शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

रॅगिंगचा परंपरा म्हणून केला जातो स्वीकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 04:19 IST

एकीकडे रॅगिंगला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासह राज्य सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे याविरोधात खुद्द विद्यार्थीच तक्रार करत नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

बंगळुरू : एकीकडे रॅगिंगला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासह राज्य सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे याविरोधात खुद्द विद्यार्थीच तक्रार करत नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ८४ टक्के विद्यार्थी रॅगिंगविरोधात ‘आवाज’ बंद करतात. तर बहुतांशी विद्यार्थी ही एक परंपरा म्हणून रॅगिंगचा स्वीकार करतात, अशी धक्कादायक बाब सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या पॅनेलच्या सर्वेक्षणातून उघडकीस आलेली आहे. या सर्वेक्षणात देशभरातील १०,६३२ विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यात आला.जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल अ‍ॅण्ड न्यूरोसायन्सेसच्या (एनआयएमएचएएनएस) तज्ज्ञांचे मिळून सर्वोच्च न्यायालयाने एक पॅनेल नियुक्त केले. या पॅनेलने विद्यार्थ्यांच्या रॅगिंगसंदर्भातील मानसिकतेचा अभ्यास केला. या अभ्यासाचा निष्कर्ष युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने (यूजीसी) प्रसिद्ध केला.देशभरातील एकूण ३७ महाविद्यालयांच्या १०,६३२ विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास या पॅनेलने केला. ३६ टक्के विद्यार्थ्यांच्या मते रॅगिंग त्यांना या जगातील भयाण वास्तवाची जाणीव करून देते व त्याच्याशी सामना करण्यासाठी मानसिकरीत्या तयार करते. तर ३२ टक्के विद्यार्थी रॅगिंगचा आनंद घेतात. मात्र ८४ टक्के विद्यार्थी रॅगिंगविरोधात तक्रार न करणे पसंद करतात, असे सर्वेक्षणाद्वारे समोर आले आहे. ४० टक्के विद्यार्थ्यांना त्यांचे सिनिअर या ना त्या कारणास्तव रॅगिंग करतात. याचाच अर्थ रॅगिंगविरुद्ध महाविद्यालयांत यंत्रणा असतानाही ही प्रथा अद्याप बंद झालेली नाही. मात्र काही विद्यार्थ्यांना ही ‘परंपरा’ वाटते आणि ती पुढे सरकलीच पाहिजे असे वाटते.प्रतिवादी विद्यार्थ्यांतील ३५.१ टक्के विद्यार्थ्यांनी सौम्य रॅगिंगचा अनुभव घेतला आहे. तर ४.१ टक्के विद्यार्थ्यांना गंभीर प्रकारांना सामोरे जावे लागले आहे. याच विद्यार्थ्यांना रॅगिंगच्या वेळी त्यांच्या भावनिक अनुभवाविषयी विचारले असता त्यांच्याकडून मिळालेली उत्तरे धक्कादायक असल्याचे पॅनेलने अहवालात म्हटले. ३३ टक्के विद्यार्थ्यांनी आपण रॅगिंगचा अनुभव घेतल्याचे सांगितले. तर ४५.१ टक्के विद्यार्थ्यांनी सुरुवातीला आपल्याला वाईट वाटल्याचे व त्यानंतर आनंद घेतल्याचे सांगितले. तर काहींनी सांगितले की, आपल्यावर ज्या सिनिअरने रॅगिंग केली होती, त्या सिनिअरची आणि आपली चांगली मैत्री झाल्याचेही पॅनेलला सांगितले.रॅगिंगच्या वेळी काही जणांना त्यांच्या सिनिअर्सना ‘सर’, ‘मॅडम’ म्हणण्यास सांगितले. तर काही जणांना मद्यपान किंवा धूम्रपान करण्यास सांगितले. त्याशिवाय काहींचा मानसिक किंवा शारीरिक छळ करण्यात आला. मात्र याविरोधात आवाज उठवण्याऐवजी बहुतांशी विद्यार्थ्यांनी याचा स्वीकार केला.विद्यार्थ्यांनी रॅगिंगचा स्वीकार केला म्हणून त्याबद्दल कोणाच्याही निदर्शनास आणून न देणे, हे अयोग्य आहे, असे पॅनेलचे सदस्य डॉ. शेखर सेशाद्री यांनी सांगितले. ‘रॅगिंग ही अनुवांशिक आणि असमान समाज व्यवस्थेतून निर्माण झाली आहे. याबद्दल तक्रार न करणे याचा अर्थ विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे आणि अस्तित्वात असलेल्या यंत्रणेच्या कारभाराविषयी अविश्वास आहे,’ असे मत डॉ. शेखर यांनी व्यक्त केले.यावर उपाय म्हणून पॅनेलने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची सूचना केली आहे. रॅगिंगबाबत ‘शून्य सहनशक्ती’ ठेवण्याची सूचनाही महाविद्यालयांना केली आहे.>१०,६३२ विद्यार्थांच्या मानसिकतेचा अभ्यासजवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल अ‍ॅण्ड न्यूरोसायन्सेसच्या तज्ज्ञांचे मिळून सर्वोच्च न्यायालयाने एक पॅनेल नियुक्त केले. या पॅनेलने विद्यार्थ्यांच्या रॅगिंगसंदर्भातील मानसिकतेचा अभ्यास केला. या अभ्यासाचा निष्कर्ष युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने (यूजीसी) प्रसिद्ध केला. सर्वेक्षणात देशभरातील १०,६३२ विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यात आला.