शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

पठाणकोट, उरीनंतरही संरक्षण मंत्रालय बेफिकीर

By admin | Updated: March 10, 2017 12:33 IST

लष्करी तळांवर होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही संरक्षण मंत्रालयाने सुरक्षेच्या दृष्टीने काहीच पाऊलं उचलली नसल्याचं समोर आलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - लष्करी तळांवर होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही संरक्षण मंत्रालयाने सुरक्षेच्या दृष्टीने काहीच पाऊलं उचलली नसल्याचं समोर आलं आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते निवृत्त मेजर जनरल भुवन चंद्र खंडूरी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या संसदेच्या उच्चस्तरीय समितीने हा निष्कर्ष काढला आहे. सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवरुन समितीने मांडलेल्या अहवालात संरक्षण मंत्रालयावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतरही मंत्रालयाकडून महत्वाचे आणि योग्य पाऊल उचलण्यात आलेलं नाही असं समितीने म्हटलं आहे. 
 
पठाणकोट दहशतवादी हल्ल्यात सात जवान शहीद झाले होते. संसदीय समितीने सांगितलं आहे की सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी लेफ्टनंट जनरल फिलीप काम्पोज यांनी मे 2016 रोजी आपला अहवाल सोपवला होता. मात्र त्यानंरही संरक्षण मंत्रालय कोणतीच हालचाल करताना दिसत नाही आहे. गुरुवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालात सांगण्यात आलं आहे की, 'पठाणकोट आणि उरी हल्ल्यावेळी परिस्थिती जितकी गंभीर होती, तशीच परिस्थिती अद्यापही आहे. अहवाल सादर होऊन सहा ते सात महिने झाले तरीही अद्याप कोणताही ठोस निर्णय किंवा पाऊल उचलण्यात आलं आहे असं दिसत नाही'.
 
जम्मू काश्मीरमधील सीमारेषेवरील चौक्यांमध्ये घुसखोरी रोखण्यासाठी अलर्ट देणारं यंत्र लावण्यात येणार होतं. मात्र सरकारची मंजूरी न मिळाल्याने काम अद्यापही बारगळेलं आहे. जानेवारी 2016 मध्ये झालेल्या पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर संवेदनशील राज्यांमध्ये सुरक्षा विभागांची सुरक्षा वाढवण्याची योजना आखण्यात आली होती. यासाठी 400 कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र ही योजना अंमलात आणण्यात आलीच नाही. दुसरीकडे ऑक्टोबर 2016 मध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी घुसखोरी करत एकदा पुन्हा लष्कराची सुरक्षा भेदत दहशतवादी हल्ला करण्यात यशस्वी झाले. या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते.