शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

तामिळनाडू तुझा भाजपावर भरोसा हाय काय ?

By वैभव देसाई | Updated: August 3, 2017 14:40 IST

तामिळनाडूमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपाचं 120 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं असून, त्यासाठी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे.

ठळक मुद्देतामिळनाडूमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपाचं 120 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं भाजपाचे जवळपास 10 हजार कार्यकर्ते हे पक्षाची सदस्यसंख्या वाढवण्यासाठी कठोर मेहनत घेतायत.5 हजार कार्यकर्ते तामिळनाडूमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी अनेक योजनांवर काम करत आहेत. तामिळनाडूतील सत्ताधारी पार्टी AIADMK व भाजपा हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चेन्नई, दि. 3 - देशात भाजपाचा वारू सद्यस्थितीत चौफेर उधळला आहे. पूर्वेपासून ते उत्तर भारतातील अनेक राज्यांत भाजपानं सत्ता स्थापन करत दबदबा निर्माण केला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंडपाठोपाठ भाजपानं नितीश कुमारांच्या मदतीनं बिहारमध्ये सत्ता काबिज केली. त्यानंतर भाजपानं आता दक्षिण भारताकडे मोर्चा वळवला आहे. तामिळनाडूमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपानं 120 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं असून, त्यासाठी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे.तामिळनाडूमध्ये माजी मुख्यमंत्री राहिलेले एम. करुणानिधी यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणातून आधीच निवृत्ती घेतली आहे. तर जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील जनतेमध्ये चांगली प्रतिमा असलेला सद्यस्थितीत एकही नेता नाही. त्या मुद्द्याचा फायदा उठवत भाजपानं तामिळनाडूमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्याची योजना आखली आहे. 2016च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अमित शाह यांनी नवी रणनीती तयार केली आहे. भाजपानं तामिळनाडूमध्ये हातपाय पसरण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तामिळनाडूमध्ये भाजपानं पक्षाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विस्तार कार्यक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत भाजपाचे जवळपास 10 हजार कार्यकर्ते हे पक्षाची सदस्यसंख्या वाढवण्यासाठी कठोर मेहनत घेतायत. तर इतर 5 हजार कार्यकर्ते तामिळनाडूमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी अनेक योजनांवर काम करत आहेत.तामिळनाडूतील सत्ताधारी पार्टी AIADMK व भाजपा हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रीय राजकारणात देखील तशी चर्चा सुरू झाली आहे. AIADMKच्या माध्यमातून भाजपाला तामिळनाडूमध्ये वर्चस्व निर्माण करायचं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाचे वरिष्ठ नेता व केंद्रीय मंत्री यासंबंधी AIADMK नेत्यांसोबत बोलणी करतायत. त्यामुळे AIADMK हा एनडीएचा हिस्सा बनल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. पूर्व आणि उत्तरेकडील अनेक राज्यांत भाजपानं सत्ता हस्तगत केली आहे. मात्र दक्षिण भारतात भाजपा सत्तेपासून अद्यापही दूर आहे. उत्तर व मध्य भारतातील राज्यांमध्ये भाजपाने आपला झेंडा फडकावल्यानंतर आता भाजपानं दक्षिण भारतावर लक्ष्य केंद्रित केलं आहे. अशात तामिळनाडूतील AIADMK हा पक्ष भाजपासाठी सर्वाधिक चांगला व सोयीस्कर पर्याय असल्याचे मानले जात आहे. माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील सत्तेत संघर्ष सुरू आहे. त्यांचा पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. जयललितांच्या निधनानंतर शशिकला यांच्याकडे सत्तेच्या चाव्या जातील, अशी शक्यता होती. मात्र बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शशिकला यांची कारागृहात रवानगी झाल्यानंतर ई. पलानीस्वामी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवण्यात आले. तर दुसरीकडे पन्नीरसेल्वम यांनी आधीच बंड पुकारले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीचा लाभ उठवण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार या कारणांमुळेच रखडल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये मोदींच्या कॅबिनेटचा विस्तार होण्याची शक्यता असून, या मंत्रिमंडळ विस्तारात AIADMK चाही समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीएची सध्या 30 पैकी 18 राज्यांत सत्ताराष्ट्रीय लोकशाही आघाडीची सध्या 30 पैकी 18 राज्यांत सत्ता आहे. नितीश कुमार यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 18 राज्यांवर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी असलेले 48 पक्ष 30 राज्यांपैकी 18 राज्यांत सत्तेवर आहे.  मात्र 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 1993मध्ये यूपीएची अनेक राज्यांत सत्ता होती. त्यावेळी काँग्रेसची जवळपास 15 राज्यांत सत्ता होती. तर एका राज्यांत काँग्रेस सहयोगी पक्षासोबत सत्तेत होती.  कमल हसन आणि रजनीकांत करणार राजकारणात प्रवेशतामिळनाडूच्या राजकारणात कमल हसन आणि सुपरस्टार रजनीकांतही प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हा लवकरच राजकारणात प्रवेशाची घोषणा करू शकतो, अशी माहिती त्यांचे बंधू सत्यनारायणराव गायकवाड यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिली होती. रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करावा अशी तामिळनाडूतील जनतेची इच्छा आहे. चाहते आणि हितचिंतकांशी चर्चेची पहिली फेरी त्यांनी पूर्ण केल्याचंही समजतंय. तामिळनाडूचे नेतृत्व करण्यासाठी तमीळ व्यक्तीच का हवी? असा प्रश्‍न उपस्थित करीत अभिनेता कमल हसन याने अप्रत्यक्षपणे सुपरस्टार रजनीकांत याचे समर्थन केले होते. तामिळनाडूचे नेतृत्व तमीळ व्यक्तीनेच करावे का? असा प्रश्‍न कमल हसन यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले होते.