शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Article 370 रद्द करूनही जम्मू काश्मीरच्या समस्येचं पूर्णपणे निराकरण झालं नाही, मोहन भागवत यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 08:34 IST

RSS Dr. Mohan Bhagwat on Article 370 Jammu kashmir : लोकसंख्येच्या विशिष्ट भागापर्यंत पोहोचून त्यांना भारताशी एकरूप करण्याची आवश्यकता असल्याचं भागवत यांचं वक्तव्य. 

ठळक मुद्देलोकसंख्येच्या विशिष्ट भागापर्यंत पोहोचून त्यांना भारताशी एकरूप करण्याची आवश्यकता असल्याचं भागवत यांचं वक्तव्य. 

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० केंद्र सरकारनं यापूर्वी रद्द केलं होतं. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (RSS Dr. Mohan Bhagwat) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम ३७० रद्द केल्यानंतरही त्या ठिकाणच्या समस्येचं पूर्णपणे निराकरण झालेलं नाही. त्या ठिकाणच्या लोकसंख्येचा एक भाग आजही स्वातंत्र्याच्या गोष्टी करत आहे," असं भागवत म्हणाले. नागपुरात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. समाजाला त्या लोकसंख्येच्या भागापर्यंत पोहोचला हवं जेणेकरुन त्यांना भारतासोबत एकरूप करता येईल, असंही ते म्हणाले. 

नुकताच आपण जम्मू काश्मीरचा दौरा केला आणि त्या ठिकाणी विकासाचा मार्ग मोकळा झाला असल्याचं भागवत म्हणाले. "गेल्या महिन्यात मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान जम्मू काश्मीरच्या मुस्लिम विद्यार्थ्याचं असं म्हणणं होतं की त्यांना भारताचा भाग बनून राहायचं हे आणि आता ते कोणत्याही समस्येशिवाय भारतीय बनून राहू शकतात," असंही त्यांनी नमूद केलं.यापूर्वी जम्मू आणि लडाखला भेदभावाचा सामना करावा लागत होता. काश्मीर खोऱ्यात खर्च होणाऱ्या साधनसंपत्तीच्या वापराचा ८० टक्के हिस्सा हा स्थानिक नेत्यांच्या खिशातजात होता आणि लोकांना त्याचा कोणताही लाभ मिळत नव्हता, असा आरोपही त्यांनी केला.

"आता यामध्ये बदल आला आहे आणि त्या ठिकाणची लोकं आनंदानं जीवन जगत आहेत. आपल्या मुलांच्या हाती पुस्तकांऐवजी दगड देणाऱ्या लोकांनी त्यांचं (दहशतवाद्यांचं) कौतुक बंद केलं. आता त्या ठिकाणी निराळं वातावरण आहे. येणाऱ्या काळात त्या ठिकाणी निवडणुका होतील आणि नव्या सरकारची स्थापनाही होईल," असंही भागवत यांनी नमूद केलं.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघJammu Kashmirजम्मू-काश्मीर