शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

"राहुल गांधी पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार; अडवाणींच्या राम रथयात्रेसारखी भारत जोडो यात्रा", शत्रुघ्न सिन्हांकडून कौतुक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2023 09:41 IST

तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते आणि लोकसभा खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'चे कौतुक केले आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'भारत जोडो यात्रे'ला (Bharat Jodo Yatra) देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातच आता तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते आणि लोकसभा खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'चे कौतुक केले आहे.

राहुल गांधी हे विरोधी पक्षातून 'पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार' दिसून येत आहेत, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. तसेच, राहुल गांधींची 3,570 किलोमीटरची यात्रा ऐतिहासिक यात्रांपैकी एक आहे आणि या यात्रेची तुलना 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला झालेल्या लालकृष्ण अडवाणींच्या 'राम रथयात्रे'शी केली जाऊ शकते, असे शत्रुघ्न सिन्हा म्हटले आहे. 

शत्रुघ्न सिन्हा  म्हणाले, "या यात्रेतून राहुल गांधी एक प्रमुख आणि आदरणीय नेते म्हणून उदयास आले आहेत. ते आता पंतप्रधानपदासाठी अत्यंत सक्षम दिसत आहेत. ते (राहुल गांधी) आता विरोधी पक्षातील (पंतप्रधानपदासाठी) आघाडीचे नेते बनले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ लाखो लोक येत आहेत. त्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्ध केले आहेत. लोकांनी त्यांना नेता म्हणून स्वीकारले आहे."

दरम्यान, तीन महिन्यांत दुसऱ्यांदा शत्रुघ्न सिन्हा यांनी राहुल गांधी आणि त्यांच्या 'भारत जोडो यात्रे'चे कौतुक केले आहे. या यात्रेमुळे पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मते मिळतील का, असा प्रश्न शत्रुघ्न सिन्हा यांना विचारला असता त्यांनी सकारात्कम उत्तर दिले. राहुल गांधींना ज्या प्रकारचा पाठिंबा मिळत आहे, तो अभूतपूर्व आहे. त्याचे 20 टक्के मतांमध्ये रूपांतर झाले तर ते देशासाठी आणि विशेषत: काँग्रेससाठी चांगले होईल, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.

याचबरोबर, शत्रुघ्न सिन्हा यांनी लालकृष्ण अडवाणी आणि वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या आंध्र प्रदेशातील राजकीय दौऱ्यांचा उल्लेख केला. "आपण भूतकाळात पाहिले आहे की किती लांबचा प्रवास मतांचे रूपांतर करण्यात मदत करतो. आंध्र प्रदेशात लालकृष्ण अडवाणी आणि जगन मोहन रेड्डी यांच्या यात्रा आपण पाहिल्या आहेत.", असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. तसेच, जेव्हा ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये जखमी झाल्या होत्या आणि नंतर त्यांनी व्हीलचेअरवर बसून प्रचार केला, तेव्हा तुम्ही 2021 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिले आहेत, असेही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

शत्रुघ्न सिन्हा यांनी 1980 मध्ये भाजपमध्ये केला होता प्रवेशविशेष म्हणजे, शत्रुघ्न सिन्हा 1980 च्या दशकात भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये होते. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात ते  भाजपचे स्टार प्रचारक होते. पटना साहिबचे दोन वेळा खासदार राहिलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष नेतृत्वाशी मतभेद झाल्यानंतर भाजपला रामराम ठोकला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शत्रुघ्न सिन्हा हे आसनसोल लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेत निवडून गेले आहेत.

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा