शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

आचार्य विद्यासागर यांची सल्लेखना समाधी; पहाटे घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 05:41 IST

छत्तीसगडमध्ये दुखवटा जाहीर

राजनांदगाव : प्रसिद्ध जैन धर्मगुरू आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांनी ‘सल्लेखना’ घेतल्यानंतर रविवारी छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे अखेरचा श्वास घेतला. सल्लेखना ही एक जैन धार्मिक प्रथा आहे, ज्यामध्ये आध्यात्मिक शुद्धीसाठी स्वेच्छेने मृत्यूपर्यंत उपवास केला जातो. आचार्य विद्यासागर महाराज यांनी पहाटे २:३५ वाजता चंद्रगिरी तीर्थ येथे ‘सल्लेखना’द्वारे समाधी घेतली, असे चंद्रगिरी तीर्थच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

अर्धा दिवस दुखवटा

आचार्य विद्यासागर महाराजांच्या सल्लेखना समाधीनंतर छत्तीसगड सरकारने रविवारी अर्ध्या दिवसाचा दुखवटा जाहीर केला होता.

राष्ट्रध्वज अर्ध्यावर  उतरविण्यात आला आणि सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले.

तीन दिवसांपासून साेडले हाेते अन्न आणि पाणी

‘महाराज गेल्या सहा महिन्यांपासून डोंगरगड येथील तीर्थावर मुक्कामाला होते आणि गेले काही दिवस त्यांची तब्येत बिघडली होती. गेल्या तीन दिवसांपासून ते सल्लेखना पाळत होते आणि त्यांनी अन्न-पाणी सोडले होते,’ असे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

श्रद्धांजली वाहण्यासाठी दुपारी १ वाजता मिरवणूक काढण्यात आली. शेकडो भाविकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. चंद्रगिरी तीर्थावर त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.