शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आदित्यनाथ हे मोदी नंबर 2- सरेशवाला

By admin | Updated: April 26, 2017 11:43 IST

मौलाना आझाद राष्ट्रीय ऊर्दू विद्यापीठाचे कुलगुरू जफर युनूस सरेशवाला योगी आदित्यनाथ हे मोदी नंबर 2 असल्याचे म्हणाले आहेत.

ऑनलाइन लोकमतकानपूर, दि. 26 - मौलाना आझाद राष्ट्रीय ऊर्दू विद्यापीठाचे कुलगुरू जफर युनूस सरेशवाला योगी आदित्यनाथ हे मोदी नंबर 2 असल्याचे म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोणत्याही व्यक्तीला निवडण्याची अलौकिक शक्ती आहे. त्यामुळेच योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली आहे, असंही वक्तव्य सरेशवाला यांनी केलं आहे. जाजमऊ येथील एका आयोजित कार्यक्रमात सरेशवाला बोलत होते. ते म्हणाले, मुस्लिमांनी काही गोष्टी मनावर घेऊ नयेत. त्या धारणेतून मुस्लिमांनी बाहेर पडायची गरज आहे, मुस्लिम समाजाला त्यांच्या राजकीय ताकदीचे भान नसल्याचंही सरेशवाला म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी भगवे कपडे परिधान केलेल्या योगी आदित्यनाथ यांची मी भेट घेतली होती. तेव्हा उत्तर प्रदेशमधील मुस्लिमांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरल्याचं मी त्यांच्या कानावर घातले होते. त्यावेळी मुस्लिमांना कोणतीही भीती नाही. उत्तर प्रदेशातील प्रत्येक घरात वीज पोहोचणार असून, उत्तर प्रदेशमध्ये हिंदू आणि मुस्लिम दुश्मनी न करता सलोख्यानं राहतील. हिंदू-मुस्लिम असा भेदभाव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात कधीच नसतो. भाजपाला उत्तर प्रदेशात 40 टक्के मतदान झालं असून, त्यामधील 20 टक्के मुस्लिम, तर 40 टक्के हिंदूंनी मतदान केले नसल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.2002 नंतर गुजरातमध्ये एकही दंगल झाली नाही तरीही अद्यापही 2002च्या दंगलीच्या आठवणींना उजाळा देऊन मोदींवर टीका केली जाते. 1969मध्ये अहमदाबादच्या दंगलीत 5 हजार मुस्लिम जिवानिशी गेले होते. त्यानंतर 1985, 87 आणि 92 मध्येही दंगली झाल्या होत्या. त्या काळात देशात काँग्रेसची सत्ता होती. एके काळी गुजरातमध्ये धार्मिक दंगलीमुळे 5-5 महिने शाळा बंद ठेवल्या जायच्या. 1993च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत झालेल्या दंगलीत 1050 मुस्लिम मारले गेले होते. गुजरात दंगलीप्रकरणी 86 हिंदूंना जन्मठेप झाली, असे याआधी कधीच झाले नव्हते. 70 वर्षांपासून दुस-याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवली जात होती. सोनिया गांधी, ममता, लालू आणि मुलायम या नेत्यांनी मुस्लिम लीडरशिप कधी निर्माण होऊ दिली नाही, असा हल्लाबोल करत 25 कोटी मुस्लिम मागे राहिले तर देशाची प्रगती होणार नाही, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते. त्यामुळे आता आपलं म्हणणं मांडण्यासाठी आपल्याला योग्य लोकांना निवडून द्यावे लागेल, असं आवाहनही सरेशवाला यांनी केलं.