शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

अनोळखी मुलगा बाबा म्हणून हाक मारू लागला; पुनर्जन्माचा प्रकार पाहून सारा गाव चक्रावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 08:56 IST

७ वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या मुलाचा 'पुनर्जन्म' पाहून ग्रामस्थ बुचकळ्यात

मैनपुरी: उत्तर प्रदेशातल्या मैनपुरी जिल्ह्यात पुनर्जन्माचा प्रकार समोर आला आहे. औंछा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नगला सलेहीत वास्तव्यात असलेल्या प्रमोद कुमार यांच्या घरी एक ८ वर्षांचा मुलगा आला. तो त्यांना थेट बाबा बाबा म्हणून हाक मारू लागला. हा प्रकार पाहून प्रमोद कुमार चक्रावले. मात्र त्या मुलानं त्याच्या सोबत गेल्या जन्मी घडलेला प्रकार सांगताच प्रमोद यांनी त्याला मिठी मारली. अंघोळ करत असताना कालव्यात बुडून माझा मृत्यू झाला होता, ही गोष्ट लहान मुलानं प्रमोद यांना सांगितली. ती ऐकताच प्रमोद कुमार यांना अश्रू अनावर झाले.

प्रमोद कुमार यांचा मुलगा रोहितचा २०१३ मध्ये कालव्यात बुडून मृत्यू झाला. त्यावेळी त्याचं वय १३ वर्षे होतं. रोहित सलेहीतल्या माध्यमिक शाळेत शिकायचा. रोहितच्या पुनर्जन्माची कहाणी ऐकून ग्रामस्थ थक्क झाले. कारण प्रमोद यांच्या घरी आलेल्या ८ वर्षीय मुलानं सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. रामनरेश नावाची एक व्यक्ती या मुलाला घेऊ प्रमोद कुमार यांच्या घरी पोहोचली. आठ वर्षांपूर्वी त्यांच्या घरी मुलगा जन्माला आला. त्याचं नाव चंद्रवीर ठेवण्यात आलं. तो बोलू लागला, तेव्हापासून पुनर्जन्माबद्दलच्या गोष्टी सांगू लागल्याचं रामनरेश म्हणाले.

नगला सलेही गावात असलेल्या आई-बाबांना भेटण्याचा आग्रह चंद्रवीर वारंवार करायचा. मात्र मुलाला गमावयाचं नसल्यानं रामनरेश त्याला नगला सलेहीला घेऊन जात नव्हते. मात्र शेवटी मुलाच्या हट्टापुढे त्यांनी हात टेकले. चंद्रवीर यानं प्रमोद कुमार यांना पुनर्जन्माची संपूर्ण हकिकत सांगितली. ती ऐकण्यासाठी संपूर्ण गाव लोटला होता. त्याचवेळी तिथे नगला सलेही गावातील शाळेचे मुख्याध्यापक आले. त्यांना चंद्रवीरनं नावानं हाक मारली आणि त्यांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर मुख्याध्यापक उलट तपासणी म्हणून चंद्रवीरला शाळेत घेऊन गेले. त्यावेळी रोहित शिकत असलेल्या वर्गातील अनेक गोष्टी त्यांना अगदी स्पष्ट आणि तंतोतंत सांगितल्या. चंद्रवीरच्या भेटीमुळे रोहितचे आई वडील आनंदित झाले. ग्रामस्थ अजूनही हा सगळा प्रकार ऐकून हैराण आहेत.