शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 05:29 IST

; वांशिक संघर्षाच्या दोन वर्षांनंतर प्रथमच केला मणिपूरचा दौरा

चुराचंदपूर : विविध संघटनांना हिंसेचा मार्ग सोडण्याचे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचे सरकार मणिपूरच्या जनतेसोबत ठामपणे उभे आहे. हे संघर्षग्रस्त राज्य शांतता व समृद्धीचे प्रतीक बनावे याकरिता केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले. मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये वांशिक हिंसाचार उसळला. त्यानंतर पंतप्रधान प्रथमच या राज्याच्या दौऱ्यावर आले.

कुकी लोकांची बहुसंख्या असलेल्या चुराचंदपूर जिल्ह्यात जाहीर सभेत मोदी म्हणाले, मणिपूर ही आशा-आकाक्षांची भूमी आहे. या सुंदर प्रदेशावर हिंसेचे सावट आहे. हिंसाचाराचा तडाखा बसलेल्या लोकांना मी मदत शिबिरात भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. मणिपूर सध्याच्या स्थितीतून सावरेल अशी खात्री आहे. कोणत्याही भागात विकास होण्यासाठी तिथे शांतता आवश्यक आहे. गेल्या ११ वर्षात ईशान्य भारतातील अनेक संघर्ष, वाद मिटविण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)

'मणिपूरची वेगाने प्रगती'

पंतप्रधान मोदी म्हणाले की, पूर्वी दिल्लीत घेतलेल्या निर्णयांची ईशान्य भारतात अंमलबजावणी होण्यास बराच काळ लागायचा; पण आता मणिपूर देशाच्या इतर राज्यांसोबत तितक्याच वेगाने प्रगती करत आहे.

पूर्वी डोंगराळ आणि आदिवासी भागात चांगली शाळा, रुग्णालये असणे ही एक स्वप्नवत गोष्ट होती. आज केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे ही परिस्थिती बदलत आहे. चुराचंदपूरमध्ये आता वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आले आहे.

७३०० कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन

पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरमध्ये ७३०० कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्या सरकारने देशभरात गरिबांसाठी पक्की घरे बांधली. मणिपूरमधील हजारो कुटुंबांनाही या योजनेचा लाभ झाला आहे. सात-आठ वर्षापूर्वी मणिपूरमध्ये केवळ २५-३० हजार घरांपर्यंतच पाणीपुरवठा होता. आज ३.५ लाखांहून अधिक घरांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध आहे.

मणिपूर या नावातच 'मणी' आहे. हा मणी संपूर्ण ईशान्य भारताचे भविष्य उज्ज्वल करील. इम्फाळहून चुराचंदपूरपर्यंत ६० किमीचा प्रवास रस्त्याने करताना जनतेचे मिळालेले प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही, असेही ते म्हणाले.

परस्पर संवादातून तोडगा काढण्याचा केंद्राचा प्रयत्न

मणिपूरमध्ये हिंसाचाराचा १ आगडोंब उसळल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्या राज्याचा एकदाही दौरा न केल्याबद्दल काँग्रेससह विरोधकांनी सातत्याने टीका केली होती.

त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या काही दिवसांत मणिपूरमधील डोंगराळ भाग, तसेच खोऱ्यामध्ये विविध गटांसोबत चर्चा करून शांततेसाठी करार करण्याचा प्रयत्न झाला. परस्पर संवादाच्या माध्यमातून केंद्र सरकारने विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पावले उचलली आहेत.

सर्व संघटनांनी हिंसेचा मार्ग 3 सोडून शांततेची कास धरायला हवी. याच मार्गाने तुमच्या स्वप्नांची पूर्तता होईल. ते साध्य होण्यासाठी केंद्र सरकार मणिपूरच्या जनतेसोबत आहे. या राज्याला समृद्धी, शांतता, प्रगतीचे प्रतीक बनवायचे आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.