शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

ABG Shipyard Scam: 'NDAच्या काळात बँकांची परिस्थिती सुधारली', एबीजी घोटाळ्यावरुन अर्थमंत्र्यांचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 16:11 IST

ABG Shipyard Scam: 'एबीजी शिपयार्ड खाते मोदी सरकारच्या काळात नाही, तर यूपीए सरकारच्या काळात एनपीएमध्ये बदलले.'

नवी दिल्ली: सध्या देशात एबीजी शिपयार्ड प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरुन विरोधक केंद्रावर टीका करत आहेत. दरम्यान, यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाष्य केले. सोमवारी RBI बोर्ड सदस्यांना संबोधित केल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी देशातील सर्वात मोठ्या बँक फसवणूक प्रकरणावर बोलताना बँकांचे कौतुक केले आणि एनडीएच्या काळात बँकांमध्ये मोठी सुधारणा झाल्याचे त्या म्हणाल्या.

'यूपीएच्या काळात खाते बदलले'यावेळी बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, या प्रकरणात बँकांचे कौतुक केले पाहिजे. कारण त्यांनी या प्रकारची फसवणूक शोधण्यासाठी सरासरीपेक्षा कमी वेळ घेतला. अशा प्रकरणांचा शोध घेण्यासाठी आणि पुढील कारवाई सुरू करण्यासाठी बँकांना 52 ते 56 महिने लागतात. पण, एनडीएच्या काळात बँकांची परिस्थिती सुधारली आहे. विशेष म्हणजे, एबीजी शिपयार्ड खाते मोदी सरकारच्या काळात नाही, तर आधीच्या यूपीए सरकारच्या काळात एनपीएमध्ये बदलले होते, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

सीबीआयची कारवाईविशेष म्हणजे केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने अलीकडेच ABG शिपयार्ड लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल आणि इतरांवर ICICI बँकेच्या नेतृत्वाखालील दोन डझन कर्जदारांच्या संघाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. हा संपूर्ण घोटाळा 22,842 कोटी रुपयांचा आहे.

आठ जणांवर गुन्हा याअंतर्गत कंपनीने 28 बँकांकडून कर्ज घेतले आहे. सीबीआयने या प्रकरणी 7 फेब्रुवारीला एफआयआर नोंदवला होता. यानंतर तपासाअंती छापे टाकून कंपनीचे माजी अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, एबीजी शिपयार्ड लिमिटेडने केलेली फसवणूक विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या एकूण घोटाळ्याएवढी आहे.

काँग्रेसचा भाजपवर आरोपकाँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मीडिया प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी एबीजी शिपयार्ड कंपनीच्या 22 हजार कोटींहून अधिकच्या घोटाळ्याबाबत भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. जनतेचा पैसा लुटायचा, मग पळून जायचे, अशा रणनीतीवर सरकार काम करत असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला.

मोदींच्या मित्रांचे अच्छे दिनट्विटमधून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. मोदींच्या काळात 5,35,000 कोटी रुपयांची बँकांची फसवणूक झाली आहे. जनतेच्या पैशाची एवढी हेराफेरी 75 वर्षांत कधीच झाली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदींच्या मित्रांसाठीच चांगले दिवस आहेत, अशी टीका राहुल यांनी केली.

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनfraudधोकेबाजीbankबँक