शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

चांगल्या रस्त्यांमुळेच अपघात होतात; भाजपाच्या उपमुख्यमंत्र्यांचं अजब तर्कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 12:15 IST

उपमुख्यमंत्र्यांच्या विधानावर सोशल मीडियाची टीका

बंगळुरू: देशात नवा मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. त्यामुळे नियम मोडल्यावर चालकांना भरभक्कम दंड भरावा लागतो आहे. यानंतर आता चांगल्या रस्त्यांची मागणी जोर धरू लागली आहे. आधी चांगले रस्ते द्या आणि मग दंड वसूल करा, असा सूर सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. यावर भाष्य करताना खराब रस्त्यांमुळे नव्हे, तर चांगल्या रस्त्यांमुळे अपघात होत असल्याचं अजब विधान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद करजोल यांनी केला आहे. करजोल यांच्या विधानावर सोशल मीडियानं टीकेची झोड उठवली आहे. अपघातांसाठी खराब रस्ते नव्हे, तर चांगले रस्ते जबाबदार आहेत, असं अजब तर्कट गोविंद करजोल यांनी सांगितलं. 'द्रुतगती महामार्गांची स्थिती अतिशय उत्तम असते. त्यावर 100 ते 120 किलोमीटर वेगानं वाहनं धावतात आणि अपघात होतात,' असं करजोल म्हणाले. सर्वाधिक अपघात द्रुतगती मार्गावरच होतात, असा दावादेखील त्यांनी केला. नव्या मोटार वाहन कायद्यातील दंडाची रक्कम जास्त असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होईल आणि त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असं करजोल यांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पादेखील नव्या मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या रकमेविरोधात आहेत. दंडाची रक्कम कमी करण्यासाठी गुजरात मॉडेलचा अभ्यास करा, असे आदेश येडियुरप्पांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. गुजरातनं नव्या मोटार वाहन कायद्यातील दंडाची रक्कम थेट 90 टक्क्यांनी कमी केली आहे. कर्नाटक सरकारदेखील लवकरच गुजरातप्रमाणे दंडाची रक्कम कमी करू शकतं.  

टॅग्स :Karnatakकर्नाटक