शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

विश्लेषण जोड

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

विरोधकांना काय बोलायचे ते बोलू द्या, प्रत्येकाला महासभेत मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. मात्र विरोधकांचा आवाज दाबून विषय मंजूर करण्याचा चुकीचा पायंडा तोही आमदारांच्या साक्षीने महापालिकेच्या सभेत पडतोय हे नगरकरांना रुचेल काय याचे सर्वेक्षण संग्राम जगताप यांनी एकदा करावेच, म्हणजे समजेल. ज्या सभागृहात नगर शहर विकासाचे धोरण ठरवायचे असते ते ठरविताना सभागृहात ज्येष्ठाचे अनुभव विचारात घेतले तर ते अधिक सुबक पध्दतीने उतरेल हे न कळण्याइतपत जगताप-कळमकर दूधखुळे नक्कीच नाहीत. नव्या दमाच्या नगरसेवकांना अजून नगरसेवक निधी खर्ची कसा टाकावा याचेही ज्ञान नाही. त्यांनी जणू काही निम्मी हयात पालिकेच्या राजकारणात गेली अशा अविर्भावात बोलणे योग्य की अयोग्य हे त्यांनीच ठरवावे. सत्ताधारी पक्षातील तरुणांना नगर शहर विकासाची चाड असेल तर यापुढे असे घडणार नाही

विरोधकांना काय बोलायचे ते बोलू द्या, प्रत्येकाला महासभेत मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. मात्र विरोधकांचा आवाज दाबून विषय मंजूर करण्याचा चुकीचा पायंडा तोही आमदारांच्या साक्षीने महापालिकेच्या सभेत पडतोय हे नगरकरांना रुचेल काय याचे सर्वेक्षण संग्राम जगताप यांनी एकदा करावेच, म्हणजे समजेल. ज्या सभागृहात नगर शहर विकासाचे धोरण ठरवायचे असते ते ठरविताना सभागृहात ज्येष्ठाचे अनुभव विचारात घेतले तर ते अधिक सुबक पध्दतीने उतरेल हे न कळण्याइतपत जगताप-कळमकर दूधखुळे नक्कीच नाहीत. नव्या दमाच्या नगरसेवकांना अजून नगरसेवक निधी खर्ची कसा टाकावा याचेही ज्ञान नाही. त्यांनी जणू काही निम्मी हयात पालिकेच्या राजकारणात गेली अशा अविर्भावात बोलणे योग्य की अयोग्य हे त्यांनीच ठरवावे. सत्ताधारी पक्षातील तरुणांना नगर शहर विकासाची चाड असेल तर यापुढे असे घडणार नाही याची दक्षता घेतली तरी पुरे, नाहीतर हे असे गुंडागर्दीची भाषा करणारे अन् त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठबळ देणारे काय शहर विकासाचे धोरण आखणार? असा प्रश्न प्रत्येक नगरकरांच्या मनात नक्कीच निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
आमदार संग्राम जगताप हे आता विधीमंडळ सदस्य आहेत. तेथील नियम त्यांनी जाणून घेतले असतीलच. तेथे जसे राज्याचे धोरण ठरते तसेच येथे शहराचे धोरण ठरते हेही ते विसरले काय? शहर विकासाच्या मुद्यावर नगरकरांनी तुम्हाला विधानसभेत पाठविले. त्यांच्या अपेक्षा सार्थ ठरवू असे जाहीर आश्वासन जगताप अजूनही देतात. दहा वर्षापूर्वीचा जगताप कुटुंबाचा काळ आठवला तर त्यांच्यासोबतही नाही अन् विरोधाताही नाही असा कल नगरकरांचा असायचा. मध्यंतरीच्या काळात संग्राम जगताप यांनीच निर्माण झालेली ती प्रतिमा बदलविली. त्याचे फळ त्यांना मिळाले. पण आता भोवताली जमा झालेल्या कोंडाळ्यात राहून संग्राम जगताप पुन्हा त्या प्रतिमेकडे झुकत असल्याचे शल्य नगरकरांच्या जिव्हारी लागेल याचे भान संग्राम जगताप यांनी ठेवले तरी पुरे!