शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विमानतळानंतर आता रेल्वे स्टेशन, 150 रेल्वेगाड्यांचं होणार खासगीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 11:00 IST

अमिताभ कांत यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विके यादव यांना पत्र लिहले असून त्यामध्ये देशातील 150 रेल्वे गाड्यांचे खासगीकरण करण्याचं सूचवलं आहे.

तेजस एक्सप्रेसच खासगीकरण केल्यानंतर सरकारडून आणखी 150 रेल्वेगाड्या आणि 50 रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. सचिव स्तरावरील एका पथकाला ही कामगिरी सोपविण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे. 

अमिताभ कांत यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विके यादव यांना पत्र लिहले असून त्यामध्ये देशातील 150 रेल्वे गाड्यांचे खासगीकरण करण्याचं सूचवलं आहे. रेल्वे विभागाला 400 निवडक रेल्वे स्थानकांना फर्स्ट क्लास बनवायचं होतं. पण, गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत प्रयत्न सुरू असले तरी, जेथे ईपीसी मोडद्वारे काम झाले आहे, त्या काही ठराविक घटकांना सोडलं तर अद्यापही काम सुरू झालं नाही.

मी रेल्वेमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा केली आहे. त्यानुसार निदान 50 रेल्वे स्थानकांवर हे काम प्राथमिक स्वरुपात सुरू केलं पाहिजे, असं लक्षात आलंय. ज्याप्रमाणे 6 विमानतळांच खासगीकरण केलंय, त्याप्रमाणे रेल्वेचही करणं गरजेचं आहे. त्यासाठी सुरुवातील 150 रेल्वे स्थानकांचं खासगीकरण करण्याचं ठरवल्याचं कांत यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. दरम्यान, तेजस एक्सप्रेस ही भारतातील पहिली रेल्वेसेवा आहे, जी खासगी प्रणालीवर सुरू झाली आहे. प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्याचा मानस लक्षात ठेऊन हा प्रयोग करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. तेजस एक्सप्रेस स्टेशनवर उशिरा पोहोचल्यास प्रवाशांना त्यांचे भाडेही परत दिले जाते. 

टॅग्स :railwayरेल्वेpiyush goyalपीयुष गोयलTejas Expressतेजस एक्स्प्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेAirportविमानतळ