शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

रॅगिंगचा परंपरा म्हणून केला जातो स्वीकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 04:19 IST

एकीकडे रॅगिंगला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासह राज्य सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे याविरोधात खुद्द विद्यार्थीच तक्रार करत नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

बंगळुरू : एकीकडे रॅगिंगला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासह राज्य सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे याविरोधात खुद्द विद्यार्थीच तक्रार करत नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ८४ टक्के विद्यार्थी रॅगिंगविरोधात ‘आवाज’ बंद करतात. तर बहुतांशी विद्यार्थी ही एक परंपरा म्हणून रॅगिंगचा स्वीकार करतात, अशी धक्कादायक बाब सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या पॅनेलच्या सर्वेक्षणातून उघडकीस आलेली आहे. या सर्वेक्षणात देशभरातील १०,६३२ विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यात आला.जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल अ‍ॅण्ड न्यूरोसायन्सेसच्या (एनआयएमएचएएनएस) तज्ज्ञांचे मिळून सर्वोच्च न्यायालयाने एक पॅनेल नियुक्त केले. या पॅनेलने विद्यार्थ्यांच्या रॅगिंगसंदर्भातील मानसिकतेचा अभ्यास केला. या अभ्यासाचा निष्कर्ष युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने (यूजीसी) प्रसिद्ध केला.देशभरातील एकूण ३७ महाविद्यालयांच्या १०,६३२ विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास या पॅनेलने केला. ३६ टक्के विद्यार्थ्यांच्या मते रॅगिंग त्यांना या जगातील भयाण वास्तवाची जाणीव करून देते व त्याच्याशी सामना करण्यासाठी मानसिकरीत्या तयार करते. तर ३२ टक्के विद्यार्थी रॅगिंगचा आनंद घेतात. मात्र ८४ टक्के विद्यार्थी रॅगिंगविरोधात तक्रार न करणे पसंद करतात, असे सर्वेक्षणाद्वारे समोर आले आहे. ४० टक्के विद्यार्थ्यांना त्यांचे सिनिअर या ना त्या कारणास्तव रॅगिंग करतात. याचाच अर्थ रॅगिंगविरुद्ध महाविद्यालयांत यंत्रणा असतानाही ही प्रथा अद्याप बंद झालेली नाही. मात्र काही विद्यार्थ्यांना ही ‘परंपरा’ वाटते आणि ती पुढे सरकलीच पाहिजे असे वाटते.प्रतिवादी विद्यार्थ्यांतील ३५.१ टक्के विद्यार्थ्यांनी सौम्य रॅगिंगचा अनुभव घेतला आहे. तर ४.१ टक्के विद्यार्थ्यांना गंभीर प्रकारांना सामोरे जावे लागले आहे. याच विद्यार्थ्यांना रॅगिंगच्या वेळी त्यांच्या भावनिक अनुभवाविषयी विचारले असता त्यांच्याकडून मिळालेली उत्तरे धक्कादायक असल्याचे पॅनेलने अहवालात म्हटले. ३३ टक्के विद्यार्थ्यांनी आपण रॅगिंगचा अनुभव घेतल्याचे सांगितले. तर ४५.१ टक्के विद्यार्थ्यांनी सुरुवातीला आपल्याला वाईट वाटल्याचे व त्यानंतर आनंद घेतल्याचे सांगितले. तर काहींनी सांगितले की, आपल्यावर ज्या सिनिअरने रॅगिंग केली होती, त्या सिनिअरची आणि आपली चांगली मैत्री झाल्याचेही पॅनेलला सांगितले.रॅगिंगच्या वेळी काही जणांना त्यांच्या सिनिअर्सना ‘सर’, ‘मॅडम’ म्हणण्यास सांगितले. तर काही जणांना मद्यपान किंवा धूम्रपान करण्यास सांगितले. त्याशिवाय काहींचा मानसिक किंवा शारीरिक छळ करण्यात आला. मात्र याविरोधात आवाज उठवण्याऐवजी बहुतांशी विद्यार्थ्यांनी याचा स्वीकार केला.विद्यार्थ्यांनी रॅगिंगचा स्वीकार केला म्हणून त्याबद्दल कोणाच्याही निदर्शनास आणून न देणे, हे अयोग्य आहे, असे पॅनेलचे सदस्य डॉ. शेखर सेशाद्री यांनी सांगितले. ‘रॅगिंग ही अनुवांशिक आणि असमान समाज व्यवस्थेतून निर्माण झाली आहे. याबद्दल तक्रार न करणे याचा अर्थ विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे आणि अस्तित्वात असलेल्या यंत्रणेच्या कारभाराविषयी अविश्वास आहे,’ असे मत डॉ. शेखर यांनी व्यक्त केले.यावर उपाय म्हणून पॅनेलने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची सूचना केली आहे. रॅगिंगबाबत ‘शून्य सहनशक्ती’ ठेवण्याची सूचनाही महाविद्यालयांना केली आहे.>१०,६३२ विद्यार्थांच्या मानसिकतेचा अभ्यासजवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल अ‍ॅण्ड न्यूरोसायन्सेसच्या तज्ज्ञांचे मिळून सर्वोच्च न्यायालयाने एक पॅनेल नियुक्त केले. या पॅनेलने विद्यार्थ्यांच्या रॅगिंगसंदर्भातील मानसिकतेचा अभ्यास केला. या अभ्यासाचा निष्कर्ष युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने (यूजीसी) प्रसिद्ध केला. सर्वेक्षणात देशभरातील १०,६३२ विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यात आला.