शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मोठ्या देशांना विश्वासात घेऊनच पाकमध्ये कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:26 IST

विजय गोखलेंवर होती जबाबदारी हवाई हल्ल्यानंतर सर्वांना दिली माहिती

संतोष ठाकूर ।लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या खैबरपख्तूनस्थित बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राइक-२ करायच्या आधी भारताने जगातील जवळपास सगळ्या देशांना अशा प्रकारच्या कारवाईचे संकेत देत त्यांना विश्वासात घेतले होते. ही जबाबदारी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी स्वत: सांभाळली होती. याच कारणामुळे कारवाईनंतर परराष्ट्र मंत्रालयाने जगातील सगळ्या देशांना या कारवाईचे सविस्तर विवरण दिले.

नवी दिल्लीतील सर्व प्रमुख देशांचे राजदूत आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी एअर स्ट्राइकची माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने म्हटले की, जेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) पुलवामा हल्ल्याची निंदा केली, तेव्हाच आमच्या कारवाईला जगाचा पाठिंबा मिळाला होता. यूएनएससीने आपल्या संदेशात जगातील प्रत्येक देशाला पुलवामा हल्ल्याचा कट रचणाºया जैश-ए-मोहम्मदविरुद्धच्या कारवाईत भारताला सक्रिय मदत करावी, असे आवाहन निवेदनात केले होते. पाकिस्तानचा मित्र चीननेदेखील यूएनएससीच्या निवेदनावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतरच भारताने एअर स्ट्राइकसाठी जगातील सगळ्या देशांना विश्वासात घ्यायला सुरुवात केली होती. या निवेदनावरून आमच्या हे लक्षात आले की, पाकिस्तानच्या दहशतवादामुळे जगही त्रासून गेले आहे आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला करण्याची हीच वेळ आहे.पाकची विनंती गेली वायापाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कसुरी यांनी संयुक्तराष्ट्रांच्या सचिवांना पत्र लिहून म्हटले होते की, पुलवामा हल्ल्यानंतर भारत आमच्या देशावर हल्ल्याची तयारी करीत आहे, त्याला थांबवावे. या पत्रावर संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांवर कारवाई का करीत नाही, असा सवाल केला, तसेच दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे तळ पाकिस्तानने स्वत: नष्ट करावेत, असेही सांगण्यात आले. जगालाही दहशतवाद्यांचे तळ नष्ट व्हावेत, असे वाटते, हा आमच्यासाठी शुभसंकेत होता. त्यानंतर, आम्ही जगाला विश्वासात घेऊन एअर स्ट्राइकची तयारी सुरू केली, असे हा अधिकारी म्हणाला.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक