शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

नक्षल प्रभावित गावात स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतर पोहोचली वीज, ग्रामस्थ भावूक, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 16:46 IST

Electricity reached the Naxal-Affected Villag: छत्तीसगडमधील सुकमा जिल्हा हा नक्षलवादी कारवायांमुळे संवेदनशील समजला जातो. मात्र आता येथे विकासाची एक नवी कहाणी लिहिली जात आहे. सुकमा जिल्ह्यातील नक्षलग्रस्त एलमागुंडा गावातील ग्रामस्थांना यंदाच्या स्वातंत्र्य दिनी एक खास भेट मिळाली आहे.

छत्तीसगडमधील सुकमा जिल्हा हा नक्षलवादी कारवायांमुळे संवेदनशील समजला जातो. मात्र आता येथे विकासाची एक नवी कहाणी लिहिली जात आहे. सुकमा जिल्ह्यातील नक्षलग्रस्त एलमागुंडा गावातील ग्रामस्थांना यंदाच्या स्वातंत्र्य दिनी एक खास भेट मिळाली आहे. या गावामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे लोटल्यानंतर वीज पोहोचली आहे. घरात पहिल्यांदा उजेड पडल्यानंतर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

छत्तीसगड सरकारच्या धोरणानुसार राज्य सरकारच्या विकास, विश्वास आणि सुरक्षेच्या थीमवर काम करत जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस आणि सीआरपीएफच्या अथक प्रयत्नांमुळे एलमागुंडा गावामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा विजेची सेवा पोहोचली आहे.

नक्षल प्रभावित एलमागुंडा गावामध्ये वीज पोहोचल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. एलमागुंडा गावामध्ये यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरक्षा दलांचा कॅम्प स्थापन करण्यात आला होता. तेव्हापासून गावात पायाभूत सुविधा पोहोचवण्यासाठी सीआरपीएफ, जिल्हा पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे प्रयत्न सुरू केले होते. तसेच आता गावामध्ये वीज पोहोचल्यामुळे शासन आणि प्रशासनावरील विश्वासही वाढला आहे.

सुकमा जिल्ह्यामधील काही गाव हे नक्षल प्रभावित आणि संवेदनशील आहेत. त्यामुळए सुरक्षा दलाच्या जवानांकडून प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमधून ग्रामस्थांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याअंतर्गत ग्रामीण भागामध्ये कॅम्प स्थापन करण्यासह त्या भागांमध्ये लोकांच्या आवश्यक गरजा पोहोचवण्याचं कामही केलं जात आहे. 

टॅग्स :electricityवीजIndependence Dayस्वातंत्र्य दिनChhattisgarhछत्तीसगड