शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सुमारे ५०० भारतीय थायलंडमध्ये दाखल; मायदेशी आणण्यासाठी विमान पाठवण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:28 IST

भारत आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी थायलंडला विमान पाठवण्याचा विचार करत असल्याचे कळते

नवी दिल्ली : म्यानमारमधील फसवणूक करणाऱ्या काही केंद्रांवर कारवाई झाल्यानंतर, सुमारे ५०० भारतीय थायलंडमध्ये दाखल झाले आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताची थायलंडच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.

भारत आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी थायलंडला विमान पाठवण्याचा विचार करत असल्याचे कळते. यापैकी बहुतेक भारतीय म्यानमारच्या केके पार्क कॉम्प्लेक्समधील फसवणूक करणाऱ्या केंद्रांचे बळी होते.

थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल म्हणाले की, सुमारे ५०० भारतीय पश्चिम थायलंडमधील माई सोत येथे आहेत. त्यांना परत नेण्यासाठी भारत सरकार विमान पाठवणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, ५०० भारतीय गेल्या काही दिवसांत म्यानमारमधून थायलंडमध्ये दाखल झाले. थायलंडमधील आमचे मिशन त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पुष्टी करण्यासाठी आणि थायलंडमध्ये आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांना परत पाठवण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत काम करीत आहे. थायलंडच्या अधिकाऱ्यांसोबत काम करत आहेत.

म्यानमारमधून पळून गेलेल्या २८ देशांतील १,५०० हून अधिक लोकांमध्ये हे भारतीय नागरिक आहेत. म्यानमारची केंद्रे आंतरराष्ट्रीय सायबर घोटाळ्यांमध्ये सहभागी आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, विविध देशांतील शेकडो तस्करी पीडितांना या केंद्रांवरील कारवायांमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले गेले. कंबोडिया, लाओस, फिलिपिन्स आणि मलेशियामध्येही अशाच प्रकारच्या कारवाया झाल्याचे वृत्त आहे.

मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात असे म्हटले आहे की, भूमिगत कारवाया बहुतेकदा अशा गुन्हेगारी नेटवर्कशी जोडल्या जातात जे जागतिक स्तरावर लोकांना भरती करतात आणि त्यांना प्रामुख्याने कंबोडिया, म्यानमार, लाओस, फिलिपिन्स आणि मलेशियामध्ये असलेल्या केंद्रांमध्ये कामावर ठेवतात. मार्चमध्ये, भारताने म्यानमार थायलंड सीमेवर असलेल्या सायबर स्कॅम केंद्रांमधून सुटका केलेल्या ५४९ नागरिकांना मायदेशी परत आणले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : 500 Indians in Thailand: Repatriation Flight Considered by India

Web Summary : Following action against Myanmar fraud centers, 500 Indians are now in Thailand. India is considering a repatriation flight. Most were victims from Myanmar's KK Park complex. They are among 1,500 people from 28 countries who fled Myanmar scam centers. India is working with Thai authorities.
टॅग्स :ThailandथायलंडMyanmarम्यानमारcyber crimeसायबर क्राइम