शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अबब ! 12 वर्षात "या" महिलेचा तीनदा तलाक, चौथ्या तलाकची भीती

By admin | Updated: May 3, 2017 15:20 IST

मुस्लिमांच्या तोंडी तलाक प्रथेनं वातावरण ढवळून निघालं असतानाच 35 वर्षीय तारा खान हिला चौथा तलाक मिळण्याची भीती सतावते आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 3 - मुस्लिमांच्या तोंडी तलाक प्रथेनं वातावरण ढवळून निघालं असतानाच 35 वर्षीय तारा खान हिला चौथा तलाक मिळण्याची भीती सतावते आहे. गेल्या 12 वर्षांत तारा हिचा तीन वेळा तलाक झाला आहे. आताचा तिचा चौथा निकाह झाला आहे. आपल्याला चौथा नवराही तलाक तर देणार नाही ना, या चिंतेनं या महिलेला ग्रासलं आहे. पीडित तारा म्हणाली, गेली 12 वर्षं माझ्यासाठी कोणत्याही वाईट स्वप्नांहून कमी नव्हेत. मात्र असं पुन्हा झाल्यास माझ्यासाठी कुठेच जागा उरणार नाही. तारा ही उच्चशिक्षित नाही. त्यांचा पहिला निकाह जाहीद खान या व्यक्तीशी झाला होता. निकाहाच्या 7 वर्षांनंतरही त्यांना मूल झालं नाही. त्यामुळे त्यांच्या पतीनं दुसरा निकाह केला आणि त्यांना तलाक दिला. नव-यानं तलाक दिल्यानंतर ती स्वतःच्या कुटुंबीयांच्या घरी राहू लागली. त्याच वेळी तिच्या नातेवाईकांनी पप्पू खान नावाच्या व्यक्तीसोबत ताराचा निकाह लावून दिला. मात्र त्यानंही तिला तलाक देऊन स्वतःच्या जीवनापासून दूर सारलं. तारा म्हणाली, पप्पू मला मारहाण करत होता. एक दिवस मी विरोध केला तेव्हा त्यानं अपशब्द उद्गारले आणि मला तलाक दिला. त्यामुळे माझा दुसरा निकाह तीन वर्षांतच संपुष्टात आला. दुस-या पतीनं तलाक दिल्यानंतर तारा स्वतःच्या मामांकडे वास्तव्यास गेली. त्यानंतर मामा आणि त्याच्या मुलानं ताराला समजावलं आणि ताराचं तिसरा निकाह लावून दिला. तिसरा नवरा सोनूशी निकाहाच्या चार महिन्यांनंतर ताराचा तलाक झाला. सोनूही ताराला खूप मारहाण करत होता. तो फारच हिंसक मनोवृत्तीचा होता. एकदा सोनूनं ताराला मामाच्या घरी नेलं आणि तीन तलाक देऊन टाकला. तीनदा तलाक झाल्यानंतर तारालाही पुन्हा निकाह करण्याची इच्छा नव्हती. मात्र त्यानंतर तिने कुटुंबीयांच्या खातर चौथा निकाह केला. ताराचा गेल्या जुलै महिन्यात शमशाद नावाच्या व्यक्तीसोबत निकाह झाला. तारा म्हणाली, माझ्यासोबत फार वाईट घटना घडल्या आहेत. मला शमशादही सोडणार नाही ना, यामुळे मी घाबरली आहे. माझ्या 5 भावांना वाटतं की मी कुटुंबीयांच्या बदनामीचं कारण आहे. आता ते मला स्वतःजवळ ठेवू इच्छित नाही. मला हा निकाह संपवायचा नाही. काहीही झालं तरी मला शमशादसोबतच राहायचं आहे. मात्र शमशादही माझ्या इतर नव-यांसारखाच आहे. गेल्या 12 वर्षांत मी खूप दुःख सोसलं आहे. आता दुःख सोसायची माझ्यात ताकद नाही. तारा आणि शमशादची सध्या बरेलीमध्ये काऊन्सिलिंग सुरू आहे. तारा म्हणते, गरज पडल्यास मी हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत घेऊन जाईन, माझ्या नव-यानं मला सोबत ठेवावं असं मला वाटतं.