शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

आदित्यनाथ हे मोदी नंबर 2- सरेशवाला

By admin | Updated: April 26, 2017 11:43 IST

मौलाना आझाद राष्ट्रीय ऊर्दू विद्यापीठाचे कुलगुरू जफर युनूस सरेशवाला योगी आदित्यनाथ हे मोदी नंबर 2 असल्याचे म्हणाले आहेत.

ऑनलाइन लोकमतकानपूर, दि. 26 - मौलाना आझाद राष्ट्रीय ऊर्दू विद्यापीठाचे कुलगुरू जफर युनूस सरेशवाला योगी आदित्यनाथ हे मोदी नंबर 2 असल्याचे म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोणत्याही व्यक्तीला निवडण्याची अलौकिक शक्ती आहे. त्यामुळेच योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली आहे, असंही वक्तव्य सरेशवाला यांनी केलं आहे. जाजमऊ येथील एका आयोजित कार्यक्रमात सरेशवाला बोलत होते. ते म्हणाले, मुस्लिमांनी काही गोष्टी मनावर घेऊ नयेत. त्या धारणेतून मुस्लिमांनी बाहेर पडायची गरज आहे, मुस्लिम समाजाला त्यांच्या राजकीय ताकदीचे भान नसल्याचंही सरेशवाला म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी भगवे कपडे परिधान केलेल्या योगी आदित्यनाथ यांची मी भेट घेतली होती. तेव्हा उत्तर प्रदेशमधील मुस्लिमांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरल्याचं मी त्यांच्या कानावर घातले होते. त्यावेळी मुस्लिमांना कोणतीही भीती नाही. उत्तर प्रदेशातील प्रत्येक घरात वीज पोहोचणार असून, उत्तर प्रदेशमध्ये हिंदू आणि मुस्लिम दुश्मनी न करता सलोख्यानं राहतील. हिंदू-मुस्लिम असा भेदभाव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात कधीच नसतो. भाजपाला उत्तर प्रदेशात 40 टक्के मतदान झालं असून, त्यामधील 20 टक्के मुस्लिम, तर 40 टक्के हिंदूंनी मतदान केले नसल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.2002 नंतर गुजरातमध्ये एकही दंगल झाली नाही तरीही अद्यापही 2002च्या दंगलीच्या आठवणींना उजाळा देऊन मोदींवर टीका केली जाते. 1969मध्ये अहमदाबादच्या दंगलीत 5 हजार मुस्लिम जिवानिशी गेले होते. त्यानंतर 1985, 87 आणि 92 मध्येही दंगली झाल्या होत्या. त्या काळात देशात काँग्रेसची सत्ता होती. एके काळी गुजरातमध्ये धार्मिक दंगलीमुळे 5-5 महिने शाळा बंद ठेवल्या जायच्या. 1993च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत झालेल्या दंगलीत 1050 मुस्लिम मारले गेले होते. गुजरात दंगलीप्रकरणी 86 हिंदूंना जन्मठेप झाली, असे याआधी कधीच झाले नव्हते. 70 वर्षांपासून दुस-याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवली जात होती. सोनिया गांधी, ममता, लालू आणि मुलायम या नेत्यांनी मुस्लिम लीडरशिप कधी निर्माण होऊ दिली नाही, असा हल्लाबोल करत 25 कोटी मुस्लिम मागे राहिले तर देशाची प्रगती होणार नाही, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते. त्यामुळे आता आपलं म्हणणं मांडण्यासाठी आपल्याला योग्य लोकांना निवडून द्यावे लागेल, असं आवाहनही सरेशवाला यांनी केलं.