शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर मुंबई-दिल्ली दरम्यान तिसरी ‘राजधानी’, प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 04:53 IST

मुंबई आणि दिल्ली दरम्यान दिवाळीनंतर तिसरी ‘राजधानी एक्स्प्रेस’ सुरु करण्याची तयारी रेल्वे प्रशासानने सुरु केली असून ही नवी गाडी अधिक वेगाने धावून १३ तासांत दिल्लीला पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.

नवी दिल्ली : मुंबई आणि दिल्ली दरम्यान दिवाळीनंतर तिसरी ‘राजधानी एक्स्प्रेस’ सुरु करण्याची तयारी रेल्वे प्रशासानने सुरु केली असून ही नवी गाडी अधिक वेगाने धावून १३ तासांत दिल्लीला पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. सध्या या दोन शहरांच्या दरम्यान ‘आॅगस्ट क्रांती राजधानी’ आणि ‘मुंबई-दिल्ली राजधानी’ अशा दोन राजधानी एक्स्प्रेस चालविल्या जातात. ‘आॅगस्ट क्रांती’ ताशी सरासरी ८० किमी वेगाने धावून १७ तास पाच मिनिटांनी निजामुद्दीन येथे पोहोचते.तर ‘राजधानी’ यापेक्षा थोडी जलद म्हणजे ताशी सरासरी ८९ किमी वेगाने धावून १५ तास ३५ मिनिटांत नवी दिल्लीला पोहोचते. मुंबई सेंट्रलहून निजामुद्दीत १,३७७ तर नवी दिल्ली १,३ ८६ किमीवर आहे. एका वरिष्ठ रेल्वे अधिका-याने सांगितले की, तिसरी ‘राजधानी एक्स्प्रेस’ वांद्रे टर्मिनस येथून सुटून १३ तासांत निजामुद्दीन येथे पोहोचेल, अशी तयारी केली जात आहे.‘राजधानी एक्स्प्रेस’चा मंजूर वेग ताशी १३० किमीचा आहे. परंतु वाटेतील अनेक वळणे व अ‍ेनक ठिकाणी असलेली वेगमर्यादेचीबंधने यामुळे प्रत्यक्ष सरकारी वेग ताशी ८९ किमीपर्यंत जाऊ शकतो. नवी ‘राजधानी’ चालविताना हा कमाल ताशी सरासरी वेग ९० ते ९५ किमीपर्यंत वाढविला जाईल. या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार ‘नव्या राजधानी’साठी चाचण्या येत्या दोन-तीन दिवसांत सुरु होतील व प्रत्यक्ष नवी गाडी बहुधा दिवाळीनंतर सुरु केली जाऊ शकेल.>अनेक पर्यायांवर विचारनव्या गाडीचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी अनेक पर्यायांची चाचणी घेण्यात येईल. सध्याच्या राजधानीप्रमाणे गाडीला २४ डबे व दोन इंजिने लावायची पण नेहमीच्या डब्यांऐवजी अत्याधुनिक ‘एलएचबी’ डबे वापरायचे. २४ ऐवजी १४ ‘एलएचबी’ डब्यांची गाडी एका इंजिनाने चालवायची. सध्याची मुंबई-दिल्ली राजधानी वाटेत सहा ठिकाणी थांबते.त्याएवजी नवी गाडी दोन किंवा तीनच ठिकामी थांबवायची.