शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

बिहारनंतर इतर राज्यांनाही हवी जातनिहाय जनगणना; काँग्रेसचे ओबीसी कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 05:58 IST

भाजपकडून गरिबांच्या बाजूने असल्याचा प्रचार

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : विरोधक गरिबांच्या भावनांशी खेळत आहेत आणि देश जातीच्या आधारावर विभाजित करीत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला असताना विविध राज्यांतून आता जातनिहाय जनगणनेचा मुद्दा जोर धरत आहे.

या सर्व गदारोळात काँग्रेस मात्र बिनधास्त आहे. या संधींचे सोने करण्यासाठी कॉंग्रेसने निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यापूर्वी जोरदार प्रयत्न करावे, असे निर्देश नेत्यांना दिले आहे. २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी इंडिया आघाडीच्या प्रचारासाठी ही योग्य वेळ आहे, असेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

कोणकोणत्या राज्यांमध्ये चर्चा शिगेला

नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील ओडिशा सरकारने जातनिहाय जनगणनेचे निष्कर्ष जाहीर करण्याची घोषणा केली आहे.

कर्नाटकमध्ये २०१३-२०१८ या कालावधीत सिद्धरामय्या यांच्या पहिल्या कार्यकाळात करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेचा अहवाल जाहीर करण्याबाबत राज्य सरकारवर प्रचंड दबाव आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी आमचा पक्ष सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करणार आहे, असे स्पष्ट केले आहे. छत्तीसगढमध्येही ओबीसी व ईडब्ल्यूएस यांचे अशाच प्रकारचे सर्वेक्षण केले जात आहे.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने राज्यात सामाजिक-आर्थिक व जातनिहाय जनगणनेची तयारी सुरू केली आहे. या संदर्भात विधानसभेने ठराव मंजूर केलेला आहे.

केरळ सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाच्या राज्य आयोगाला पुढारलेल्या जातींमधील आर्थिक मागासलेपणाचे सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे.

तामिळनाडूमध्ये आरक्षण ६९ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यात सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त ओबीसींचा समावेश आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नोकऱ्या आणि शिक्षणात ओबीसींना प्रतिनिधित्व हवे, असे म्हटले.

उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजप जातनिहाय जनगणनेबाबत गप्प असला, तरी भाजपच्या महत्त्वाच्या सहयोगी पक्षाच्या केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी मात्र त्यास पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा जाेर धरत आहे.

काँग्रेसनेही बोलावली बैठक, ओबीसींच्या मुद्द्यावर खल

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ९ ऑक्टोबर रोजी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. ओबीसी व जातीनिहाय जनगणना हे बैठकीतील मुद्दे असतील, असे सूत्रांनी सांगितले.

पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी ओबीसींच्या भागीदारीचा मुद्दा लावून धरला आहे. पाच राज्यांतील निवडणुका तोंडावर आहेत. त्यात ओबीसींचा मुद्दा घेऊन पुढे जायचे की, रणनीतीमध्ये काही बदल करायचा आहे, याबाबत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मतैक्य केले जाईल. त्यासाठीच ही कार्यकारिणीची विशेष बैठक बोलावली आहे.