शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

"अयोध्या दौरा राजकीय नाही, मग जागोजागी पोस्टर कशासाठी?"; आदित्य ठाकरेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 14:02 IST

आदित्य ठाकरे लखनौत उतरताच शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन

Aaditya Thackeray Ayodhya Visit : अयोध्या दौरा हा राजकीय नाही तर हा श्रद्धेचा विषय आहे.  प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी मी अयोध्येत आलो आहे. ही राजकारणाची नव्हे तर रामराज्याची भूमी आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे लखनौमधून अयोध्येकडे रवाना झाले. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. या मुद्द्यावरून हनुमानगढ़ीचे महंत राजू दास यांनी आदित्य ठाकरेंना कात्रीत पकडणारा प्रश्न विचारला.

आदित्य ठाकरे जेव्हा लखनौ विमानतळावर पोहोचले त्यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांकडून फुलांच्या पायघड्या घालण्याच आल्या आणि त्यांचे जंगी स्वागत झाले. यावेळी कार्यकर्त्यांना पक्षाच्या आणि नेत्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. तसेच शिवसैनिकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या प्रकारावरून आदित्य ठाकरेंना सवाल करण्यात आला. "शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणतात की हा राजकीय दौरा नाही. पण मग अयोध्येच्या रस्त्यांवर त्यांची एवढी पोस्टर लागली आहेत. घोषणाबाजी सुरू आहे, त्याचं काय? हिंदुत्वाच्या भूमिके विषयीच्या प्रश्नाचंही उत्तर द्यावं लागेल", असे सवाल हनुमानगढीचे महंत राजू दास यांनी आदित्य ठाकरेंना केले.

आदित्य ठाकरे काय म्हणाले...

"आम्ही २०१८ मध्ये अयोध्येत आलो होते तेव्हा 'आधी मंदिर, मग सरकार' असं म्हणालो होतो. त्यानुसार आता मी आज आशीर्वाद घ्यायला आणि प्रार्थना करायला आलो आहे. ही भूमी राजकीय आखाड्याची नाही. ही रामराज्याची भूमी आहे. त्यामुळे येथील मंदिरात गेल्यावर मी कोणतेही मागणे मागण्यापेक्षा आशीर्वाद घेतो आणि मला जे काही देवाने दिले आहे किंवा सेवा करण्याची संधी दिली आहे, त्यासाठी देवाचे धन्यवाद मानतो. आमचे राजकारण समाजकार्यासाठी असते. आमच्या हातून चांगेल कार्य व्हावे, अशी प्रार्थना करत असतो. त्यामुळे हा राजकीय दौरा नसून श्रद्धेचा विषय आहे", अशी आदित्य ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याShiv Senaशिवसेना