शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

पाकचे अतिरिक्त दोन हजार सैनिक सीमेवर तैनात; भारताचे बारीक लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 06:46 IST

घुसखोरीच्या प्रयत्नांत वाढ : दहशतवाद्यांना केली जातेय मदत

नवी दिल्ली : काश्मीर प्रश्नावरून भारत व पाकिस्तानमधील तणावात वाढ झाली असतानाच, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकव्याप्त काश्मीरमधील बाघ व कोटली येथे पाकिस्तानने दोन हजार अतिरिक्त सैनिक तैनात केले आहेत. पाक लष्कराच्या हालचालींवर भारतीय जवान बारीक नजर ठेवून आहेत.

यासंदर्भात भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून तीस किमी दूर अंतरावर पाकिस्तानच्या या दोन हजार सैनिकांनी तळ ठोकला आहे. लष्कर-ए-तय्यबा व जैश-ए-मोहम्मद या संघटनांनी पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिकांना व अफगाणी नागरिकांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांमध्ये भरती करण्यास सुरुवात केली आहे. या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसखोरी करता यावी, यासाठी वाढीव फौजफाटा पाकिस्तानने सीमेजवळ आणून ठेवल्याचे सांगण्यात येते. भारताने ३७० कलमातील अनेक तरतुदी रद्द केल्यानंतर सीमेपलीकडून काश्मीरमध्ये होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांत वाढ झाली आहे. त्यासाठी दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्करातील स्पेशल सर्व्हिसेस ग्रुपचे (एसएसजी) सैनिक मदत करतात. भारतीय जवानांनी नुकत्याच दिलेल्या चोख प्रत्युत्तरात एसएसजीचे दहा सैनिक ठार झाले होते.दहशतवाद्यांकरवी काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर घातपाती कारवाया करण्याचा पाकिस्तानचा मनसुबा आहे. काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय स्तरावर कांगावा करण्याचे पाकिस्तानचे सारे प्रयत्न फोल ठरले आहेत.गुजरात सीमेवर हालचालीकाश्मीरमध्येच नव्हे, तर गुजरातला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीर क्रीक भागातही पाकिस्तानने आपले सैनिक आणून ठेवले आहेत. काळ््या यादीत समावेश करण्याच्या फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) दिलेल्या इशाºयानंतर काही काळ थांबवलेली दहशतवाद्यांची भरती पाकिस्तानने आता नव्याने सुरू केल्याचे भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Borderसीमारेषा