शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

रिपाइंची चेंबूरनंतर मानखुर्द मतदारसंघावरही नजर

By admin | Updated: September 25, 2014 01:44 IST

राज्यात महायुतीचे जागावाटप झाले नसतानाच मंगळवारी रिपाइंने चेंबूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मानखुर्द मतदारसंघदेखील रिपाइंला देण्यात यावा

मुंबई : राज्यात महायुतीचे जागावाटप झाले नसतानाच मंगळवारी रिपाइंने चेंबूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मानखुर्द मतदारसंघदेखील रिपाइंला देण्यात यावा, अशी मागणी आता रिपाइं कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. यासाठी रिपाइंकडून तयारीदेखील सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या जागावाटपाबाबत वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी किमान दोन आकडी जागा रिपाइंला मिळाव्यात, अशी मागणी सेना-भाजपाकडे केली. मात्र सेना-भाजपाच्याच जागांचा तिढा कायम असल्याने सध्या तरी घटक पक्षांना किती जागा मिळणार हे स्पष्ट नाही. दरम्यान, तिढा सुटत नसल्याचे पाहून मंगळवारी चेंबूरमधून दीपक निकाळजे यांनी रिपाइंमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र चेंबूरसोबतच मानखुर्दचीही जागा रिपाइंला मिळावी, अशी मागणी काही रिपाइं कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. युती झाल्यापासून मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघाची जागा ही सेनेच्या पारड्यात आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात काँग्रेस आणि सपाची सत्ता आहे. २००९ च्या निवडणुकीत समाजवादी पार्टीकडून अबू आझमी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी काँगे्रसचे उमेदवार युसूफ इब्राहिम यांचा पराभव करत या जागेवर विजय मिळवला. मात्र सपा आणि काँगे्रसची सत्ता असताना या ठिकाणी काहीच सुधारणा न झाल्याचा आरोप काही स्थानिक करत आहेत. आजही मानखुर्द आणि शिवाजी नगरात मोठ्या समस्या येथील रहिवाशांना भेडसावत असून यामध्ये पाण्याची समस्या ही सर्वात मोठी असल्याचे रहिवाशांनी सांगितले. सात वेळा या मतदारसंघातून बाहेरचाच उमेदवार निवडून येत आहे. त्यामुळे या उमेदवाराला येथील स्थानिक समस्यांबाबत काहीच माहिती नसते. त्यामुळे यावेळी ही जागा रिपाइंला दिल्यास येथून स्थानिक रहिवाशाला तिकीट देण्यात येईल, अशी माहितीदेखील एका कार्यकर्त्याने दिली. यासाठी दोन जणांची नावेदेखील निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)