शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

अदानी समूहाने केला ५० हजार कोटींचा घोटाळा : काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:08 IST

५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून २०१३ पासून फसविले असले, तरी केंद्र सरकार ती कंपनी गौतम अदानी यांची असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

शीलेश शर्मा।नवी दिल्ली : प्रत्यक्ष व्यवसाय न करणाºया कंपन्यांच्या माध्यमातून अदानी समूहाने एकाच फटक्यात ५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून २०१३ पासून फसविले असले, तरी केंद्र सरकार ती कंपनी गौतम अदानी यांची असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वादही आहे, असा आरोप काँग्रेसने शुक्रवारी येथे केला.पक्षाचे नेते अजय माकन म्हणाले की, महसूल गुप्तचर विभागाच्या ९७ पानांच्या अहवालात अदानी समूहाने बनावट कंपन्यांच्या मदतीने वीज सयंत्रांची खरेदी चीन आणि कोरियातून करून ती थेट भारतात पाठवली, परंतु त्याची बिले व इतर दस्तावेजांत ही खरेदी संयुक्त अरब अमिरातची कंपनी इलेक्ट्रोजन इन्फ्रा एफझेडईकडून केल्याचे दाखवले. संयुक्त अरब अमिरातची ही बनावट कंपनी अदानी यांनीच घोटोळे करण्यासाठीच स्थापन केली होती. या सगळ््या प्रकाराची केंद्रीय गुप्तचर खात्याकडून (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झाली पाहिजे.>अहवाल का दडपला?माकन म्हणाले की, पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भ्रष्टाचारविरोधाच्या गप्पा करतात. मग फेब्रुवारी, २०१३ मध्ये यूपीए सरकारने जी चौकशी सुरू केली व त्याचा जो अहवाल दाखल झाला, तो दडपून का टाकला जात आहे? माकन यांनी या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी केली. या भ्रष्टाचाराचा थेट फटका वीजग्राहकांना बसला आहे, असे सांगून, अदानी समूहाकडून जेथे कोठे वीजपुरवठा केला जात आहे. तेथील विजेचा दर युनिटमागे दोन रुपयांनी कमी केला जावा, अशी मागणी माकन यांनी केली.>आरोप खोटे; कंपनीचा खुलासाअजय माकन यांनी केलेल्या आरोपांचा अदानी समूहाने पत्रकाद्वारे इन्कार केला आहे. हे आरोप सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहेत, त्यात तथ्य नाही आणि सर्व नियम व नियामक संस्थांच्या आधीन राहून आम्ही सर्व व्यवहार केले आहेत, महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या चौकशीत आम्ही पूर्णपणे सहकार्य केले होते, असे समूहाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. मात्र, चौकशीच्या अहवालाविषयी प्रवक्त्याने कोणतेही भाष्य केलेले नाही.