शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अबब ! 12 वर्षात "या" महिलेचा तीनदा तलाक, चौथ्या तलाकची भीती

By admin | Updated: May 3, 2017 15:20 IST

मुस्लिमांच्या तोंडी तलाक प्रथेनं वातावरण ढवळून निघालं असतानाच 35 वर्षीय तारा खान हिला चौथा तलाक मिळण्याची भीती सतावते आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 3 - मुस्लिमांच्या तोंडी तलाक प्रथेनं वातावरण ढवळून निघालं असतानाच 35 वर्षीय तारा खान हिला चौथा तलाक मिळण्याची भीती सतावते आहे. गेल्या 12 वर्षांत तारा हिचा तीन वेळा तलाक झाला आहे. आताचा तिचा चौथा निकाह झाला आहे. आपल्याला चौथा नवराही तलाक तर देणार नाही ना, या चिंतेनं या महिलेला ग्रासलं आहे. पीडित तारा म्हणाली, गेली 12 वर्षं माझ्यासाठी कोणत्याही वाईट स्वप्नांहून कमी नव्हेत. मात्र असं पुन्हा झाल्यास माझ्यासाठी कुठेच जागा उरणार नाही. तारा ही उच्चशिक्षित नाही. त्यांचा पहिला निकाह जाहीद खान या व्यक्तीशी झाला होता. निकाहाच्या 7 वर्षांनंतरही त्यांना मूल झालं नाही. त्यामुळे त्यांच्या पतीनं दुसरा निकाह केला आणि त्यांना तलाक दिला. नव-यानं तलाक दिल्यानंतर ती स्वतःच्या कुटुंबीयांच्या घरी राहू लागली. त्याच वेळी तिच्या नातेवाईकांनी पप्पू खान नावाच्या व्यक्तीसोबत ताराचा निकाह लावून दिला. मात्र त्यानंही तिला तलाक देऊन स्वतःच्या जीवनापासून दूर सारलं. तारा म्हणाली, पप्पू मला मारहाण करत होता. एक दिवस मी विरोध केला तेव्हा त्यानं अपशब्द उद्गारले आणि मला तलाक दिला. त्यामुळे माझा दुसरा निकाह तीन वर्षांतच संपुष्टात आला. दुस-या पतीनं तलाक दिल्यानंतर तारा स्वतःच्या मामांकडे वास्तव्यास गेली. त्यानंतर मामा आणि त्याच्या मुलानं ताराला समजावलं आणि ताराचं तिसरा निकाह लावून दिला. तिसरा नवरा सोनूशी निकाहाच्या चार महिन्यांनंतर ताराचा तलाक झाला. सोनूही ताराला खूप मारहाण करत होता. तो फारच हिंसक मनोवृत्तीचा होता. एकदा सोनूनं ताराला मामाच्या घरी नेलं आणि तीन तलाक देऊन टाकला. तीनदा तलाक झाल्यानंतर तारालाही पुन्हा निकाह करण्याची इच्छा नव्हती. मात्र त्यानंतर तिने कुटुंबीयांच्या खातर चौथा निकाह केला. ताराचा गेल्या जुलै महिन्यात शमशाद नावाच्या व्यक्तीसोबत निकाह झाला. तारा म्हणाली, माझ्यासोबत फार वाईट घटना घडल्या आहेत. मला शमशादही सोडणार नाही ना, यामुळे मी घाबरली आहे. माझ्या 5 भावांना वाटतं की मी कुटुंबीयांच्या बदनामीचं कारण आहे. आता ते मला स्वतःजवळ ठेवू इच्छित नाही. मला हा निकाह संपवायचा नाही. काहीही झालं तरी मला शमशादसोबतच राहायचं आहे. मात्र शमशादही माझ्या इतर नव-यांसारखाच आहे. गेल्या 12 वर्षांत मी खूप दुःख सोसलं आहे. आता दुःख सोसायची माझ्यात ताकद नाही. तारा आणि शमशादची सध्या बरेलीमध्ये काऊन्सिलिंग सुरू आहे. तारा म्हणते, गरज पडल्यास मी हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत घेऊन जाईन, माझ्या नव-यानं मला सोबत ठेवावं असं मला वाटतं.