शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अपघातांमुळे तोंड लपवावे लागते...; नितीन गडकरी यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 06:06 IST

जगभरात लोक वेगाने वाहन चालवतात ही समस्या नाही. मात्र, भारतात लेन शिस्तभंगामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : वाहतुकीच्या नियमांचे योग्यरीत्या पालन होत नसल्याने व बेशिस्तपणामुळे देशात सर्वाधिक अपघात होत असल्याचा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला. नियमांचे पालन न झाल्यामुळे मुंबईसारख्या शहरात माझ्या स्वत:च्या कारचा दोन वेळा दंड भरावा लागल्याचे लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना गडकरींनी स्पष्ट केले. 

जगभरात लोक वेगाने वाहन चालवतात ही समस्या नाही. मात्र, भारतात लेन शिस्तभंगामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. लोकांना, विशेषत: तरुणांना वाहतूक शिस्तीच्या नियमाबद्दल प्रबोधनाची तर लहान मुलांना नियमांचे महत्त्व पटवून देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. लोकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये, यासाठी रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असे गडकरी म्हणाले.

अपघात मालिका कमी होण्याऐवजी वाढत आहे nदेशातील रस्ते अपघाताचा विक्रम एवढा वाईट आहे की जागतिक परिषदेत तोंड लपवावे लागते. nरस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. मात्र, अपघाताची मालिका कमी होण्याऐवजी वाढत आहे, असे गडकरी म्हणाले. 

४७४ लाेकांचा रस्ते अपघातात दरराेज भारतात मृत्यू हाेताे.१.७ लाख लाेकांचा २०२३ मध्ये मृत्यू झाला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीlok sabhaलोकसभा