शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

Article 370 रद्द करूनही जम्मू काश्मीरच्या समस्येचं पूर्णपणे निराकरण झालं नाही, मोहन भागवत यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 08:34 IST

RSS Dr. Mohan Bhagwat on Article 370 Jammu kashmir : लोकसंख्येच्या विशिष्ट भागापर्यंत पोहोचून त्यांना भारताशी एकरूप करण्याची आवश्यकता असल्याचं भागवत यांचं वक्तव्य. 

ठळक मुद्देलोकसंख्येच्या विशिष्ट भागापर्यंत पोहोचून त्यांना भारताशी एकरूप करण्याची आवश्यकता असल्याचं भागवत यांचं वक्तव्य. 

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० केंद्र सरकारनं यापूर्वी रद्द केलं होतं. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (RSS Dr. Mohan Bhagwat) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम ३७० रद्द केल्यानंतरही त्या ठिकाणच्या समस्येचं पूर्णपणे निराकरण झालेलं नाही. त्या ठिकाणच्या लोकसंख्येचा एक भाग आजही स्वातंत्र्याच्या गोष्टी करत आहे," असं भागवत म्हणाले. नागपुरात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. समाजाला त्या लोकसंख्येच्या भागापर्यंत पोहोचला हवं जेणेकरुन त्यांना भारतासोबत एकरूप करता येईल, असंही ते म्हणाले. 

नुकताच आपण जम्मू काश्मीरचा दौरा केला आणि त्या ठिकाणी विकासाचा मार्ग मोकळा झाला असल्याचं भागवत म्हणाले. "गेल्या महिन्यात मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान जम्मू काश्मीरच्या मुस्लिम विद्यार्थ्याचं असं म्हणणं होतं की त्यांना भारताचा भाग बनून राहायचं हे आणि आता ते कोणत्याही समस्येशिवाय भारतीय बनून राहू शकतात," असंही त्यांनी नमूद केलं.यापूर्वी जम्मू आणि लडाखला भेदभावाचा सामना करावा लागत होता. काश्मीर खोऱ्यात खर्च होणाऱ्या साधनसंपत्तीच्या वापराचा ८० टक्के हिस्सा हा स्थानिक नेत्यांच्या खिशातजात होता आणि लोकांना त्याचा कोणताही लाभ मिळत नव्हता, असा आरोपही त्यांनी केला.

"आता यामध्ये बदल आला आहे आणि त्या ठिकाणची लोकं आनंदानं जीवन जगत आहेत. आपल्या मुलांच्या हाती पुस्तकांऐवजी दगड देणाऱ्या लोकांनी त्यांचं (दहशतवाद्यांचं) कौतुक बंद केलं. आता त्या ठिकाणी निराळं वातावरण आहे. येणाऱ्या काळात त्या ठिकाणी निवडणुका होतील आणि नव्या सरकारची स्थापनाही होईल," असंही भागवत यांनी नमूद केलं.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघJammu Kashmirजम्मू-काश्मीर