शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
3
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
4
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
5
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
8
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
9
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
10
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
11
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
12
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
13
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
14
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
15
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
16
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
17
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
18
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
19
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
20
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

अब की बार, किसान सरकार, बीआरएस सभेत केसीआर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 08:18 IST

भाजपविरोधात एकवटले विरोधक

खम्माम (तेलंगणा) : या देशात आता शेतकऱ्यांचे सरकार येईल आणि लोकसभा निवडणुकीनंतर बीआरएसच्या पुढाकाराने सत्ता स्थापन झाल्यास देशातील शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल, अशी घोषणा भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसच्या भव्य सभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली. याच सभेत अनेक विरोधक भाजप सरकारविरोधात एकवटले. हे सरकार बदलण्यासाठी एकत्र आलो असल्याचे विरोधकांनी यावेळी स्पष्ट केले.

‘मेक इन इंडिया’ उपक्रम हा ‘जोक इन इंडिया’ बनला आहे, अशा शब्दांत के. चंद्रशेखर राव यांनी बुधवारी भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. खम्मामच्या इतिहासात बीआरएसची ही सभा सर्वांत मोठी ठरली आहे. देशात मोठ्या बदलाचे ते संकेत मानले जात आहेत.

के. चंद्रशेखर राव म्हणाले की, भारत साधनसंपत्तीने भरलेला असताना अमेरिका आणि इतरांकडून कर्ज आणि मदत मागत आहे. अमेरिकेत केवळ २९ टक्के शेतीयोग्य जमीन आहे. चीनमध्ये १६ टक्के आणि भारतात ८३ कोटी एकरपैकी ४१ कोटी एकर जमीन शेतीयोग्य आहे. 

या सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव उपस्थित होते.

महिलांना विधिमंडळात ३५% आरक्षण  

भाजप आणि काँग्रेस एकच आहेत. ते फक्त शाब्दिक भांडणात गुंतले आहेत. ‘तोट्याचे समाजीकरण आणि नफ्याचे खासगीकरण’ असा भाजप सरकारचा फॉर्म्युला आहे. देशात दलित गरीब आहेत. सत्तेत आल्यास देशातील २५ लाख कुटुंबांना दरवर्षी दलित बंधूंचा लाभ दिला जाईल. महिलांना विधिमंडळात ३५ टक्के आरक्षण देण्याचा आमचा प्रस्ताव आहे. -के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगणा

एनडीए सरकार पाडण्याची लोकांना संधी

देशातील जनतेला २०२४ च्या निवडणुकीत केंद्रातील एनडीए सरकार पाडण्याची संधी मिळेल. निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना त्रास देणारे काही राज्यांचे राज्यपाल हे पंतप्रधान मोदी यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. मोदींना जनतेच्या प्रश्नांची चिंता नसून, कोणता आमदार विकत घ्यायचा आणि कोणते सरकार पाडायचे, याचाच ते विचार करत आहेत. -अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

भाजप सरकारचे  ४०० दिवस उरले

भाजप सरकारने आपले दिवस मोजण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीसाठी केवळ ४०० दिवस उरले आहेत. त्यानंतर एक दिवसही हे सरकार टिकणार नाही. सर्व पुरोगामी नेत्यांनी एकत्र येऊन देशाच्या विकासासाठी काम करण्याची वेळ आली आहे. -अखिलेश यादव, सपाचे प्रमुख

संविधानासाठी एकत्र यावे

भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकार देशाच्या लोकशाहीचा पाया उद्ध्वस्त करत आहे. धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र यावे. -पिनाराई विजयन, मुख्यमंत्री, केरळ

अग्निपथ योजना रद्द करणार

बीआरएस सत्तेत आल्यास अग्निपथ योजना रद्द केली जाईल. तेलंगणातील रयथू बंधू (शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी)सारख्या योजना देशभरात लागू केल्या जातील.