूचा होता, तर एक जाहीरनामा भाजपाचा होता. गेल्या 70 वर्षात असं कोणतंच उदाहरण पहायला मिळत नाही ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या जाहीरनाम्यासहित पक्षांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली, आणि आता ते जाहीरनामे एकत्र झाले आहेत'. 'लोकशाहीवर विश्वासाचं संकट असून, यावर लोकांमध्ये जाऊन चर्चा करणार असल्याचं', शरद यादव यांनी सांगितलं होतं.