शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

मोठ्या देशांना विश्वासात घेऊनच पाकमध्ये कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:26 IST

विजय गोखलेंवर होती जबाबदारी हवाई हल्ल्यानंतर सर्वांना दिली माहिती

संतोष ठाकूर ।लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या खैबरपख्तूनस्थित बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राइक-२ करायच्या आधी भारताने जगातील जवळपास सगळ्या देशांना अशा प्रकारच्या कारवाईचे संकेत देत त्यांना विश्वासात घेतले होते. ही जबाबदारी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी स्वत: सांभाळली होती. याच कारणामुळे कारवाईनंतर परराष्ट्र मंत्रालयाने जगातील सगळ्या देशांना या कारवाईचे सविस्तर विवरण दिले.

नवी दिल्लीतील सर्व प्रमुख देशांचे राजदूत आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी एअर स्ट्राइकची माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने म्हटले की, जेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) पुलवामा हल्ल्याची निंदा केली, तेव्हाच आमच्या कारवाईला जगाचा पाठिंबा मिळाला होता. यूएनएससीने आपल्या संदेशात जगातील प्रत्येक देशाला पुलवामा हल्ल्याचा कट रचणाºया जैश-ए-मोहम्मदविरुद्धच्या कारवाईत भारताला सक्रिय मदत करावी, असे आवाहन निवेदनात केले होते. पाकिस्तानचा मित्र चीननेदेखील यूएनएससीच्या निवेदनावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतरच भारताने एअर स्ट्राइकसाठी जगातील सगळ्या देशांना विश्वासात घ्यायला सुरुवात केली होती. या निवेदनावरून आमच्या हे लक्षात आले की, पाकिस्तानच्या दहशतवादामुळे जगही त्रासून गेले आहे आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला करण्याची हीच वेळ आहे.पाकची विनंती गेली वायापाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कसुरी यांनी संयुक्तराष्ट्रांच्या सचिवांना पत्र लिहून म्हटले होते की, पुलवामा हल्ल्यानंतर भारत आमच्या देशावर हल्ल्याची तयारी करीत आहे, त्याला थांबवावे. या पत्रावर संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांवर कारवाई का करीत नाही, असा सवाल केला, तसेच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे तळ पाकिस्तानने स्वत: नष्ट करावेत, असेही सांगण्यात आले. जगालाही दहशतवाद्यांचे तळ नष्ट व्हावेत, असे वाटते, हा आमच्यासाठी शुभसंकेत होता. त्यानंतर, आम्ही जगाला विश्वासात घेऊन एअर स्ट्राइकची तयारी सुरू केली, असे हा अधिकारी म्हणाला.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक