शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

सुमारे ५०० भारतीय थायलंडमध्ये दाखल; मायदेशी आणण्यासाठी विमान पाठवण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:28 IST

भारत आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी थायलंडला विमान पाठवण्याचा विचार करत असल्याचे कळते

नवी दिल्ली : म्यानमारमधील फसवणूक करणाऱ्या काही केंद्रांवर कारवाई झाल्यानंतर, सुमारे ५०० भारतीय थायलंडमध्ये दाखल झाले आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताची थायलंडच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.

भारत आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी थायलंडला विमान पाठवण्याचा विचार करत असल्याचे कळते. यापैकी बहुतेक भारतीय म्यानमारच्या केके पार्क कॉम्प्लेक्समधील फसवणूक करणाऱ्या केंद्रांचे बळी होते.

थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल म्हणाले की, सुमारे ५०० भारतीय पश्चिम थायलंडमधील माई सोत येथे आहेत. त्यांना परत नेण्यासाठी भारत सरकार विमान पाठवणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, ५०० भारतीय गेल्या काही दिवसांत म्यानमारमधून थायलंडमध्ये दाखल झाले. थायलंडमधील आमचे मिशन त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पुष्टी करण्यासाठी आणि थायलंडमध्ये आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांना परत पाठवण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत काम करीत आहे. थायलंडच्या अधिकाऱ्यांसोबत काम करत आहेत.

म्यानमारमधून पळून गेलेल्या २८ देशांतील १,५०० हून अधिक लोकांमध्ये हे भारतीय नागरिक आहेत. म्यानमारची केंद्रे आंतरराष्ट्रीय सायबर घोटाळ्यांमध्ये सहभागी आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, विविध देशांतील शेकडो तस्करी पीडितांना या केंद्रांवरील कारवायांमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले गेले. कंबोडिया, लाओस, फिलिपिन्स आणि मलेशियामध्येही अशाच प्रकारच्या कारवाया झाल्याचे वृत्त आहे.

मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात असे म्हटले आहे की, भूमिगत कारवाया बहुतेकदा अशा गुन्हेगारी नेटवर्कशी जोडल्या जातात जे जागतिक स्तरावर लोकांना भरती करतात आणि त्यांना प्रामुख्याने कंबोडिया, म्यानमार, लाओस, फिलिपिन्स आणि मलेशियामध्ये असलेल्या केंद्रांमध्ये कामावर ठेवतात. मार्चमध्ये, भारताने म्यानमार थायलंड सीमेवर असलेल्या सायबर स्कॅम केंद्रांमधून सुटका केलेल्या ५४९ नागरिकांना मायदेशी परत आणले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : 500 Indians in Thailand: Repatriation Flight Considered by India

Web Summary : Following action against Myanmar fraud centers, 500 Indians are now in Thailand. India is considering a repatriation flight. Most were victims from Myanmar's KK Park complex. They are among 1,500 people from 28 countries who fled Myanmar scam centers. India is working with Thai authorities.
टॅग्स :ThailandथायलंडMyanmarम्यानमारcyber crimeसायबर क्राइम