शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘खून’ केलेल्या पत्नीला त्याने ७ वर्षांनी शोधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:10 IST

गेल्या रविवारी अखेर अभयला इतिश्री सापडली. सोमवारी तिला न्यायालयात उभे केले गेले. तिची जबानी नोंदवून घेतल्यावर खून खटल्यातून अभयला निर्दोष मुक्त करण्यात आले!

केंद्रपाडा (ओदिशा) : पतकुरा गावातील अभय सुतार याच्यावर पत्नी इतिश्री हिचा खून केल्याबद्दल खटला दाखल केला गेला. सात वर्षांपूर्वी महिनाभर तुरुंगात राहिल्यावर त्याची जामिनावर सुटका झाली. तेव्हापासून त्याने ‘खून’ झालेल्या पत्नीला शोधून काढण्याचा ध्यास घेतला होता. गेल्या रविवारी अखेर अभयला इतिश्री सापडली. सोमवारी तिला न्यायालयात उभे केले गेले. तिची जबानी नोंदवून घेतल्यावर खून खटल्यातून अभयला निर्दोष मुक्त करण्यात आले!चौलिया गावातील अभयचा जवळच्याच समागोला गावातील इतिश्री हिच्याशी विवाह झाला. जेमतेम दोन महिने सासरी राहिल्यावर इतिश्री अचानक घरातून निघून गेली. थोडे दिवस शोध करून अभयने ती बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदविली. दुसरीकडे इतिश्रीच्या वडिलांनी सुरुवातीला तिचा सासरी छळ होत असल्याची व नंतर अभयने तिचा खून करून मृतदेह कुठेतरी टाकून दिल्याची फिर्याद नोंदविली. याच फिर्यादीवरून अभयवर खुनाचा खटला दाखल झाला.अखेर पुरी जिल्ह्याच्या पिपली गावात अभयला इतिश्री सापडली आणि सात वर्षांचा त्याचा संशय खरा ठरला. इतिश्री राजीव लोचन मोहराना या तिच्या प्रियकरासोबत होती.इतिश्रीने न्यायालयात दिलेल्या जबानीने तिच्या सात वर्षे गायब होण्याचा उलगडा झाला. अभयशी लग्न होण्याआधीपासून इतिश्री व राजीव लोचन यांचे प्रेमसंबंध होते; पण घरच्यांनी तिचे अभयशी जबरदस्तीने लग्न लावून दिले. एक दिवस संधी साधून ती सासरच्या घरातून रात्री गुपचूप बाहेर पडली. राजीव लोचनशी तिने पळून जाऊन लग्न केले. दोघे सात वर्षे गुजरातमध्ये राहिले. या दरम्यान त्यांना दोन मुलेही झाली. आता सर्व सामसूम झाले असेल, असे समजून दोघेही मुलांना घेऊन पुन्हा ओदिशात आले व पिपली गावात राहू लागले. राजीव लोचन भुवनेश्वरमध्ये रिक्षा चालवून कुटुंबाची उपजीविका चालवितो. (वृत्तसंस्था)>निर्दोष ठरल्याचे समाधानअभय म्हणतो, माझा इतिश्रीवर राग नाही. तिने मला आधी सांगितले असते तर मी तिच्याशी लग्न केलेही नसते. इतिश्रीचा खून झालेला नाही, या माझ्या सांगण्यावर कोणी विश्वासही ठेवायला तयार नव्हते.शेवटी जामिनावर सुटून बाहेर आल्यावर मीच तिला शोधण्याचे ठरविले. ती सापडली आणि मी निर्दोष ठरलो, याचेच मला समाधान आहे.