शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या मार्गावर? ममता बॅनर्जी अन् पुतण्यात कोल्ड वॉर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 15:29 IST

अभिषेक बॅनर्जी व तृणमुलचे नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून पक्षात काही ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. ममता आणि अभिषेक यांच्यात निर्माण झालेले मतभेद कधीही न संपण्याच्या टप्प्यात जाऊन पोहोचल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात जे घडले त्याचीच पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये होणार की काय, अशी शंका उपस्थित करणारी राजकीय घडामोड घडू लागली आहे. तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्यात शीत युद्ध सुरु झाले असून पक्षात दोन गट निर्माण झाल्याचे वृत्त आहे. 

अभिषेक बॅनर्जी व तृणमुलचे नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून पक्षात काही ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. ममता आणि अभिषेक यांच्यात निर्माण झालेले मतभेद कधीही न संपण्याच्या टप्प्यात जाऊन पोहोचल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

ममता यांच्यानंतर पक्षात अभिषेक हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. कलाकारांवर टाकलेल्या बहिष्कारावर ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. कोलकाताच्या आरजी कर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात ज्या कलाकारांनी ममता सरकारविरोधात टीका केली त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय तृणमुलने घेतला आहे. यास अभिषेक यांचा विरोध आहे. नववर्षाच्या स्वागताला गायिका  लग्नजीता चक्रवर्ती हिचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. परंतू, कोलकाताच्या स्थानिक नगरसेवकाने हा कार्यक्रम रद्द करत सरकारविरोधात बोललेल्या कलाकारांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका स्पष्ट केली होती. यावरून हा वाद सुरु झाला आहे. 

गायिकेचा कार्यक्रम रद्द केल्यानंतर टीएमसीचे वरिष्ठ प्रवक्ते कुणाल घोष यांनी ३१ डिसेंबरला एक्सवर पोस्ट टाकली होती. त्यात ज्या कलाकारांनी जाणूनबुजून बदनामी केली, मुख्यमंत्री, सरकार आणि पक्षावर टीका केली, अपमान करून चुकीची माहिती पसरविली त्यांना टीएमसी नेत्यांनी आयोजित केलेल्या कोणत्याही मंचावर घेऊ नये असे म्हटले होते. त्यांचा बहिष्कार केला जावा, असे त्यांनी आवाहन टीएमसी नेत्यांना केले होते. 

त्यापुढे जात जर कोणी नेता याच्याशी सहमत नसेल तर त्याने वरिष्ठ नेतृत्वाचा सल्ला घ्यावा, असेही म्हटले होते. अर्थात हे वक्तव्य वरिष्ठांच्या म्हणजेच ममता बॅनर्जींच्या सहमतीनेच केले गेले होते. यावर अभिषेक बॅनर्जी यांनी कोणी पक्षातर्फे असे म्हटले आहे का, ममता बॅनर्जींनी किंवा मी असे म्हटलेय का असा सवाल केला होता. सर्वांना स्वातंत्र्य आहे. मी कोणाला कोणासोबत, कुठे गावे यासाठी बळजबरी करू इच्छित नाही, असे म्हटले होते. अभिषेक यांच्या या भूमिकेलाही अनेक नेत्यांचा पाठिंबा आहे. यामुळे आता ममता आणि पुतण्यात पक्षातील वर्चस्वावरून कोल्ड वॉर सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस