शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आमचे उपकार माना, नाहीतर पाकिस्तान लखनऊपर्यंत असला असता; माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 15:34 IST

जे पाकिस्तानला गेले ते महावीर झाले. आमच्या विरोधात दंगली झाल्या, आमच्या घरांवर बुलडोझर चालवला गेला, तरी आम्ही काही बोललो नाही, याचे कारण असे नाही की आमचे घर सुरक्षित होते, असेही अदीब म्हणाले. 

वक्फ सुधारित विधेयकाविरोधात दिल्लीत विरोधी लोकांची एक बैठक बोलविण्यात आली होती. यामध्ये राज्यसभेचे माजी खासदार मोहम्मद अदीब सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आमचे उपकार माना, मोहम्मद अली जिना यांना मुस्लिमांनी नकार दिला नसता तर पाकिस्तानची सीमा लखनऊपर्यंत असली असती, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरून आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. 

मी गेली ५० वर्षे राजकीय क्षेत्रात आहे. आज आम्ही आमच्याच भागात गुन्हेगारासारखे राहत आहोत. आता तर देशद्रोही देखील झालो आहोत. असे लोक पाहिलेत जे आमच्यासोबत रोज असायचे परंतू राजकीय करिअरसाठी ते आम्हाला आमच्या नशीबावर सोडून गेले आहेत. जे लोक पाकिस्तानला गेले त्यांच्यावरील दोष आम्हाला देण्यात आले, असे अदीब म्हणाले. 

जे पाकिस्तानला गेले ते महावीर झाले. आम्ही तर आमचे रक्त वाटले होते. जिनांना आम्ही नकार दिला होता आणि ठोकरले होते. आम्ही लियाकत अली खानना मानले नाही तर आम्ही नेहरू, गांधी आणि आझाद यांना मानले होते. आम्ही जिनांसोबत गेलो नाही, हे उपकार सरकारने मानायला हवेत. असे झाले नसते तर पाकिस्तान लाहोरपर्यंत नाही तर लखनऊपर्यंत बनला असता, असे वक्तव्य अदीब यांनी केले आहे. 

आमच्याकडे काहीही शिल्लक नाही. तुम्ही लोक आमची ताकद आहात. आम्ही अलिगडमध्ये शिकत होतो, तेव्हा राजकीय मंडळी म्हणायची की साहेब रागावतील. तुम्ही आम्हाला शिक्षा करताय आणि आमच्यावर अत्याचार करताय. आत्तापर्यंत आमच्यावर जेवढे हल्ले झाले त्यात सर्वात मोठा हल्ला आमच्या स्टेटसवर आहे. आमच्या विरोधात दंगली झाल्या, आमच्या घरांवर बुलडोझर चालवला गेला, तरी आम्ही काही बोललो नाही, याचे कारण असे नाही की आमचे घर सुरक्षित होते, असेही अदीब म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसMuslimमुस्लीमPakistanपाकिस्तान