शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

राज्यातील ‘आप’ कार्यकर्त्यांचा दिल्लीकरांशी ‘संवाद’

By admin | Updated: January 29, 2015 04:13 IST

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यातून मोठ्या प्रमाणावर आम आदमी पार्टीचे (आप) कार्यकर्ते राजधानी दिल्लीत दाखल झाले

सुधीर लंके, पुणेविधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यातून मोठ्या प्रमाणावर आम आदमी पार्टीचे (आप) कार्यकर्ते राजधानी दिल्लीत दाखल झाले असून, स्थानिक कार्यकर्त्यांनंतर या प्रचारात महाराष्ट्राचा सर्वांत मोठा सहभाग आहे. याशिवाय राज्यातील साडेतीन हजार कार्यकर्ते ‘कॉलिंग कॅम्पेन’च्या माध्यमातून घरबसल्या दिल्लीच्या मतदारांना ‘आप’ला मत देण्याचे आवाहन करीत आहेत. दिल्ली पुन्हा काबीज करण्यासाठी ‘आप’ने कंबर कसली आहे. देशभरातून ‘आप’चे कार्यकर्ते दिल्लीत एकवटले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक साडेपाचशे कार्यकर्ते आहेत. त्यातही मुंबई-पुण्यातील कार्यकर्त्यांची संख्या जास्त असून, विदर्भातूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते गेले आहेत. पुणे व मुंबईत ‘आयटी’ क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हे दिल्लीच्या ‘वॉररूम’मधून ‘आप’च्या सोशल मीडियावरील प्रचाराची धुरा सांभाळत असल्याचे पक्षाचे राज्य संयोजक प्रा. सुभाष वारे यांनी सांगितले.स्थानिक कार्यकर्ते घराघरात जाऊन प्रचार करीत आहेत. तर इतर राज्यांतून आलेले स्वयंसेवक ‘बझ कॅम्पेन’ म्हणजे गर्दी असलेल्या चौकांत जाऊन पत्रके वाटणे, प्रचारफलक हातात घेऊन उभे राहणे, रिक्षा व प्रवासी वाहतूक करणाऱ्या सायकलींना स्टिकर लावणे अशा पद्धतीने प्रचार करत आहेत. दिल्लीतील ‘फ्लॅश मॉब’ या अभियानातही राज्यातील कार्यकर्ते सहभागी आहेत. यामध्ये गर्दीच्या ठिकाणी कार्यकर्ते सामूहिकपणे ‘पाच साल केजरीवाल’ या गाण्यावर नृत्य करून पक्षाचा प्रचार करत आहेत. ‘कॉलिंग कॅम्पेन’अंतर्गत राज्यातील ३ हजार ६०० कॉलर्सने आपले नाव पक्षाकडे नोंदविले आहे. ‘आप’ला मतदान करण्याचे आवाहन करणारे ५ लाख ६७ हजार कॉल देशभरातून दिल्लीत गेले आहेत. त्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक १ लाख २० हजार कॉल गेले. पुण्यातील संगणक अभियंता अजिंक्य शिंदे हे या मोहिमेची राज्याची धुरा वाहत आहेत.