शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या मार्गावर? ममता बॅनर्जी अन् पुतण्यात कोल्ड वॉर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 15:29 IST

अभिषेक बॅनर्जी व तृणमुलचे नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून पक्षात काही ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. ममता आणि अभिषेक यांच्यात निर्माण झालेले मतभेद कधीही न संपण्याच्या टप्प्यात जाऊन पोहोचल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात जे घडले त्याचीच पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये होणार की काय, अशी शंका उपस्थित करणारी राजकीय घडामोड घडू लागली आहे. तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्यात शीत युद्ध सुरु झाले असून पक्षात दोन गट निर्माण झाल्याचे वृत्त आहे. 

अभिषेक बॅनर्जी व तृणमुलचे नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून पक्षात काही ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. ममता आणि अभिषेक यांच्यात निर्माण झालेले मतभेद कधीही न संपण्याच्या टप्प्यात जाऊन पोहोचल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

ममता यांच्यानंतर पक्षात अभिषेक हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. कलाकारांवर टाकलेल्या बहिष्कारावर ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. कोलकाताच्या आरजी कर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात ज्या कलाकारांनी ममता सरकारविरोधात टीका केली त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय तृणमुलने घेतला आहे. यास अभिषेक यांचा विरोध आहे. नववर्षाच्या स्वागताला गायिका  लग्नजीता चक्रवर्ती हिचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. परंतू, कोलकाताच्या स्थानिक नगरसेवकाने हा कार्यक्रम रद्द करत सरकारविरोधात बोललेल्या कलाकारांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका स्पष्ट केली होती. यावरून हा वाद सुरु झाला आहे. 

गायिकेचा कार्यक्रम रद्द केल्यानंतर टीएमसीचे वरिष्ठ प्रवक्ते कुणाल घोष यांनी ३१ डिसेंबरला एक्सवर पोस्ट टाकली होती. त्यात ज्या कलाकारांनी जाणूनबुजून बदनामी केली, मुख्यमंत्री, सरकार आणि पक्षावर टीका केली, अपमान करून चुकीची माहिती पसरविली त्यांना टीएमसी नेत्यांनी आयोजित केलेल्या कोणत्याही मंचावर घेऊ नये असे म्हटले होते. त्यांचा बहिष्कार केला जावा, असे त्यांनी आवाहन टीएमसी नेत्यांना केले होते. 

त्यापुढे जात जर कोणी नेता याच्याशी सहमत नसेल तर त्याने वरिष्ठ नेतृत्वाचा सल्ला घ्यावा, असेही म्हटले होते. अर्थात हे वक्तव्य वरिष्ठांच्या म्हणजेच ममता बॅनर्जींच्या सहमतीनेच केले गेले होते. यावर अभिषेक बॅनर्जी यांनी कोणी पक्षातर्फे असे म्हटले आहे का, ममता बॅनर्जींनी किंवा मी असे म्हटलेय का असा सवाल केला होता. सर्वांना स्वातंत्र्य आहे. मी कोणाला कोणासोबत, कुठे गावे यासाठी बळजबरी करू इच्छित नाही, असे म्हटले होते. अभिषेक यांच्या या भूमिकेलाही अनेक नेत्यांचा पाठिंबा आहे. यामुळे आता ममता आणि पुतण्यात पक्षातील वर्चस्वावरून कोल्ड वॉर सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस