शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

तामिळनाडू तुझा भाजपावर भरोसा हाय काय ?

By वैभव देसाई | Updated: August 3, 2017 14:40 IST

तामिळनाडूमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपाचं 120 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं असून, त्यासाठी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे.

ठळक मुद्देतामिळनाडूमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपाचं 120 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं भाजपाचे जवळपास 10 हजार कार्यकर्ते हे पक्षाची सदस्यसंख्या वाढवण्यासाठी कठोर मेहनत घेतायत.5 हजार कार्यकर्ते तामिळनाडूमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी अनेक योजनांवर काम करत आहेत. तामिळनाडूतील सत्ताधारी पार्टी AIADMK व भाजपा हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चेन्नई, दि. 3 - देशात भाजपाचा वारू सद्यस्थितीत चौफेर उधळला आहे. पूर्वेपासून ते उत्तर भारतातील अनेक राज्यांत भाजपानं सत्ता स्थापन करत दबदबा निर्माण केला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंडपाठोपाठ भाजपानं नितीश कुमारांच्या मदतीनं बिहारमध्ये सत्ता काबिज केली. त्यानंतर भाजपानं आता दक्षिण भारताकडे मोर्चा वळवला आहे. तामिळनाडूमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपानं 120 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं असून, त्यासाठी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे.तामिळनाडूमध्ये माजी मुख्यमंत्री राहिलेले एम. करुणानिधी यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणातून आधीच निवृत्ती घेतली आहे. तर जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील जनतेमध्ये चांगली प्रतिमा असलेला सद्यस्थितीत एकही नेता नाही. त्या मुद्द्याचा फायदा उठवत भाजपानं तामिळनाडूमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्याची योजना आखली आहे. 2016च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अमित शाह यांनी नवी रणनीती तयार केली आहे. भाजपानं तामिळनाडूमध्ये हातपाय पसरण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तामिळनाडूमध्ये भाजपानं पक्षाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विस्तार कार्यक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत भाजपाचे जवळपास 10 हजार कार्यकर्ते हे पक्षाची सदस्यसंख्या वाढवण्यासाठी कठोर मेहनत घेतायत. तर इतर 5 हजार कार्यकर्ते तामिळनाडूमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी अनेक योजनांवर काम करत आहेत.तामिळनाडूतील सत्ताधारी पार्टी AIADMK व भाजपा हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रीय राजकारणात देखील तशी चर्चा सुरू झाली आहे. AIADMKच्या माध्यमातून भाजपाला तामिळनाडूमध्ये वर्चस्व निर्माण करायचं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाचे वरिष्ठ नेता व केंद्रीय मंत्री यासंबंधी AIADMK नेत्यांसोबत बोलणी करतायत. त्यामुळे AIADMK हा एनडीएचा हिस्सा बनल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. पूर्व आणि उत्तरेकडील अनेक राज्यांत भाजपानं सत्ता हस्तगत केली आहे. मात्र दक्षिण भारतात भाजपा सत्तेपासून अद्यापही दूर आहे. उत्तर व मध्य भारतातील राज्यांमध्ये भाजपाने आपला झेंडा फडकावल्यानंतर आता भाजपानं दक्षिण भारतावर लक्ष्य केंद्रित केलं आहे. अशात तामिळनाडूतील AIADMK हा पक्ष भाजपासाठी सर्वाधिक चांगला व सोयीस्कर पर्याय असल्याचे मानले जात आहे. माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील सत्तेत संघर्ष सुरू आहे. त्यांचा पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. जयललितांच्या निधनानंतर शशिकला यांच्याकडे सत्तेच्या चाव्या जातील, अशी शक्यता होती. मात्र बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शशिकला यांची कारागृहात रवानगी झाल्यानंतर ई. पलानीस्वामी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवण्यात आले. तर दुसरीकडे पन्नीरसेल्वम यांनी आधीच बंड पुकारले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीचा लाभ उठवण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार या कारणांमुळेच रखडल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये मोदींच्या कॅबिनेटचा विस्तार होण्याची शक्यता असून, या मंत्रिमंडळ विस्तारात AIADMK चाही समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीएची सध्या 30 पैकी 18 राज्यांत सत्ताराष्ट्रीय लोकशाही आघाडीची सध्या 30 पैकी 18 राज्यांत सत्ता आहे. नितीश कुमार यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 18 राज्यांवर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी असलेले 48 पक्ष 30 राज्यांपैकी 18 राज्यांत सत्तेवर आहे.  मात्र 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 1993मध्ये यूपीएची अनेक राज्यांत सत्ता होती. त्यावेळी काँग्रेसची जवळपास 15 राज्यांत सत्ता होती. तर एका राज्यांत काँग्रेस सहयोगी पक्षासोबत सत्तेत होती.  कमल हसन आणि रजनीकांत करणार राजकारणात प्रवेशतामिळनाडूच्या राजकारणात कमल हसन आणि सुपरस्टार रजनीकांतही प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हा लवकरच राजकारणात प्रवेशाची घोषणा करू शकतो, अशी माहिती त्यांचे बंधू सत्यनारायणराव गायकवाड यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिली होती. रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करावा अशी तामिळनाडूतील जनतेची इच्छा आहे. चाहते आणि हितचिंतकांशी चर्चेची पहिली फेरी त्यांनी पूर्ण केल्याचंही समजतंय. तामिळनाडूचे नेतृत्व करण्यासाठी तमीळ व्यक्तीच का हवी? असा प्रश्‍न उपस्थित करीत अभिनेता कमल हसन याने अप्रत्यक्षपणे सुपरस्टार रजनीकांत याचे समर्थन केले होते. तामिळनाडूचे नेतृत्व तमीळ व्यक्तीनेच करावे का? असा प्रश्‍न कमल हसन यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले होते.