शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

अदानी समूहाने केला ५० हजार कोटींचा घोटाळा : काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:08 IST

५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून २०१३ पासून फसविले असले, तरी केंद्र सरकार ती कंपनी गौतम अदानी यांची असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

शीलेश शर्मा।नवी दिल्ली : प्रत्यक्ष व्यवसाय न करणाºया कंपन्यांच्या माध्यमातून अदानी समूहाने एकाच फटक्यात ५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून २०१३ पासून फसविले असले, तरी केंद्र सरकार ती कंपनी गौतम अदानी यांची असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वादही आहे, असा आरोप काँग्रेसने शुक्रवारी येथे केला.पक्षाचे नेते अजय माकन म्हणाले की, महसूल गुप्तचर विभागाच्या ९७ पानांच्या अहवालात अदानी समूहाने बनावट कंपन्यांच्या मदतीने वीज सयंत्रांची खरेदी चीन आणि कोरियातून करून ती थेट भारतात पाठवली, परंतु त्याची बिले व इतर दस्तावेजांत ही खरेदी संयुक्त अरब अमिरातची कंपनी इलेक्ट्रोजन इन्फ्रा एफझेडईकडून केल्याचे दाखवले. संयुक्त अरब अमिरातची ही बनावट कंपनी अदानी यांनीच घोटोळे करण्यासाठीच स्थापन केली होती. या सगळ््या प्रकाराची केंद्रीय गुप्तचर खात्याकडून (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झाली पाहिजे.>अहवाल का दडपला?माकन म्हणाले की, पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भ्रष्टाचारविरोधाच्या गप्पा करतात. मग फेब्रुवारी, २०१३ मध्ये यूपीए सरकारने जी चौकशी सुरू केली व त्याचा जो अहवाल दाखल झाला, तो दडपून का टाकला जात आहे? माकन यांनी या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी केली. या भ्रष्टाचाराचा थेट फटका वीजग्राहकांना बसला आहे, असे सांगून, अदानी समूहाकडून जेथे कोठे वीजपुरवठा केला जात आहे. तेथील विजेचा दर युनिटमागे दोन रुपयांनी कमी केला जावा, अशी मागणी माकन यांनी केली.>आरोप खोटे; कंपनीचा खुलासाअजय माकन यांनी केलेल्या आरोपांचा अदानी समूहाने पत्रकाद्वारे इन्कार केला आहे. हे आरोप सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहेत, त्यात तथ्य नाही आणि सर्व नियम व नियामक संस्थांच्या आधीन राहून आम्ही सर्व व्यवहार केले आहेत, महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या चौकशीत आम्ही पूर्णपणे सहकार्य केले होते, असे समूहाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. मात्र, चौकशीच्या अहवालाविषयी प्रवक्त्याने कोणतेही भाष्य केलेले नाही.