शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ना पोलीस शोधू शकले ना कुटुंबीय; आधार कार्डने केला चमत्कार, 7 वर्षांनी मुलांची आईशी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 12:34 IST

सात वर्षांपूर्वी 21 जून 2016 पासून बेपत्ता झालेल्या भाऊ आणि बहिणीचा शोध घेता आला नाही आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही ते सापडले नाहीत.

बिहारच्या पश्चिम चंपारणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आधार कार्डवर असलेल्या अंगठ्याच्या ठशामुळे 7 वर्षांनंतर दोन मुलं त्यांच्या पालकांकडे परत आली आहेत. सर्व प्रयत्न करूनही शिकारपूर पोलिसांना नरकटियागंजच्या प्रकाशनगर नया टोला येथून सात वर्षांपूर्वी 21 जून 2016 पासून बेपत्ता झालेल्या भाऊ आणि बहिणीचा शोध घेता आला नाही आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही ते सापडले नाहीत. पण, अंगठ्याच्या ठशांवरून कुटुंबीयांचा शोध लागला आणि मुलांचा ठावठिकाणाही सापडला.

बहीण कौशकी आणि तिचा भाऊ राजीव कुमार उर्फ ​​इंदरसेन हे दोघेही नरकटियागंज येथून बेपत्ता झाले होते. त्यावेळी त्याची आई सुनीता देवी यांनी शिकारपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणात सुनीताने एका महिलेने आपल्या मुलांना गायब केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यावेळी पोलियांनी याचा शोध घेतला. पण खूप प्रयत्न करूनही ती मुले सापडली नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. त्यावेळी मुलगी सुमारे 12 वर्षांची होती आणि मुलगा सुमारे 9 वर्षांचा होता. कुटुंबीयांनी गोरखपूर, दिल्ली ते कोलकाता प्रत्येक एनजीओ आणि त्यांच्या स्तरावर शोध घेतला. मात्र मुलं कुठेच सापडली नाहीत. इकडे लखनौच्या बालगृहात राहणाऱ्या अंजलीला नववीत प्रवेश घेण्यासाठी आधार कार्डची गरज होती. अशा परिस्थितीत संस्थेने मुलीचे आधार कार्ड बनवण्यासाठी अंजलीच्या अंगठ्याचा ठसा घेतला तेव्हा तिची ओळख उघड झाली. त्यानंतर असं समोर आलं की अंजलीचं आधार कार्ड आधीच बनलं आहे आणि तिचं नाव कौशकी होतं.

लखनौ येथील बालसुधारगृहात राहणाऱ्या दोन भाऊ-बहिणींचा शोध लागल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर संस्थेने शिकारपूर पोलिसांशी संपर्क साधला, शिकारपूर पोलीस तेथे पोहोचले तेव्हा कौशकी भेटली जी आता अंजली झाली होती. ती त्यांच्यासोबत नरकटियागंजला पोहोचली. सहावीत शिकणारा भाऊ राजीवची परीक्षा सुरू असल्याने तो आला नाही. घरी येऊन तिच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर अंजली खूप आनंदी आहे आणि कुटुंबही आनंदी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डBiharबिहार