शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ना पोलीस शोधू शकले ना कुटुंबीय; आधार कार्डने केला चमत्कार, 7 वर्षांनी मुलांची आईशी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 12:34 IST

सात वर्षांपूर्वी 21 जून 2016 पासून बेपत्ता झालेल्या भाऊ आणि बहिणीचा शोध घेता आला नाही आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही ते सापडले नाहीत.

बिहारच्या पश्चिम चंपारणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आधार कार्डवर असलेल्या अंगठ्याच्या ठशामुळे 7 वर्षांनंतर दोन मुलं त्यांच्या पालकांकडे परत आली आहेत. सर्व प्रयत्न करूनही शिकारपूर पोलिसांना नरकटियागंजच्या प्रकाशनगर नया टोला येथून सात वर्षांपूर्वी 21 जून 2016 पासून बेपत्ता झालेल्या भाऊ आणि बहिणीचा शोध घेता आला नाही आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही ते सापडले नाहीत. पण, अंगठ्याच्या ठशांवरून कुटुंबीयांचा शोध लागला आणि मुलांचा ठावठिकाणाही सापडला.

बहीण कौशकी आणि तिचा भाऊ राजीव कुमार उर्फ ​​इंदरसेन हे दोघेही नरकटियागंज येथून बेपत्ता झाले होते. त्यावेळी त्याची आई सुनीता देवी यांनी शिकारपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणात सुनीताने एका महिलेने आपल्या मुलांना गायब केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यावेळी पोलियांनी याचा शोध घेतला. पण खूप प्रयत्न करूनही ती मुले सापडली नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. त्यावेळी मुलगी सुमारे 12 वर्षांची होती आणि मुलगा सुमारे 9 वर्षांचा होता. कुटुंबीयांनी गोरखपूर, दिल्ली ते कोलकाता प्रत्येक एनजीओ आणि त्यांच्या स्तरावर शोध घेतला. मात्र मुलं कुठेच सापडली नाहीत. इकडे लखनौच्या बालगृहात राहणाऱ्या अंजलीला नववीत प्रवेश घेण्यासाठी आधार कार्डची गरज होती. अशा परिस्थितीत संस्थेने मुलीचे आधार कार्ड बनवण्यासाठी अंजलीच्या अंगठ्याचा ठसा घेतला तेव्हा तिची ओळख उघड झाली. त्यानंतर असं समोर आलं की अंजलीचं आधार कार्ड आधीच बनलं आहे आणि तिचं नाव कौशकी होतं.

लखनौ येथील बालसुधारगृहात राहणाऱ्या दोन भाऊ-बहिणींचा शोध लागल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर संस्थेने शिकारपूर पोलिसांशी संपर्क साधला, शिकारपूर पोलीस तेथे पोहोचले तेव्हा कौशकी भेटली जी आता अंजली झाली होती. ती त्यांच्यासोबत नरकटियागंजला पोहोचली. सहावीत शिकणारा भाऊ राजीवची परीक्षा सुरू असल्याने तो आला नाही. घरी येऊन तिच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर अंजली खूप आनंदी आहे आणि कुटुंबही आनंदी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डBiharबिहार