शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सुमारे ५०० भारतीय थायलंडमध्ये दाखल; मायदेशी आणण्यासाठी विमान पाठवण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:28 IST

भारत आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी थायलंडला विमान पाठवण्याचा विचार करत असल्याचे कळते

नवी दिल्ली : म्यानमारमधील फसवणूक करणाऱ्या काही केंद्रांवर कारवाई झाल्यानंतर, सुमारे ५०० भारतीय थायलंडमध्ये दाखल झाले आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताची थायलंडच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.

भारत आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी थायलंडला विमान पाठवण्याचा विचार करत असल्याचे कळते. यापैकी बहुतेक भारतीय म्यानमारच्या केके पार्क कॉम्प्लेक्समधील फसवणूक करणाऱ्या केंद्रांचे बळी होते.

थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल म्हणाले की, सुमारे ५०० भारतीय पश्चिम थायलंडमधील माई सोत येथे आहेत. त्यांना परत नेण्यासाठी भारत सरकार विमान पाठवणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, ५०० भारतीय गेल्या काही दिवसांत म्यानमारमधून थायलंडमध्ये दाखल झाले. थायलंडमधील आमचे मिशन त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पुष्टी करण्यासाठी आणि थायलंडमध्ये आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांना परत पाठवण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत काम करीत आहे. थायलंडच्या अधिकाऱ्यांसोबत काम करत आहेत.

म्यानमारमधून पळून गेलेल्या २८ देशांतील १,५०० हून अधिक लोकांमध्ये हे भारतीय नागरिक आहेत. म्यानमारची केंद्रे आंतरराष्ट्रीय सायबर घोटाळ्यांमध्ये सहभागी आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, विविध देशांतील शेकडो तस्करी पीडितांना या केंद्रांवरील कारवायांमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले गेले. कंबोडिया, लाओस, फिलिपिन्स आणि मलेशियामध्येही अशाच प्रकारच्या कारवाया झाल्याचे वृत्त आहे.

मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात असे म्हटले आहे की, भूमिगत कारवाया बहुतेकदा अशा गुन्हेगारी नेटवर्कशी जोडल्या जातात जे जागतिक स्तरावर लोकांना भरती करतात आणि त्यांना प्रामुख्याने कंबोडिया, म्यानमार, लाओस, फिलिपिन्स आणि मलेशियामध्ये असलेल्या केंद्रांमध्ये कामावर ठेवतात. मार्चमध्ये, भारताने म्यानमार थायलंड सीमेवर असलेल्या सायबर स्कॅम केंद्रांमधून सुटका केलेल्या ५४९ नागरिकांना मायदेशी परत आणले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : 500 Indians in Thailand: Repatriation Flight Considered by India

Web Summary : Following action against Myanmar fraud centers, 500 Indians are now in Thailand. India is considering a repatriation flight. Most were victims from Myanmar's KK Park complex. They are among 1,500 people from 28 countries who fled Myanmar scam centers. India is working with Thai authorities.
टॅग्स :ThailandथायलंडMyanmarम्यानमारcyber crimeसायबर क्राइम