शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणा पोलिसांची कृती रानटी; अमरिंदर सिंग यांचा घरचा अहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 05:53 IST

आंदोलक शेतकऱ्यांना केलेल्या मारहाणीचा निषेध; पोलिसांवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : खनौरी सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांवर हरयाणा पोलिसांनी केलेली कारवाई ही रानटी असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांनी केली. त्यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली.

प्रीतपाल सिंग पंजाब-हरयाणा सीमेवरील खनौरी येथे लंगर सेवा करत असताना त्यांना हरयाणा पोलिसांनी कथितपणे ओढून नेले, मारहाण करण्यात आली, असा आरोप शेतकरी नेते बलदेव सिंग सिरसा यांनी केला आहे. प्रीतपाल यांच्यावर चंडीगडमध्ये उपचार सुरू आहेत.

मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववतहरयाणा सरकारने रविवारी पंजाबच्या सीमेला लागून असलेल्या अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा या सात जिल्ह्यांमध्ये मोबाइल इंटरनेट आणि मोठ्या प्रमाणात एसएमएस सेवा पूर्ववत केली आहे. पंजाब-हरयाणा सीमेवरील शंभू बॉर्डरवर आंदोलक शेतकरी अद्याप ठाण मांडून आहेत.

सिंधू, टिकरी सीमेवरील अडथळे दूरशेतकऱ्यांनी मोर्चाला स्थगिती दिल्यानंतर रविवारी सिंधू आणि टिकरी सीमेवरील काही ठिकाणी नाकेबंदी हटवून प्रवाशांसाठी रस्ता मोकळा केला. आम्ही प्रवाशासाठी काही अडथळा दूर करत आहोत. तरीही पोलिस आणि निमलष्करी दलाकडून २४ तास पाळत ठेवण्यात ठेवली जाईल. सध्या वाहनांच्या वाहतुकीला परवानगी नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी, शहर पोलिसांनी सिंधू आणि टिकरी सीमेवर लहान मार्ग वापरून दिल्लीकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी सिमेंटचे दोन मोठे अडथळे दूर केले.

आंदोलनात आजवर काय-काय घडले?

  • १३ फेब्रुवारी रोजी सुरक्षा दलांनी 'दिल्ली चलो' मोर्चा रोखल्यापासून आंदोलक शेतकरी हरयाणाला लागून असलेल्या पंजाबच्या खनौरी आणि शंभू सीमेवर ठाण मांडून आहेत.
  • खनौरी सीमेवर बुधवारी सुरक्षेसाठी असलेल्या जवानांशी झालेल्या झटापटीत शुभकरन सिंग (२१) याचा मृत्यू झाला होता. शुभकरण सिंग याच्यावर अद्याप अंत्यसंस्कार झालेले नाहीत.
  • यापूर्वी १८ फेब्रुवारी रोजी चंडीगडमध्ये केंद्रीय मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये झालेली चौथ्या फेरीतील चर्चाही यशस्वी ठरली नाही.
  • मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलक २९ फेब्रुवारीपर्यंत हरयाणा आणि पंजाबच्या सीमेवर असलेल्या खनौरी आणि शंभू सीमेवर तळ ठोकून राहतील, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले.
टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनHaryanaहरयाणा