शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

'चीनने भारतीय भूमीचा ताबा मिळवल्याचे सत्यही मान्य करा';राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 11:18 IST

राहुल गांधी यांनी अनेकदा चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी एका ट्वीटवरुन सरकारवर टीका केली. 'आता त्यांनी चीनने भारतीय भूमीवर ताबा मिळवल्याचे सत्यही स्वीकारले पाहिजे', असे राहुल गांधींनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी अनेकदा चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली आहे.

राहुल गांधींचे ट्वीट

दरम्यान, भारत आणि चीनने गुरुवारी पूर्व लडाखमधून आणि इतर भागातून सैन्याच्या पूर्ण माघारीच्या पार्श्वभूमीवर चर्चेची पुढील फेरी लवकरात लवकर घेण्याचे मान्य केले आहे. परराष्ट्र मंत्रालयानुसार, सीमा प्रकरणांवर चर्चा आणि समन्वयासाठी(WMCC) कार्यप्रणालीच्या डिजिटल माध्यमातून झालेल्या बैठकीत, दोन्ही बाजूंनी वास्तविक रेषेवरील परिस्थितीबद्दल स्पष्ट आणि सखोल चर्चा केली. आता यावर पुढील बैठकीत चर्चा होईल.

शेतकऱ्यांनी गर्विष्ठांची मान झुकवली-राहुल गांधीपंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आणि आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन केलं. त्यानंतर राहुल गांधींनी ट्विटवरुन आपली प्रतिक्रिया दिली. 'देशातील अन्नदाता शेतकऱ्याने आपल्या आंदोलनातून गर्विष्ठांच्या माना झुकवल्या. अन्यायविरुद्धच्या या विजयाबद्दल शुभेच्छा...' असे ट्वीट राहुल गांधींनी केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन