शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

रिपाइंची चेंबूरनंतर मानखुर्द मतदारसंघावरही नजर

By admin | Updated: September 25, 2014 01:44 IST

राज्यात महायुतीचे जागावाटप झाले नसतानाच मंगळवारी रिपाइंने चेंबूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मानखुर्द मतदारसंघदेखील रिपाइंला देण्यात यावा

मुंबई : राज्यात महायुतीचे जागावाटप झाले नसतानाच मंगळवारी रिपाइंने चेंबूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मानखुर्द मतदारसंघदेखील रिपाइंला देण्यात यावा, अशी मागणी आता रिपाइं कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. यासाठी रिपाइंकडून तयारीदेखील सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या जागावाटपाबाबत वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी किमान दोन आकडी जागा रिपाइंला मिळाव्यात, अशी मागणी सेना-भाजपाकडे केली. मात्र सेना-भाजपाच्याच जागांचा तिढा कायम असल्याने सध्या तरी घटक पक्षांना किती जागा मिळणार हे स्पष्ट नाही. दरम्यान, तिढा सुटत नसल्याचे पाहून मंगळवारी चेंबूरमधून दीपक निकाळजे यांनी रिपाइंमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र चेंबूरसोबतच मानखुर्दचीही जागा रिपाइंला मिळावी, अशी मागणी काही रिपाइं कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. युती झाल्यापासून मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघाची जागा ही सेनेच्या पारड्यात आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात काँग्रेस आणि सपाची सत्ता आहे. २००९ च्या निवडणुकीत समाजवादी पार्टीकडून अबू आझमी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी काँगे्रसचे उमेदवार युसूफ इब्राहिम यांचा पराभव करत या जागेवर विजय मिळवला. मात्र सपा आणि काँगे्रसची सत्ता असताना या ठिकाणी काहीच सुधारणा न झाल्याचा आरोप काही स्थानिक करत आहेत. आजही मानखुर्द आणि शिवाजी नगरात मोठ्या समस्या येथील रहिवाशांना भेडसावत असून यामध्ये पाण्याची समस्या ही सर्वात मोठी असल्याचे रहिवाशांनी सांगितले. सात वेळा या मतदारसंघातून बाहेरचाच उमेदवार निवडून येत आहे. त्यामुळे या उमेदवाराला येथील स्थानिक समस्यांबाबत काहीच माहिती नसते. त्यामुळे यावेळी ही जागा रिपाइंला दिल्यास येथून स्थानिक रहिवाशाला तिकीट देण्यात येईल, अशी माहितीदेखील एका कार्यकर्त्याने दिली. यासाठी दोन जणांची नावेदेखील निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)