शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंची चेंबूरनंतर मानखुर्द मतदारसंघावरही नजर

By admin | Updated: September 25, 2014 01:44 IST

राज्यात महायुतीचे जागावाटप झाले नसतानाच मंगळवारी रिपाइंने चेंबूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मानखुर्द मतदारसंघदेखील रिपाइंला देण्यात यावा

मुंबई : राज्यात महायुतीचे जागावाटप झाले नसतानाच मंगळवारी रिपाइंने चेंबूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मानखुर्द मतदारसंघदेखील रिपाइंला देण्यात यावा, अशी मागणी आता रिपाइं कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. यासाठी रिपाइंकडून तयारीदेखील सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या जागावाटपाबाबत वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी किमान दोन आकडी जागा रिपाइंला मिळाव्यात, अशी मागणी सेना-भाजपाकडे केली. मात्र सेना-भाजपाच्याच जागांचा तिढा कायम असल्याने सध्या तरी घटक पक्षांना किती जागा मिळणार हे स्पष्ट नाही. दरम्यान, तिढा सुटत नसल्याचे पाहून मंगळवारी चेंबूरमधून दीपक निकाळजे यांनी रिपाइंमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र चेंबूरसोबतच मानखुर्दचीही जागा रिपाइंला मिळावी, अशी मागणी काही रिपाइं कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. युती झाल्यापासून मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघाची जागा ही सेनेच्या पारड्यात आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात काँग्रेस आणि सपाची सत्ता आहे. २००९ च्या निवडणुकीत समाजवादी पार्टीकडून अबू आझमी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी काँगे्रसचे उमेदवार युसूफ इब्राहिम यांचा पराभव करत या जागेवर विजय मिळवला. मात्र सपा आणि काँगे्रसची सत्ता असताना या ठिकाणी काहीच सुधारणा न झाल्याचा आरोप काही स्थानिक करत आहेत. आजही मानखुर्द आणि शिवाजी नगरात मोठ्या समस्या येथील रहिवाशांना भेडसावत असून यामध्ये पाण्याची समस्या ही सर्वात मोठी असल्याचे रहिवाशांनी सांगितले. सात वेळा या मतदारसंघातून बाहेरचाच उमेदवार निवडून येत आहे. त्यामुळे या उमेदवाराला येथील स्थानिक समस्यांबाबत काहीच माहिती नसते. त्यामुळे यावेळी ही जागा रिपाइंला दिल्यास येथून स्थानिक रहिवाशाला तिकीट देण्यात येईल, अशी माहितीदेखील एका कार्यकर्त्याने दिली. यासाठी दोन जणांची नावेदेखील निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)